शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

३६ रुग्णांचा श्वास एका सिलेंडरच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:08 IST

राजीव सिंह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - सदरस्थित आयुष इस्पितळात गुरुवारी मोठा अपघात टळला. एकवेळ तर अशी आली होती ...

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - सदरस्थित आयुष इस्पितळात गुरुवारी मोठा अपघात टळला. एकवेळ तर अशी आली होती जेव्हा प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीमधील चारपैकी केवळ एकच नोजल काम करीत होते. दर १५ मिनिटांनी सिलेंडरला बदलावे लागत होते. सुमारे तीन तास दुरुस्तीचे काम चालले. जर थोडासा जरी उशीर झाला असता तर अनेक रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता होती.

इस्पितळात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दोन नातेवाईक दाखल नसते तर इतकी तत्परता कुणीच दाखविली नसती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरवठा वाहिनीला चार सिलेंडर जुळले होते. यातील एक नोजल बंद होते, दोन नोजल खराब झाले होते व पुरवठा वाहिनीच्या केवळ एकाच नोजलच्या भरवशावर ३६ रुग्णांना प्राणवायू जात होता. दुपारी ४.०५ वाजता जेव्हा लिकेजची समस्या लक्षात आली तेव्हा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कसेतरी नोजल ठीक केले. मात्र हे पर्याप्त नव्हते. जर काम करणारे एक नोजल बंद झाले असते तर रुग्णांच्या जीवाला धोका होता.

मनपाच्या तीन रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांना भरती केले जात आहे. यात गांधीनगरस्थित इंदिरा गांधी रुग्णालय, इमामवाडास्थित आयसोलेशन इस्पितळ, सदरस्थित आयुष इस्पितळ यांचा समावेश आहे. तेथे केवळ ऑक्सिजन असलेले बेड आहेत. इंदिरा गांधीमध्ये ९२, आयसोलेशनमध्ये ३२ व आयुष इस्पितळात ४२ रुग्ण भरती आहेत.

मनपाकडे पाहणीची व्यवस्थाच नाही

कोरोनाची स्थिती पाहता मनपातर्फे तडकाफडकी तेथे ऑक्सिजन पुरवठ्याची वाहिनी टाकण्यात आली. कंत्राटाच्या आधारावर काम करविण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याच्या पाहणीची जबाबदारी आहे. हा विभाग सिव्हिल इंजिनिअरिंगशी जुळला आहे. पुरवठा वाहिनीची डागडुजी, पाहणीसाठी इस्पितळात तंत्रज्ञ नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. परंतु मनपाकडे याची काहीच व्यवस्था नाही. अशास्थितीत अपघात झाला तर त्याची थेट जबाबदारी मनपावर असेल. पाचपावली व केटीनगर इस्पितळात ऑक्सिजन वाहिनी टाकणे व रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांची भरती

इस्पितळांमध्ये ऑक्सिनजची पुरवठा वाहिनी टाकण्यासोबतच क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. इस्पितळांमध्ये विद्युत वाहिन्यांसोबतच इतर सुविधा जुन्या आहेत. अशास्थितीत भार वाढल्याने आग लागणे, लिकेज होणे अशा घटना होत आहेत, अशी माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.