शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

आयएमएचे ३,५०० डॉक्टर संपावर

By admin | Updated: March 22, 2017 21:40 IST

योग्य सुरक्षेच्या मागणीसाठी सामूहिक रजेवर गेलेल्या मेयो, मेडिकलच्या ४४० निवासी डॉक्टरांवरील निलंबनाच्या कारवाईला इंडियन मेडिकल असोसिएशन

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 22 - योग्य सुरक्षेच्या मागणीसाठी सामूहिक रजेवर गेलेल्या मेयो, मेडिकलच्या ४४० निवासी डॉक्टरांवरील निलंबनाच्या कारवाईला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेने निषेध व्यक्त करीत, बुधवारी दुपारपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यात शहरातील  आयएमएचे ३,५०० डॉक्टर सहभागी झाले असून, केवळ आकस्मिक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. परंतु दोन दिवसांत ही कारवाई मागे न घेतल्यास आपत्कालीन सेवाही बंद करण्यात येईल, अशी माहिती आज  आयएमए चे अध्यक्ष डॉ. अविनाश वासे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य डॉ. अनिल लद्धड, आयएमएच्या सचिव डॉ. अर्चना कोठारी, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. वाय. एस. देशपांडे आदी उपस्थित होते. डॉ. लद्धड म्हणाले, शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून शासनाने नेमणूक केली आहे. २४ तास ते रुग्णांच्या सेवेत असतात. यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची आहे. यातच जर योग्य सुरक्षेच्याअभावी त्यांना मारहाण होत असेल तर याला संबंधित रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय शिक्षण विभाग व सरकार जबाबदार आहे. डॉ. अशोक अढाव म्हणाले, आज दुपारपासून  आयएमए चे सर्व सदस्य डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. शहरातील ६५० क्लिनिक व ३०० वर रुग्णालयांचे  बाह्यरुग्ण विभाग  (ओपीडी) अनिश्चित काळासाठी बंद राहील. केवळ आकस्मिक विभाग सुरू राहील. डॉ. वाय. एस. देशपांडे म्हणाले, निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर जाण्यापूर्वी तशी सूचना अधिष्ठात्यांना दिली होती. निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेल्यानंतर १२ तासांत योग्य सुरक्षा व्यवस्थेत बदलही करणे शक्य होते. परंतु तसे न करता थेट निलंबनाची कारवाई करणे, हे योग्य नाही. सुरक्षेला घेऊन गेल्या कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्टर मागणी करीत आहे, परंतु सरकार गंभीर नाही. डॉ. प्रशांत निखाडे म्हणाले, दहशतवादी कसाबला फाशी देण्यापूर्वी त्याच्या सुरक्षेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु रुग्णाचा जीव वाचविणाऱ्या डॉक्टरांनी योग्य सुरक्षा मागितली तर त्यांना निलंबनाची शिक्षा ठोठावण्यात आली, हे योग्य नाही. डॉ. मिलिंद नाईक म्हणाले, २०१० पासून ते आतापर्यंत नागपुरातील डॉक्टरांना मारहाण झालेल्या २६ प्रकरणांमधून केवळ एकाच प्रकरणाचा निकाल लागला. यामुळे कायदा हातात घेणाऱ्यांवर वचक राहिला नाही. यामुळे पुन्हा पुन्हा अशा घटना घडतात.