लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेने जागोजागी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. बुधवारी तीन विशेष रेल्वेगाड्या नागपुरात दाखल झाल्या. यात ३३० प्रवासी बिलासपूर, नवी दिल्ली आणि बंगळूरूला रवाना झाले तर ३४० प्रवासी विविध ठिकाणावरून नागपुरात दाखल झाले. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.नागपूर रेल्वेस्थानकावर बुधवारी तीन विशेष रेल्वेगाड्या दाखल झाल्या. सकाळी ५.५० वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०२४४२ नवी दिल्ली-बिलासपूर ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या गाडीतून १९० प्रवासी बिलासपूरकडे रवाना झाले तर १४२ प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. त्यानंतर सकाळी ११ वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०२४९२ नवी दिल्ली-बंगळूरू एक्स्प्रेस आली. या गाडीतून ३९ प्रवासी सिकंदराबादला रवाना झाले तर नागपूर रेल्वेस्थानकावर १२३ प्रवासी उतरले. प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या आत जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात आला. बाहेर पडताना आरपीएफ ठाण्याच्या शेजारील जिन्यावरून बाहेर सोडण्यात आले. बाहेरगावी जाणाऱ्या आणि नागपुरात उतरलेल्या प्रत्येक प्रवाशाची स्क्रिनिंग केल्यानंतरच त्यांना रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर सोडण्यात आले. विमानतळाप्रमाणे प्रवासाच्या एक तास आधीपर्यंत प्रवाशांना आत सोडण्यात आले. दुपारी ३.३६ वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०२६९१ बंगळूरू-नवी दिल्ली एक्स्प्रेस आली. या गाडीतून १०१ प्रवासी नवी दिल्लीकडे रवाना झाले तर ७५ प्रवासी खाली उतरले. प्रवाशांना त्यांच्या परिसरात सोडण्यासाठी महापालिकेच्या बसेस रेल्वेस्थानकावर हजर होत्या. अनेक प्रवाशांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले होते. बुधवारीही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर रोखण्यात आले. त्यामुळे अनेक प्रतिनिधी रेल्वेस्थानकावर येऊन आल्यापावली परत गेले.३४० प्रवाशांना केले होम क्वारंटाईन
विशेष रेल्वेगाड्यांमधून ३४० प्रवासी नागपुरात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 19:55 IST
रेल्वेने जागोजागी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. बुधवारी तीन विशेष रेल्वेगाड्या नागपुरात दाखल झाल्या. यात ३३० प्रवासी बिलासपूर, नवी दिल्ली आणि बंगळूरूला रवाना झाले तर ३४० प्रवासी विविध ठिकाणावरून नागपुरात दाखल झाले. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
विशेष रेल्वेगाड्यांमधून ३४० प्रवासी नागपुरात दाखल
ठळक मुद्दे३३० प्रवासी रवाना : रेल्वेस्थानकावर प्रवाशांची झाली गैरसोय