शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

विशेष रेल्वेगाड्यांमधून ३४० प्रवासी नागपुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 19:55 IST

रेल्वेने जागोजागी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. बुधवारी तीन विशेष रेल्वेगाड्या नागपुरात दाखल झाल्या. यात ३३० प्रवासी बिलासपूर, नवी दिल्ली आणि बंगळूरूला रवाना झाले तर ३४० प्रवासी विविध ठिकाणावरून नागपुरात दाखल झाले. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

ठळक मुद्दे३३० प्रवासी रवाना : रेल्वेस्थानकावर प्रवाशांची झाली गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेने जागोजागी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. बुधवारी तीन विशेष रेल्वेगाड्या नागपुरात दाखल झाल्या. यात ३३० प्रवासी बिलासपूर, नवी दिल्ली आणि बंगळूरूला रवाना झाले तर ३४० प्रवासी विविध ठिकाणावरून नागपुरात दाखल झाले. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.नागपूर रेल्वेस्थानकावर बुधवारी तीन विशेष रेल्वेगाड्या दाखल झाल्या. सकाळी ५.५० वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०२४४२ नवी दिल्ली-बिलासपूर ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या गाडीतून १९० प्रवासी बिलासपूरकडे रवाना झाले तर १४२ प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. त्यानंतर सकाळी ११ वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०२४९२ नवी दिल्ली-बंगळूरू एक्स्प्रेस आली. या गाडीतून ३९ प्रवासी सिकंदराबादला रवाना झाले तर नागपूर रेल्वेस्थानकावर १२३ प्रवासी उतरले. प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या आत जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात आला. बाहेर पडताना आरपीएफ ठाण्याच्या शेजारील जिन्यावरून बाहेर सोडण्यात आले. बाहेरगावी जाणाऱ्या आणि नागपुरात उतरलेल्या प्रत्येक प्रवाशाची स्क्रिनिंग केल्यानंतरच त्यांना रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर सोडण्यात आले. विमानतळाप्रमाणे प्रवासाच्या एक तास आधीपर्यंत प्रवाशांना आत सोडण्यात आले. दुपारी ३.३६ वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०२६९१ बंगळूरू-नवी दिल्ली एक्स्प्रेस आली. या गाडीतून १०१ प्रवासी नवी दिल्लीकडे रवाना झाले तर ७५ प्रवासी खाली उतरले. प्रवाशांना त्यांच्या परिसरात सोडण्यासाठी महापालिकेच्या बसेस रेल्वेस्थानकावर हजर होत्या. अनेक प्रवाशांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले होते. बुधवारीही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर रोखण्यात आले. त्यामुळे अनेक प्रतिनिधी रेल्वेस्थानकावर येऊन आल्यापावली परत गेले.३४० प्रवाशांना केले होम क्वारंटाईन

नागपूर रेल्वेस्थानकावर उतरलेल्या ३४० प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार या प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारल्यानंतर त्यांना रेल्वेस्थानकाच्या बाहेर सोडले. या प्रवाशांना १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केल्या.प्रवाशांची झाली गैरसोयरेल्वेस्थानकावर गाडीतून उतरलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली. परंतु तपासणी करताना ऐनवेळी तीन थर्मल स्क्रिनिंग मशीन बंद पडल्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसून रहावे लागले. यात रेल्वेने प्रत्येक प्रवाशाची माहिती, मोबाईल क्रमांक, पत्ता नोंदवून घेतल्यामुळेही प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडण्यासाठी एक तास वेळ लागला. किमान रेल्वे प्रशासनाने चांगल्या थर्मल स्क्रिनिंग मशीन उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.जिना उतरताना प्रवाशांना होतोय त्रासरेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकाच्या आत जाणाऱ्या प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देणे सुरु केले आहे तर बाहेर पडताना आरपीएफ ठाण्याच्या शेजारील जिन्यावरून उतरून प्रवाशांना बाहेर पडावे लागत आहे. यात सामान घेऊन ४० पायऱ्या उतरताना प्रवाशांची दमछाक होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना सामान घेऊन उतरताना तसेच महिलांना आपल्या मुलांना कडेवर घेऊन उतरताना मोठा त्रास होत आहे. आत जाताना प्रवाशांना एक तासापूर्वी आत सोडण्यात येत आहे. त्यामुळे बाहेर पडताना प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर जाऊ द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी