शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भाजपचे ३३४ मतदार सहलीला, काँग्रेसच्या हाती कुणी लागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 16:26 IST

काँग्रेस नेत्यांकडून घोडेबाजार करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. आपल्या मतदारांना प्रलोभने दिली जात आहेत, असा दावा करत भाजपने आपले ३३४ मतदार सहलीला पाठवले आहेत. हे सर्व मतदार ९ डिसेंबरच्या रात्री परततील.

ठळक मुद्देबावनकुळेंनी सोडला सुटकेचा श्वास काँग्रेस म्हणते, निकाल फिरणारच

नागपूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने भाजप-संघ परिवारातील उमेदवार घेतला. काँग्रेसच्या या चालीपासून सावध भूमिका घेत भाजपने लागलीच आपले मतदार एकत्र केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने आपल्या ३३४ मतदारांना पर्यटनाला पाठवून सुटकेचा श्वास सोडला आहे.

भाजपकडून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेसने रवींद्र भोयर यांना रिंगणात उतरवले आहे. अपक्ष मंगेश देशमुख यांनीही माघार घेतलेली नाही. भाजपचे संख्याबळ जास्त असले, तरी आपले मतदार फुटू नयेत म्हणून अधिक काळजी घेतली जात आहे.

काँग्रेस नेत्यांकडून घोडेबाजार करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. आपल्या मतदारांना प्रलोभने दिली जात आहेत, असा दावा करत भाजपने आपले ३३४ मतदार सहलीला पाठवले आहेत. हे सर्व मतदार ९ डिसेंबरच्या रात्री परततील. विजयासाठी २५६ मतांची आवश्यकता आहे. बहुमतासाठी लागणाऱ्या आकड्यापेक्षा जास्त मतदार आधीच पर्यटनासाठी रवाना केल्यामुळे बावनकुळे यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

महाविकास आघाडीची भिस्त पालकमंत्री नितीन राऊत व क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर आहे. काँग्रेस नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या मतदारांसह बसपा, अपक्ष व इतर मतदारांना संपर्क साधला जात आहे. भाजपमध्ये अंतर्गत खदखद आहे. आपले मतदार नाराजीतून फुटतील, या भीतीने भाजपने मतदारांना पर्यटनासाठी नेले आहे. मात्र, निकालानंतर चित्र बदललेले दिसेल, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक मनावर घेतली असताना, ३३४ मतदार एकत्र करून रवाना केले असताना त्यातील एक मोठा गट फुटेल का, हा प्रश्नच आहे.

भाजप नगरसेवक सहकुटुंब रवाना

भाजपच्या नगरसेवकांसोबत त्यांचे कुटुंबीयही पिकनिकसाठी रवाना झाले. रविवारी रात्री भाजपचे काही नगरसेवक गोवा व महाबळेश्वरच्या पिकनिकसाठी रवाना झाले. तर सोमवारी पुन्हा नगरसेवकाचे तीन गट रवाना झाले. आमदार कृष्णा खोपडे यांच्यासोबत नगरसेवकांचे एक पथक उज्जैनकडे बसने रवाना झाले. तेथून ते अहमदाबाद जाणार आहेत. रात्री ८.३० वाजता नगरसेवकांचा एक गट कर्नाटकसाठी रवाना झाला. कर्नाटकात नियम कडक केल्याने तेथील बंगळूरू विमानतळावर उतरून दिल्लीला रवाना होणार आहे. रात्री ११.३० वाजता एक गट जम्मू व उत्तराखंडसाठी रवाना झाला. 

परतल्यानंतर पेंच रिसोर्टमध्ये व्यवस्था

भाजपचे मतदार ८ डिसेंबर रोजी परत येणार आहेत. पिकनिकवरून परतल्यानंतर नगरसेवकांच्या कुटुंबीयांना घरी सोडण्यात येईल. तर संपूर्ण नगरसेवक पेंचमध्ये एका रिसोर्टवर थांबतील. तेथून सरळ मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर आणले जाईल.

टॅग्स :Politicsराजकारण