शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

नागपूर विभागातील ३२ हजार शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 10:56 IST

एकट्या नागपूर विभागाचाच विचार केला तर विभागातील तब्बल ३१,९३० लाभार्थी शेतकरी अजूनही राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्दे २,१६,१६० पैकी १,८४,२३० शेतकरी कर्जमुक्तचंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११,६७५ शेतकऱ्यांचा समावेश

आनंद डेकाटेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. परंतु अजूनही हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. एकट्या नागपूर विभागाचाच विचार केला तर विभागातील तब्बल ३१,९३० लाभार्थी शेतकरी अजूनही राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११,६७५ लाभार्थी शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर वर्धा येथील ६,०३३, भंडारा येथील ५,४९० शेतकऱ्यांचा क्रमांक लागतो.या योजनेंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. या योजनेत कुणालाही अर्ज करायचा नाही. केवळ आधार प्रमाणिकरण करायचे आहे. ज्यांचे आधार प्रमाणिकरण असेल त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. नागपूर विभागाचा विचार केला तर नागपुरातील बँकांकडून या योजनेसाठी एकूण २ लाख ४४ हजार १४० शेतकऱ्यांचे खाते अपलोड करण्यात आले होते. यापैकी २ लाख २८ हजार ६१८ खाते आधारप्रमाणिकरणासाठी प्राप्त झाले. यापैकी २ लाख १६ हजार १६० शेतकऱ्यांचे खाते प्रमाणिकरण झाले. या प्रमाणिकरण झालेल्या खात्यापैकी १ लाख ८४ हजार २३० सभासदांच्या खात्यात शासनाने रक्कम जमा केली म्हणजेच ही खाती कर्जमुक्त झाली. ३१ हजार ९३० लाभार्थी शेतकरी अजूनही कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. नागपूर विभागात आतापर्यंत एकूण १२६८ कोटी लाख रुपयांची कर्जमाफी झालेली आहे.१२,४५८ लाभार्थी शेतकरी आधार प्रमाणिकरणात अडकलेयाशिवाय नागपूर विभागातील १२,४५८ लाभार्थी शेतकरी हे आधार प्रमाणिकरणात अडकले आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ३,०४५, वर्धा ३,३००, भंडारा २,८४९, गोंदिया १,०५९, चंद्रपूर १,९२२ आणि गडचिरोली येथील २८३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :agricultureशेती