शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

देशात मागील तीन वर्षांत रेल्वे ट्रॅकवर ३२ हजार जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशभरातील मागील तीन वर्षांत वन्यजीवांचा रेल्वे ट्रॅकवर झालेला मृत्यूचा आकडा डोळे विस्फारायला लावणारा आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशभरातील मागील तीन वर्षांत वन्यजीवांचा रेल्वे ट्रॅकवर झालेला मृत्यूचा आकडा डोळे विस्फारायला लावणारा आहे. मागील तीन वर्षांतील हा आकडा ३२ हजारांच्या घरात असून, यात वाघ, सिंह, बिबट यासह अस्वले, हरिण, गवे, मोर यासारख्या अनेक प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा समावेश आहे. चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावर वाघाच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर हा विषय आता अधिकच गंभीर ठरायला लागला आहे.

२०१९ मध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सभागृहात एका प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे. या माहितीनुसार, २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत गुरेढोरे, सिंह वाघ आणि बिबट्यांसह ३२ हजारांपेक्षा जास्त प्राणी रेल्वे ट्रॅकवर अपघातात मृत झाले. विशेष म्हणजे यात आसाम, ओरिसासह अन्य राज्यांत हत्तींचाही समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. आतापर्यंत ६० आणि यावर्षी जून २०२० पर्यंत पाच हत्ती ठार झाल्याची नोंद रेल्वे विभागाकडे आहे.

मागील काही वर्षांत वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वेचे जाळे वाढत आहे. कमी खर्चात, जलदगतीने आणि जंगलातून जाणाऱ्या कमी अंतराच्या रेल्वेचे जाळे विस्तारत आहे. मागील काळात गोंदिया-वडसा-चंद्रपूर हा रेल्वेमार्ग तयार झाला. चंद्रपूर ते गोंदिया हा नॅरोगेज ब्रॉडगेज झाला. अमरावती-मेळघाट हा नॅरोगेजही ब्रॉडगेज होत आहे. नागपूर-यवतमाळ-नांदेड हा रेल्वेमार्गही जंगलातून जाणार आहे. या नव्याने होणाऱ्या मार्गांवर असलेल्या वनक्षेत्रातून रेल्वे जाताना या ठिकाणी खबरदारी घेतली जावी, वेगमर्यादा कमी असावी, रुळावर खाद्यपदार्थ फेकू नये, रुळावर वन्यजीव असल्यास तशी सूचना देणारी अत्याधुनिक सूचना यंत्रणा लावणे रेल्वेला बंधनकारक केले जावे, वन्यजीव व्यवस्थापन आराखडा तयार करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आपण यापूर्वीच केल्याचे ग्रीन प्लानेट सोसायटीचे प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रेल्वे प्रशासनासह राज्य, केंद्रीय वन्यजीव विभाग, व्याघ्र प्राधिकरण यांच्याकडेही ही मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात ‘लोकमत’कडे प्रतिक्रिया देताना वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे महाराष्ट्र समन्वयक प्रफुल्ल भांबूरकर म्हणाले, रेल्वे रुळावरील वन्यजीव मृत्यूंची संख्या गंभीर रेल्वेने जंगलातून जाणाऱ्या सर्व मार्गांसाठी दर कि.मी. अंतरात अंडरपास द्यावे, मार्गाला जाळीचे कुंपण केले जावे, रात्री व दिवसा ताशी गती निर्धारित केली जावी. लाइन कन्वर्शन होताना याची खबरदारी रेल्वेने घ्यावी. तसा पत्रव्यवहार होऊनही रेल्वे खाते मात्र गंभीर नाही, त्याचा हा परिणाम आहे.

...

रेल्वे ट्रॅकवरील प्राणी मृत्यूची आकडेवारी

वर्ष : प्राणी

२०१६ : ७,९४५

२०१७ : ११,६८३

२०१८ : १२,६२५

२०१९ : ३,४७९

...

चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्ग ठरतोय संवेदनशील

चंद्रपूर-गोंदिया हा रेल्वे मार्ग अलीकडे या बाबतीत संवेदनशील ठरायला लागला आहे. या रेल्वे मार्गावर दोन दिवसांपूर्वी वाघाचे बछडे मारले गेले. यापूर्वी चंद्रपूरजवळ २०१३ मध्ये २ आणि २०१८ मध्ये वाघांचे ३ बछडे चिरडले गेले. गवे, बिबट, हरिण आणि अनेक लहान वन्यजीव रोज कुठे ना कुठे चिरडले जातात. तक्रारी करूनही रेल्वे आणि वन्यजीव विभाग फारसे गंभीर दिसत नाही.

...