शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

३१६७ प्रकल्पग्रस्तांना नोकरीची प्रतीक्षा

By admin | Updated: August 22, 2016 02:51 IST

महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, भुसावळ आणि नाशिक येथील औष्णिक वीज केंद्राच्या

५७०८ प्रकल्पग्रस्तांना मिळाला हक्क : चंद्रपूरमध्ये सर्वाधिक संधी नागपूर : महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, भुसावळ आणि नाशिक येथील औष्णिक वीज केंद्राच्या प्रकल्पाकरिता ज्या लोकांची जमीन संपादित करण्यात आली त्या एकूण ८८७५ प्रकल्पग्रस्त उमेदवारांपैकी ३० जून २०१६ पर्यंत ५७०८ प्रकल्पग्रस्त उमेदवारांना महानिर्मितीने नोकरीत समावून घेतले आहे. यात चंद्रपूरमध्ये सर्वाधिक प्रकल्पग्रस्त उमेदवारांना सामावून घेण्यात आले आहे. ३१६७ प्रकल्पग्रस्त अजूनही प्रतीक्षेत आहेत. शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती विचारली होती. महानिर्मितीने त्यांना यासंदर्भात माहिती उपलब्ध करून दिली आहे. महानिर्मितीनीच्या चंद्रपूर येथील वीज केंद्रात सर्वाधिक २६६९ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. चंद्रपूर येथे एकूबण ३४०६ प्रकल्पग्रस्त होते. त्यापैकी ७३७ प्रकल्पग्रस्तांना अजूनही सामावून घेण्यात आलेले नाही. त्यानंतर कोराडी येथील वीज केंद्रात १८९८ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यात आले. १५२ प्रकल्पग्रस्त प्रतीक्षेत आहेत. भुसावळ येथे ६६४ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले, ६९६ प्रतीक्षेत, नाशिक येथे ३६५ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले. १२२७ प्रतीक्षेत आहेत. खापरखेडा येथे ७५ व पारस येथे ३९ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले असून अनुक्रमे ११० व २४५ प्रकल्पग्रस्त प्रतीक्षेत आहेत. याशिवाय पारस येथील दोन प्रकल्पग्रस्तांना नोकरी ऐवजी एकमुश्त ५ लाख रुपये प्रदान करण्यात आले. ज्या उमेदवारांना तांत्रिक अर्हता किंवा इतर कारणांमुळे सामावून घेता आले नाही, अशा प्रकल्पग्रस्त उमेदवारांना आयटीआयचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी दोन हजार रुपये दरमहा विद्यावेतन दिले जाते. ज्यांना आयटीआयमध्ये प्रवेश मिळत नाही, अशा उमेदवारांना पोफळी जल विद्युत केंद्र नाशिक व भुसावळ विद्युत केंद्राच्या आवारात मुलभूत व अनुषांगिक सूचना केंद्र सुरु करण्यात आले आहे. यात उमेदवारांना प्रथम दोन वर्षाकरिता दोन हजार रुपये दरमहा व तिसऱ्या वर्षाकरिता सहा हजार रुपये इतके विद्यावेतन दिले जते. तसेच आयटीआय उत्तीर्ण प्रकल्पग्रस्तांना प्रगत कुशल प्रशिक्षणावर सामावून घेण्यात येते. तेव्हा त्यांना आठ हजार रुपये दरमहा इतके विद्यावेतन दिले जाते. दरवर्षी ३० जून व ३१ डिसेंबर या दिवशी तीन वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना दहा हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येते. (प्रतिनिधी)