शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

३१६७ प्रकल्पग्रस्तांना नोकरीची प्रतीक्षा

By admin | Updated: August 22, 2016 02:51 IST

महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, भुसावळ आणि नाशिक येथील औष्णिक वीज केंद्राच्या

५७०८ प्रकल्पग्रस्तांना मिळाला हक्क : चंद्रपूरमध्ये सर्वाधिक संधी नागपूर : महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, भुसावळ आणि नाशिक येथील औष्णिक वीज केंद्राच्या प्रकल्पाकरिता ज्या लोकांची जमीन संपादित करण्यात आली त्या एकूण ८८७५ प्रकल्पग्रस्त उमेदवारांपैकी ३० जून २०१६ पर्यंत ५७०८ प्रकल्पग्रस्त उमेदवारांना महानिर्मितीने नोकरीत समावून घेतले आहे. यात चंद्रपूरमध्ये सर्वाधिक प्रकल्पग्रस्त उमेदवारांना सामावून घेण्यात आले आहे. ३१६७ प्रकल्पग्रस्त अजूनही प्रतीक्षेत आहेत. शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती विचारली होती. महानिर्मितीने त्यांना यासंदर्भात माहिती उपलब्ध करून दिली आहे. महानिर्मितीनीच्या चंद्रपूर येथील वीज केंद्रात सर्वाधिक २६६९ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. चंद्रपूर येथे एकूबण ३४०६ प्रकल्पग्रस्त होते. त्यापैकी ७३७ प्रकल्पग्रस्तांना अजूनही सामावून घेण्यात आलेले नाही. त्यानंतर कोराडी येथील वीज केंद्रात १८९८ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यात आले. १५२ प्रकल्पग्रस्त प्रतीक्षेत आहेत. भुसावळ येथे ६६४ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले, ६९६ प्रतीक्षेत, नाशिक येथे ३६५ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले. १२२७ प्रतीक्षेत आहेत. खापरखेडा येथे ७५ व पारस येथे ३९ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले असून अनुक्रमे ११० व २४५ प्रकल्पग्रस्त प्रतीक्षेत आहेत. याशिवाय पारस येथील दोन प्रकल्पग्रस्तांना नोकरी ऐवजी एकमुश्त ५ लाख रुपये प्रदान करण्यात आले. ज्या उमेदवारांना तांत्रिक अर्हता किंवा इतर कारणांमुळे सामावून घेता आले नाही, अशा प्रकल्पग्रस्त उमेदवारांना आयटीआयचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी दोन हजार रुपये दरमहा विद्यावेतन दिले जाते. ज्यांना आयटीआयमध्ये प्रवेश मिळत नाही, अशा उमेदवारांना पोफळी जल विद्युत केंद्र नाशिक व भुसावळ विद्युत केंद्राच्या आवारात मुलभूत व अनुषांगिक सूचना केंद्र सुरु करण्यात आले आहे. यात उमेदवारांना प्रथम दोन वर्षाकरिता दोन हजार रुपये दरमहा व तिसऱ्या वर्षाकरिता सहा हजार रुपये इतके विद्यावेतन दिले जते. तसेच आयटीआय उत्तीर्ण प्रकल्पग्रस्तांना प्रगत कुशल प्रशिक्षणावर सामावून घेण्यात येते. तेव्हा त्यांना आठ हजार रुपये दरमहा इतके विद्यावेतन दिले जाते. दरवर्षी ३० जून व ३१ डिसेंबर या दिवशी तीन वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना दहा हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येते. (प्रतिनिधी)