शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

सिंचन घोटाळ्यावर ३१३४ पानांची तक्रार

By admin | Updated: February 27, 2015 02:09 IST

जनमंच या सामाजिक संस्थेतर्फे गुरुवारी विदर्भातील सिंचन प्रकल्पांत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात एकूण १२ खंडांमध्ये ३१३४ पानांची तक्रार

नागपूर : जनमंच या सामाजिक संस्थेतर्फे गुरुवारी विदर्भातील सिंचन प्रकल्पांत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात एकूण १२ खंडांमध्ये ३१३४ पानांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलीस अधीक्षकांसमक्ष सादर करण्यात आली. या पुराव्यांच्या आधारावर पारदर्शी व कठोर चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची संस्थेची मागणी आहे.या तक्रारीत एकट्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या निविदेवर केलेल्या अभ्यासाचा लेखाजोखा आहे. प्रकल्पाच्या निविदेची कागदपत्रे मिळवून सखोल पडताळणी केल्यानंतर प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले. कंत्राटदार व महामंडळाचे अधिकारी यांनी संगनमताने कट रचून हा घोटाळा केला, असा दावा जन मंचने केला आहे. निविदेवर कंत्राटदारांच्या बोलीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या अपेक्षित खर्चामध्ये अवाढव्य वाढ केली. कंत्राटदारांची बोली व प्रकल्पाचा अपेक्षित खर्च यात पाच टक्क्यांपेक्षा जास्त फरक राहू नये यासाठी हा गैरप्रकार करण्यात आला. हा फरक पाच टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागते. वित्त विभागाचा हस्तक्षेप टाळण्यासाठी व महामंडळाच्या अधिकारक्षेत्राखालीच खर्चाला मंजुरी देण्याकरिता अपेक्षित खर्च वाढविण्यात आला.कंत्राटदारांना बांधकामविषयक किमान निकषांचा पुरेसा अनुभव नव्हता. मूल्यमापन समितीने कंत्राटदारांना लाभ पोहोचविण्यासाठी याकडे दुर्लक्ष केले. तसेच, कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराची पुरेशी बोली सादर करण्याची क्षमता नव्हती. त्यांनी सत्य परिस्थिती लपवून महामंडळाची दिशाभूल केली. बोलीच्या प्रक्रियेत काहीच गुणवत्ता नसून तो केवळ एक देखावा होता. सर्व कंत्राटदार एका विशिष्ट कटांतर्गत एकत्र आले होते. त्यांनी स्वत:च्या छुप्या कंपन्यांनाही सहभागी करून घेतले होते. हा घोटाळा फौजदारी कटाचे उदाहरण आहे, याकडे तक्रारीत लक्ष वेधण्यात आले आहे. पुराव्यांमध्ये खोडतोड होण्याची शक्यता पाहता सध्याच्या परिस्थितीत विशिष्ट स्वरुपाची माहिती सादर करता येणार नाही, असेही तक्रारीत स्पष्ट करण्यात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)