शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पाला ३० टक्के कात्री ?

By admin | Updated: January 24, 2016 02:49 IST

महापालिकेच्या २०१५-१६ या वर्षाच्या अर्थसंकल्पात १९४६. १६ कोटींचे उत्पन्न गृहित धरले होते.

आयुक्तांचा सुधारित अर्थसंकल्प : बुधवारी स्थायी समितीला सादर करणारनागपूर : महापालिकेच्या २०१५-१६ या वर्षाच्या अर्थसंकल्पात १९४६. १६ कोटींचे उत्पन्न गृहित धरले होते. परंतु गेल्या आठ महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेला महसूल व आर्थिक स्रोत विचारात घेता आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सुधारित अर्थसंकल्प तयार केला आहे. येत्या बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत तो सादर केला जाणार असून यात स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला ३० टक्के कात्री लागण्याची शक्यता आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी दिली होती. परंतु गेल्या आठ महिन्यातील महापालिकेचे उत्पन्न विचारात घेता आयुक्तांपुढे स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला कात्री लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आयुक्तांचा सुधारित अर्थसंकल्प १३०० ते १३५० कोटींच्या आसपास राहणार आहे. राज्य सरकारने १ आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. या मोबदल्यात सुरुवातीला महापालिकेला दर महिन्याला ३२ कोटींचे अनुदान मिळत होते. नंतर त्यात वाढ करुन ते ५० कोटीपर्यत वाढविले आहे. त्यामुळे मार्चपर्यंत एलबीटीपासून अपेक्षित ४५० कोटीचे उत्पन्न होण्यात कोणतीही अडचण दिसत नाही. परंतु मालमत्ता कर, पाणीपुरवठा, नगररचना विभागाकडून अपेक्षित उत्पन्न तसेच शासनाकडून गृहीत धरलेले अनुदान मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला कात्री लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. इतर बाबीपासून अपेक्षित असलेले उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा होण्याची शक्यता कमीच आहे. याचा परिणाम सुधारित अर्थसंकल्पावर झाला आहे. स्थायी समितीने सादर केलेला अर्थसंकल्प व प्रत्यक्ष उत्पन्न यातील तफावत मागील तीन-चार वर्षात वाढली आहे. परिणामी मंजूर विकास कामांसाठी प्रशासनाकडून निधी उपलब्ध होण्याला विलंब लागत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)विकास कामावर परिणाम होणार नाहीमूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत आयुक्तांच्या सुधारित अर्थसंकल्पात तूट दर्शविण्यात येणार असली तरी स्थायी समितीने मंजूर केलेल्या शहर विकासाच्या कामावर याचा परिणाम होणार नाही. महापालिकेचे आर्थिक स्रोत विचारात घेऊ नच स्थायी समितीने अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे यात फारसा बदल अपेक्षित नाही.रमेश सिंगारे, अध्यक्ष स्थायी समिती,महापालिका