शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी प्रजातींमुळे ३० टक्के पिकांचे नुकसान; निर्मूलनाच्या योजना अपुऱ्या, शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 12:31 IST

Nagpur News राज्यातील कृषी क्षेत्रावर पसरलेल्या विदेशी प्रजातींमुळे सुमारे ३० टक्के पिकांचे नुकसान होत असते. या प्रजातींच्या निर्मूलनासाठी योजना असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत. थातूरमातूर निर्मूलन करून उच्चाटन होत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत आहे.

ठळक मुद्देकृषी आणि पर्यावरण विभागाकडे ठोस उपाययोजना नाही 

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील कृषी क्षेत्रावर पसरलेल्या विदेशी प्रजातींमुळे सुमारे ३० टक्के पिकांचे नुकसान होत असते. या प्रजातींच्या निर्मूलनासाठी योजना असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत. थातूरमातूर निर्मूलन करून उच्चाटन होत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत आहे. मात्र यावर अद्यापही ठोस उपाययोजना अमलात आलेली नाही. (agriculture )

नॅशनल ब्युरो ऑफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेसने या विदेशी प्रजातींवर अध्ययन केले. भारतात सुमारे १८ हजार प्रजाती विदेशी असल्याचे अभ्यासात पुढे आले आहे. एवढेच नाही तर, यामुळे दरवर्षी ३० टक्के पिकांचे नुकसान होते, असेही यात स्पष्ट झाले आहे. विदेशी मूळ असलेल्या या वनस्पती व झाडांमुळे जैवविविधतेवर परिणाम होत असून पर्यावरणाचेही नुकसान होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

भारतात ४० टक्के वनस्पती व वृक्ष विदेशी मुळाची आहेत. यातील ५५ टक्के अमेरिकन आहेत. नॅशनल ब्युरो ऑफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेसच्या अभ्यासानुसार विदेशी मूळ असलेल्या २५ टक्के वनस्पती व झाडे अतिशय आक्रमक असून त्या झपाट्याने वाढतात. देशी झाडांना संपवतात. बेशरम, गाजरगवत, लॅन्टेना या सारख्या वनस्पती हे उत्तम उदाहरण आहे.

कृषी आणि पर्यावरण विभागाकडून यासाठी अद्यापही गंभीरपणे विचार होताना दिसत नाही, याचा खेद आहे. कृषी क्षेत्रासोबतच जंगलातही या वनस्पती वाढत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. कृषी विभागाने चारा वाढविण्यासाठी देशी प्रजाती सुचविण्यासोबतच विदेशी प्रजातींचा नायनाट करणाऱ्या प्रजातींसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे.

- प्रा. गजानन मुरतकर, गवत अभ्यासक, अचलपूर

देशी झाडे व औषधी वनस्पतीवर भर हवा

देशी वृक्ष आणि औषधी वनस्पती पर्यावणाला पूरक आहेत. स्थानिक भूप्रदेशात त्या सहज रुजतात. जैविविधता जोपासण्यासोबत विदेशी वनस्पती संपविण्यासाठी याची गरज आहे. कुसळी, मार्बल, गोंधळी या सारखे उंच वाढणारे देशी प्रजातींचे चारा गवत उपलब्ध असतानाही इंडियन ॲग्रीकल्चर रिसर्च इन्टिट्यूटकडूनही विदेशी प्रजातींचे चारा गवत सुचविले जाते, हे आश्चर्यकारक आहे. कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा प्रा. मुरतकर यांनी व्यक्त केली आहे. वृक्षलागवड मोहिमेतही देशी झाडे लावण्यावरच भर देण्याची गरज पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त होत आहे.

...

टॅग्स :agricultureशेती