शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

विदेशी प्रजातींमुळे ३० टक्के पिकांचे नुकसान; निर्मूलनाच्या योजना अपुऱ्या, शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 12:31 IST

Nagpur News राज्यातील कृषी क्षेत्रावर पसरलेल्या विदेशी प्रजातींमुळे सुमारे ३० टक्के पिकांचे नुकसान होत असते. या प्रजातींच्या निर्मूलनासाठी योजना असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत. थातूरमातूर निर्मूलन करून उच्चाटन होत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत आहे.

ठळक मुद्देकृषी आणि पर्यावरण विभागाकडे ठोस उपाययोजना नाही 

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील कृषी क्षेत्रावर पसरलेल्या विदेशी प्रजातींमुळे सुमारे ३० टक्के पिकांचे नुकसान होत असते. या प्रजातींच्या निर्मूलनासाठी योजना असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत. थातूरमातूर निर्मूलन करून उच्चाटन होत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत आहे. मात्र यावर अद्यापही ठोस उपाययोजना अमलात आलेली नाही. (agriculture )

नॅशनल ब्युरो ऑफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेसने या विदेशी प्रजातींवर अध्ययन केले. भारतात सुमारे १८ हजार प्रजाती विदेशी असल्याचे अभ्यासात पुढे आले आहे. एवढेच नाही तर, यामुळे दरवर्षी ३० टक्के पिकांचे नुकसान होते, असेही यात स्पष्ट झाले आहे. विदेशी मूळ असलेल्या या वनस्पती व झाडांमुळे जैवविविधतेवर परिणाम होत असून पर्यावरणाचेही नुकसान होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

भारतात ४० टक्के वनस्पती व वृक्ष विदेशी मुळाची आहेत. यातील ५५ टक्के अमेरिकन आहेत. नॅशनल ब्युरो ऑफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेसच्या अभ्यासानुसार विदेशी मूळ असलेल्या २५ टक्के वनस्पती व झाडे अतिशय आक्रमक असून त्या झपाट्याने वाढतात. देशी झाडांना संपवतात. बेशरम, गाजरगवत, लॅन्टेना या सारख्या वनस्पती हे उत्तम उदाहरण आहे.

कृषी आणि पर्यावरण विभागाकडून यासाठी अद्यापही गंभीरपणे विचार होताना दिसत नाही, याचा खेद आहे. कृषी क्षेत्रासोबतच जंगलातही या वनस्पती वाढत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. कृषी विभागाने चारा वाढविण्यासाठी देशी प्रजाती सुचविण्यासोबतच विदेशी प्रजातींचा नायनाट करणाऱ्या प्रजातींसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे.

- प्रा. गजानन मुरतकर, गवत अभ्यासक, अचलपूर

देशी झाडे व औषधी वनस्पतीवर भर हवा

देशी वृक्ष आणि औषधी वनस्पती पर्यावणाला पूरक आहेत. स्थानिक भूप्रदेशात त्या सहज रुजतात. जैविविधता जोपासण्यासोबत विदेशी वनस्पती संपविण्यासाठी याची गरज आहे. कुसळी, मार्बल, गोंधळी या सारखे उंच वाढणारे देशी प्रजातींचे चारा गवत उपलब्ध असतानाही इंडियन ॲग्रीकल्चर रिसर्च इन्टिट्यूटकडूनही विदेशी प्रजातींचे चारा गवत सुचविले जाते, हे आश्चर्यकारक आहे. कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा प्रा. मुरतकर यांनी व्यक्त केली आहे. वृक्षलागवड मोहिमेतही देशी झाडे लावण्यावरच भर देण्याची गरज पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त होत आहे.

...

टॅग्स :agricultureशेती