शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी प्रजातींमुळे ३० टक्के पिकांचे नुकसान; निर्मूलनाच्या योजना अपुऱ्या, शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 12:31 IST

Nagpur News राज्यातील कृषी क्षेत्रावर पसरलेल्या विदेशी प्रजातींमुळे सुमारे ३० टक्के पिकांचे नुकसान होत असते. या प्रजातींच्या निर्मूलनासाठी योजना असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत. थातूरमातूर निर्मूलन करून उच्चाटन होत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत आहे.

ठळक मुद्देकृषी आणि पर्यावरण विभागाकडे ठोस उपाययोजना नाही 

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील कृषी क्षेत्रावर पसरलेल्या विदेशी प्रजातींमुळे सुमारे ३० टक्के पिकांचे नुकसान होत असते. या प्रजातींच्या निर्मूलनासाठी योजना असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत. थातूरमातूर निर्मूलन करून उच्चाटन होत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत आहे. मात्र यावर अद्यापही ठोस उपाययोजना अमलात आलेली नाही. (agriculture )

नॅशनल ब्युरो ऑफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेसने या विदेशी प्रजातींवर अध्ययन केले. भारतात सुमारे १८ हजार प्रजाती विदेशी असल्याचे अभ्यासात पुढे आले आहे. एवढेच नाही तर, यामुळे दरवर्षी ३० टक्के पिकांचे नुकसान होते, असेही यात स्पष्ट झाले आहे. विदेशी मूळ असलेल्या या वनस्पती व झाडांमुळे जैवविविधतेवर परिणाम होत असून पर्यावरणाचेही नुकसान होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

भारतात ४० टक्के वनस्पती व वृक्ष विदेशी मुळाची आहेत. यातील ५५ टक्के अमेरिकन आहेत. नॅशनल ब्युरो ऑफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेसच्या अभ्यासानुसार विदेशी मूळ असलेल्या २५ टक्के वनस्पती व झाडे अतिशय आक्रमक असून त्या झपाट्याने वाढतात. देशी झाडांना संपवतात. बेशरम, गाजरगवत, लॅन्टेना या सारख्या वनस्पती हे उत्तम उदाहरण आहे.

कृषी आणि पर्यावरण विभागाकडून यासाठी अद्यापही गंभीरपणे विचार होताना दिसत नाही, याचा खेद आहे. कृषी क्षेत्रासोबतच जंगलातही या वनस्पती वाढत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. कृषी विभागाने चारा वाढविण्यासाठी देशी प्रजाती सुचविण्यासोबतच विदेशी प्रजातींचा नायनाट करणाऱ्या प्रजातींसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे.

- प्रा. गजानन मुरतकर, गवत अभ्यासक, अचलपूर

देशी झाडे व औषधी वनस्पतीवर भर हवा

देशी वृक्ष आणि औषधी वनस्पती पर्यावणाला पूरक आहेत. स्थानिक भूप्रदेशात त्या सहज रुजतात. जैविविधता जोपासण्यासोबत विदेशी वनस्पती संपविण्यासाठी याची गरज आहे. कुसळी, मार्बल, गोंधळी या सारखे उंच वाढणारे देशी प्रजातींचे चारा गवत उपलब्ध असतानाही इंडियन ॲग्रीकल्चर रिसर्च इन्टिट्यूटकडूनही विदेशी प्रजातींचे चारा गवत सुचविले जाते, हे आश्चर्यकारक आहे. कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा प्रा. मुरतकर यांनी व्यक्त केली आहे. वृक्षलागवड मोहिमेतही देशी झाडे लावण्यावरच भर देण्याची गरज पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त होत आहे.

...

टॅग्स :agricultureशेती