शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

राज्यात सहा महिन्यांत २९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:55 IST

अवघ्या सहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात दहा-वीस नव्हे तर तब्बल दोन हजार ९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी गृह खात्याच्या अहवालातून पुढे आली आहे.

ठळक मुद्देटोळी सक्रिय असल्याचा संशय देहव्यापार, आखाती देशात नेल्याचा कयास

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अवघ्या सहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात दहा-वीस नव्हे तर तब्बल दोन हजार ९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी गृह खात्याच्या अहवालातून पुढे आली आहे. हा आकडा पाहता अपहरण करणाऱ्या टोळ्याच राज्यात सक्रिय असाव्या, असा संशय व्यक्त केला जात आहे.राज्यात रोज कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार प्राप्त होते. अनेकदा लग्नाचे आमिष देऊन मुलीला पळविले गेले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होते. पुढे अशा मुलींचा शोध घेऊन एक तर त्यांना पालकांच्या ताब्यात दिले जाते किंवा सुधारगृहात पाठविले जाते. परंतु अशी प्रकरणे फारच कमी असतात. बहुतांश प्रकरणात अल्पवयीन मुलीचा थांगपत्ताच लागत नाही. मुलींचा शोध घ्यावा म्हणून त्यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यापासूून महासंचालक कार्यालय व गृह मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार करतात. परंतु ‘शोध सुरू आहे’, एवढेच ठेवणीतील उत्तर मिळते. आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर अनेकदा नातेवाईक स्वबळावर शोध घेण्याचाही प्रयत्न करतात. परंतु त्यांना यश येतेच असे नाही.जानेवारी ते जून २०१७ या सहा महिन्यात राज्यात तब्बल दोन हजार ९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. २०१६ मध्ये जानेवारी ते जूनचा हा आकडा दोन हजार ८८१ एवढा होता. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१७ मध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण ८४ ने वाढले आहे. अशा मुलींना भुलवून पळवून नेणारी टोळी राज्यात सक्रिय असावी, या मुलींचा देहव्यापार, लव्हजिहाद, आखाती देशातील वेश्या व्यवसाय, परप्रांतातील विवाह, घरकामयासाठी वापर केला जात असावा, असा संशय आहे.टोळी सक्रिय असण्याची शक्यता मात्र गृह खात्याकडून फेटाळण्यात आली आहे. अशा घटना टाळण्यासाठी अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष, थेट अपहाराचा गुन्हा, स्वतंत्र पथक, प्रबोधन-जनजागृती आदी विविध उपाययोजना व जनजागृती केली जात असल्याचे शासनाकडून सांगितले जाते.परंतु अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याचा वाढता आकडालक्षात घेता या उपाययोजना थिट्या ठरत आहेत.

‘आॅपरेशन’द्वारे शोधाशोधहरविलेल्या बालकांच्या शोधार्थ आॅपरेशन मुस्कान, आॅपरेशन स्माईल राबविले जाते. २०१६ मध्ये या आॅपरेशनमधून हरविलेल्या एक हजार ६१३ तर २०१७ मध्ये ६४५ बालकांचा शोध लावण्यात आला आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरण