शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सहा महिन्यांत २९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:55 IST

अवघ्या सहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात दहा-वीस नव्हे तर तब्बल दोन हजार ९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी गृह खात्याच्या अहवालातून पुढे आली आहे.

ठळक मुद्देटोळी सक्रिय असल्याचा संशय देहव्यापार, आखाती देशात नेल्याचा कयास

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अवघ्या सहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात दहा-वीस नव्हे तर तब्बल दोन हजार ९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी गृह खात्याच्या अहवालातून पुढे आली आहे. हा आकडा पाहता अपहरण करणाऱ्या टोळ्याच राज्यात सक्रिय असाव्या, असा संशय व्यक्त केला जात आहे.राज्यात रोज कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार प्राप्त होते. अनेकदा लग्नाचे आमिष देऊन मुलीला पळविले गेले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होते. पुढे अशा मुलींचा शोध घेऊन एक तर त्यांना पालकांच्या ताब्यात दिले जाते किंवा सुधारगृहात पाठविले जाते. परंतु अशी प्रकरणे फारच कमी असतात. बहुतांश प्रकरणात अल्पवयीन मुलीचा थांगपत्ताच लागत नाही. मुलींचा शोध घ्यावा म्हणून त्यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यापासूून महासंचालक कार्यालय व गृह मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार करतात. परंतु ‘शोध सुरू आहे’, एवढेच ठेवणीतील उत्तर मिळते. आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर अनेकदा नातेवाईक स्वबळावर शोध घेण्याचाही प्रयत्न करतात. परंतु त्यांना यश येतेच असे नाही.जानेवारी ते जून २०१७ या सहा महिन्यात राज्यात तब्बल दोन हजार ९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. २०१६ मध्ये जानेवारी ते जूनचा हा आकडा दोन हजार ८८१ एवढा होता. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१७ मध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण ८४ ने वाढले आहे. अशा मुलींना भुलवून पळवून नेणारी टोळी राज्यात सक्रिय असावी, या मुलींचा देहव्यापार, लव्हजिहाद, आखाती देशातील वेश्या व्यवसाय, परप्रांतातील विवाह, घरकामयासाठी वापर केला जात असावा, असा संशय आहे.टोळी सक्रिय असण्याची शक्यता मात्र गृह खात्याकडून फेटाळण्यात आली आहे. अशा घटना टाळण्यासाठी अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष, थेट अपहाराचा गुन्हा, स्वतंत्र पथक, प्रबोधन-जनजागृती आदी विविध उपाययोजना व जनजागृती केली जात असल्याचे शासनाकडून सांगितले जाते.परंतु अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याचा वाढता आकडालक्षात घेता या उपाययोजना थिट्या ठरत आहेत.

‘आॅपरेशन’द्वारे शोधाशोधहरविलेल्या बालकांच्या शोधार्थ आॅपरेशन मुस्कान, आॅपरेशन स्माईल राबविले जाते. २०१६ मध्ये या आॅपरेशनमधून हरविलेल्या एक हजार ६१३ तर २०१७ मध्ये ६४५ बालकांचा शोध लावण्यात आला आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरण