शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

२९ दलालांचे परवाने रद्द

By admin | Updated: April 30, 2016 03:07 IST

शहरातील ठोक भाजीबाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत नसून, तो शहरातील मध्यवस्तीत भरतो.

शेतकऱ्यांकडून सेस वसुली सुरूच : भाजीबाजार स्थानांतरणाला दलालांचा विरोधबाबा टेकाडे सावनेर शहरातील ठोक भाजीबाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत नसून, तो शहरातील मध्यवस्तीत भरतो. या बाजारात कार्यरत असलेल्या २९ दलालांनी बाजार समितीच्या नियमांचे पालन न करता त्यांचे परवान्यांचे नियोजित काळात नूतनीकरण केले नाही. परिणामी, या सर्वांचे परवाने बाजार समिती प्रशासनाने रद्द केले आहे. तरीही सदर दलाल शेतकऱ्यांकडून वाजवीपेक्षा अधिक सेस वसूल करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या भाजीबाजारात एकूण २९ दलाल कार्यरत आहेत. त्या सर्वांना पणन संचालनालयाच्या नियम व अटींना आधीन राहून बाजार समिती प्रशासनाने दलालीचे परवाने अदा केले होते. या सर्वांच्या परवान्यांची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली. सदर दलाल बाजार समितीच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करीत असल्याने बाजार समिती प्रशासनाने कुणाच्याही परवान्याचे नूतनीकरण केले नाही. परिणामी, या दलालांना बाजारात दलाली करण्याचा कोणताही अधिकार राहिला नाही. तरीही हे दलाल मनमानी करीत शेतकऱ्यांकडून वाजवीपेक्षा अधिक सेस वसूल करीत आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. वास्तवात, या दलालांवर कुणाचाही अंकुश नसल्याने ते बाजार समितीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. या संदर्भात बाजार समिती प्रशासनाने या दलालांना वारंवार स्मरणपत्र देऊन बजावले तरीही, उपयोग झाला नाही. परिणामी, दलाल बाजार समितीच्या मार्केट यार्डात खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायला तयार नाही. दुसरीकडे, हा भाजीबाजार शहराच्या मध्यभागी असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत असल्याने या दलालांनी त्यांचा हा व्यवहार मार्कट यार्डात करण्याच्या भूमिकेवर बाजार समिती ठाम आहे. सावनेर शहरातील ठोक भाजीबाजार स्थानांतरणाला दलालांचा विरोध आहे. बाजार समिती व दलाल यांच्या लढाईत शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून, स्थानिक नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. दलालांनी बाजार समितीच्या नियमानुसार त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करवून घेतल्यास तसेच नियमानुसार व्यवसाय केल्यास सर्वांच्या सोयीचे ठरणार आहे. दलाल मनमानी करीत असल्याने त्यांनी भाजीबाजारात केलेले अतिक्रमण नगर परिषद प्रशासनाने हटवावे. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केल्याशिवाय या भाजीबाजाराचे स्थानांतरण होणार नाही, अशा प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केल्या.