शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

२९ दलालांचे परवाने रद्द

By admin | Updated: April 30, 2016 03:07 IST

शहरातील ठोक भाजीबाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत नसून, तो शहरातील मध्यवस्तीत भरतो.

शेतकऱ्यांकडून सेस वसुली सुरूच : भाजीबाजार स्थानांतरणाला दलालांचा विरोधबाबा टेकाडे सावनेर शहरातील ठोक भाजीबाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत नसून, तो शहरातील मध्यवस्तीत भरतो. या बाजारात कार्यरत असलेल्या २९ दलालांनी बाजार समितीच्या नियमांचे पालन न करता त्यांचे परवान्यांचे नियोजित काळात नूतनीकरण केले नाही. परिणामी, या सर्वांचे परवाने बाजार समिती प्रशासनाने रद्द केले आहे. तरीही सदर दलाल शेतकऱ्यांकडून वाजवीपेक्षा अधिक सेस वसूल करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या भाजीबाजारात एकूण २९ दलाल कार्यरत आहेत. त्या सर्वांना पणन संचालनालयाच्या नियम व अटींना आधीन राहून बाजार समिती प्रशासनाने दलालीचे परवाने अदा केले होते. या सर्वांच्या परवान्यांची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली. सदर दलाल बाजार समितीच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करीत असल्याने बाजार समिती प्रशासनाने कुणाच्याही परवान्याचे नूतनीकरण केले नाही. परिणामी, या दलालांना बाजारात दलाली करण्याचा कोणताही अधिकार राहिला नाही. तरीही हे दलाल मनमानी करीत शेतकऱ्यांकडून वाजवीपेक्षा अधिक सेस वसूल करीत आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. वास्तवात, या दलालांवर कुणाचाही अंकुश नसल्याने ते बाजार समितीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. या संदर्भात बाजार समिती प्रशासनाने या दलालांना वारंवार स्मरणपत्र देऊन बजावले तरीही, उपयोग झाला नाही. परिणामी, दलाल बाजार समितीच्या मार्केट यार्डात खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायला तयार नाही. दुसरीकडे, हा भाजीबाजार शहराच्या मध्यभागी असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत असल्याने या दलालांनी त्यांचा हा व्यवहार मार्कट यार्डात करण्याच्या भूमिकेवर बाजार समिती ठाम आहे. सावनेर शहरातील ठोक भाजीबाजार स्थानांतरणाला दलालांचा विरोध आहे. बाजार समिती व दलाल यांच्या लढाईत शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून, स्थानिक नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. दलालांनी बाजार समितीच्या नियमानुसार त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करवून घेतल्यास तसेच नियमानुसार व्यवसाय केल्यास सर्वांच्या सोयीचे ठरणार आहे. दलाल मनमानी करीत असल्याने त्यांनी भाजीबाजारात केलेले अतिक्रमण नगर परिषद प्रशासनाने हटवावे. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केल्याशिवाय या भाजीबाजाराचे स्थानांतरण होणार नाही, अशा प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केल्या.