शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात २८२९ घटस्फोट

By admin | Updated: September 30, 2015 06:24 IST

फेसबुक, व्हॉटस्अप या सोशल नेटवर्किंगच्या स्वैर वापरातून वैवाहिक जीवनाचे बंध तुटत आहेत. अनेकांच्या संसाराचा

नागपूर : फेसबुक, व्हॉटस्अप या सोशल नेटवर्किंगच्या स्वैर वापरातून वैवाहिक जीवनाचे बंध तुटत आहेत. अनेकांच्या संसाराचा प्रारंभ बिंदूच अखेरचा ठरत आहे. संसाराची नाव पैलतीरावर पोहोचण्यापूर्वी तडे जात आहेत. पती-पत्नीच्या एकत्र सहमतीने दररोज सरासरी तीन जोडप्यांचे विवाहसंबंध विच्छेदित होत आहे. या भयावह स्थितीने विवाहसंस्थाच आता धोक्यात आली आहे. १ जानेवारी २०१२ ते ३१ आॅगस्ट २०१५ या कालावधीत नागपूर येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी ३२९० प्रकरणे दाखल झाली होती. यापैकी २८२९ प्रकरणांत न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे. अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारांतर्गत देण्यात आलेल्या माहितीतून ही बाब पुढे आली आहे. वर्षनिहाय आकडेवारीनुसार, २०१२ मध्ये ७९४, २०१३ मध्ये ८८९, २०१४ मध्ये ९२९ तर, १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत ६७८ प्रकरणे घटस्फोटासाठी दाखल झाली होती. या काळात अनुक्रमे ८०९, ७८८, ७७८ व ४५४ प्रकरणात घटस्फोट मंजूर झाले. (प्रतिनिधी)अशी आहे अन्य आकडेवारी४संबंधित काळात आपसी सहमतीने घटस्फोट मिळण्यासाठी १८२८, स्त्रीधनासाठी २२७, पोटगीसाठी ३६४ तर, मुलांच्या ताब्यासाठी २३५ दावे दाखल झाले होते. ३१ आॅगस्टपर्यंत एकूण ७२६१ प्रकरणे प्रलंबित होते. यात ५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ४८ तर, १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ३ प्रकरणांचा समावेश आहे. एकूण प्रकरणांपैकी २३४३ प्रकरणांत पोटगी व स्त्रीधन मंजूर झाले.समुपदेशनाचा लाभयोग्य समुपदेशन व इतर कारणांमुळे अनेक दाम्पत्यांचे विवाहबंधन कायम राहिले. २०१२ मध्ये २११, २०१३ मध्ये २६७, २०१४ मध्ये २२२ तर, १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१५ या कालावधीत १६९ प्रकरणांत घटस्फोट टळले. याप्रकरणातील दाम्पत्यांची मने जवळजवळ दुरावली होती. ते एकमेकांसोबत राहण्यास तयार नव्हते. एकत्र बसवून वाद मिटविल्यामुळे घटस्फोटाचा विचार मागे पडला.