शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

हायकोर्टात न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त, नागपूरला प्रतिनिधित्व मिळणार का?

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 21, 2023 13:53 IST

वकील विचारताहेत प्रश्न : दुर्लक्ष होत असल्यामुळे नाराजीचा सूर

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिलांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करताना नागपूरच्या वकिलांकडे दुर्लक्ष होते, असे बोलले जात आहे. तसेच, यामुळे नागपूरच्या वकिलांमध्ये नाराजीचा सूर असून भविष्यात होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये नागपूरला योग्य प्रतिनिधित्व मिळेल का, असा प्रश्न ते विचारीत आहेत. सध्या उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त आहेत.

गेल्या १५ जून रोजी अनेक वकिलांनी हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरला निवेदन सादर करून या मुद्याकडे लक्ष वेधले. तसेच, यावर विस्तृत चर्चा करण्यासाठी विशेष आमसभा आयोजित करण्याची आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व कॉलेजियमला नागपूरच्या पात्र वकिलांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनविण्याची विनंती करण्यासाठी ठराव पारीत करण्याची मागणी केली.

‘लोकमत’ने यासंदर्भात हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे यांचे मत जाणून घेतले असता, त्यांनी वकिलांच्या भावनेचे समर्थन केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी वकिलांची नियुक्ती करताना मुंबई व औरंगाबादला नियमित प्रतिनिधित्व दिले जाते; परंतु, नागपूरमधील वकिलांच्या बाबतीत तसे झालेले दिसत नाही. नागपूरमधील वकिलांची न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यासाठी गेल्या काही वर्षात वेळोवेळी शिफारशी केल्या गेल्या; पण काही कारणांमुळे त्या शिफारशी मंजूर झाल्या नाहीत.

मुंबई व औरंगाबादमधून नागपूरला येणारे न्यायमूर्ती येथील वकिलांच्या गुणवत्तेची व न्यायदान क्षेत्रातील योगदानाची नेहमीच प्रशंसा करतात. असे असले तरी, न्यायमूर्तिपदी नियुक्ती करताना मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी, नागपूरचा अनुशेष सतत वाढत आहे. करिता, येणाऱ्या काळात नागपूरच्या वकिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील ॲड. शशिभूषण वाहाणे यांनीदेखील ही मागणी योग्य असल्याची भूमिका मांडली. नागपूरमध्ये अनेक उच्च दर्जाचे वकील आहेत. गुणवत्ता व आवश्यक पात्रता तपासून त्यांची न्यायमूर्तिपदी नियुक्ती केली जाऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

२३ वर्षांमध्ये केवळ १४ वकिलांना संधी

उच्च न्यायालयामध्ये गेल्या २३ वर्षांत नागपूरच्या केवळ १४ वकिलांची न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आली. २००७ ते २०१२ या पाच वर्षांच्या काळात तर, केवळ एक वकिलाला न्यायमूर्ती करण्यात आले. तसेच, गेल्या चार वर्षांत एकाही वकिलाला न्यायमूर्ती करण्यात आले नाही, असे वकिलांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय