शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

हायकोर्टात न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त, नागपूरला प्रतिनिधित्व मिळणार का?

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 21, 2023 13:53 IST

वकील विचारताहेत प्रश्न : दुर्लक्ष होत असल्यामुळे नाराजीचा सूर

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिलांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करताना नागपूरच्या वकिलांकडे दुर्लक्ष होते, असे बोलले जात आहे. तसेच, यामुळे नागपूरच्या वकिलांमध्ये नाराजीचा सूर असून भविष्यात होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये नागपूरला योग्य प्रतिनिधित्व मिळेल का, असा प्रश्न ते विचारीत आहेत. सध्या उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त आहेत.

गेल्या १५ जून रोजी अनेक वकिलांनी हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरला निवेदन सादर करून या मुद्याकडे लक्ष वेधले. तसेच, यावर विस्तृत चर्चा करण्यासाठी विशेष आमसभा आयोजित करण्याची आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व कॉलेजियमला नागपूरच्या पात्र वकिलांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनविण्याची विनंती करण्यासाठी ठराव पारीत करण्याची मागणी केली.

‘लोकमत’ने यासंदर्भात हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे यांचे मत जाणून घेतले असता, त्यांनी वकिलांच्या भावनेचे समर्थन केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी वकिलांची नियुक्ती करताना मुंबई व औरंगाबादला नियमित प्रतिनिधित्व दिले जाते; परंतु, नागपूरमधील वकिलांच्या बाबतीत तसे झालेले दिसत नाही. नागपूरमधील वकिलांची न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यासाठी गेल्या काही वर्षात वेळोवेळी शिफारशी केल्या गेल्या; पण काही कारणांमुळे त्या शिफारशी मंजूर झाल्या नाहीत.

मुंबई व औरंगाबादमधून नागपूरला येणारे न्यायमूर्ती येथील वकिलांच्या गुणवत्तेची व न्यायदान क्षेत्रातील योगदानाची नेहमीच प्रशंसा करतात. असे असले तरी, न्यायमूर्तिपदी नियुक्ती करताना मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी, नागपूरचा अनुशेष सतत वाढत आहे. करिता, येणाऱ्या काळात नागपूरच्या वकिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील ॲड. शशिभूषण वाहाणे यांनीदेखील ही मागणी योग्य असल्याची भूमिका मांडली. नागपूरमध्ये अनेक उच्च दर्जाचे वकील आहेत. गुणवत्ता व आवश्यक पात्रता तपासून त्यांची न्यायमूर्तिपदी नियुक्ती केली जाऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

२३ वर्षांमध्ये केवळ १४ वकिलांना संधी

उच्च न्यायालयामध्ये गेल्या २३ वर्षांत नागपूरच्या केवळ १४ वकिलांची न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आली. २००७ ते २०१२ या पाच वर्षांच्या काळात तर, केवळ एक वकिलाला न्यायमूर्ती करण्यात आले. तसेच, गेल्या चार वर्षांत एकाही वकिलाला न्यायमूर्ती करण्यात आले नाही, असे वकिलांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय