शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त; राज्य सरकारने प्रयत्न करण्याची मागणी

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 7, 2022 12:06 IST

एकूण ९४ पदे मंजूर, ६६ न्यायमूर्ती कार्यरत

नागपूर : न्यायदानाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारणे होय, असे म्हटले जाते. त्यामुळे प्रकरणे झपाट्याने निकाली काढण्यासाठी आवश्यक तेवढे न्यायमूर्ती कार्यरत असणे गरजेचे आहे. परंतु, मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त आहेत. या परिस्थितीत पक्षकारांना वेळेत कसा न्याय मिळेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. करिता, न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरली जाण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

न्यायमूर्तींची नियुक्ती करणे हा केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करणे आवश्यक आहे. मुंबई उच्च न्यायालयाची वर्तमान परिस्थिती पाहता याविषयी आगामी हिवाळी अधिवेशनातच हा मुद्दा उपस्थित करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाला न्यायमूर्तींची ९४ पदे मंजूर आहेत, पण सध्या केवळ ६६ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. कामकाजाचा बोजा पाहता न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरली जाणे आवश्यक आहे.

सहा लाखांवर प्रकरणे प्रलंबित

मुंबई उच्च न्यायालयात सध्या ६ लाख ४ हजार ७२० प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामध्ये ५ लाख २ हजार ९१६ दिवाणी तर, १ लाख १ हजार ८०४ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे. यांतील ३१९ प्रकरणे ३० वर्षांवर जुनी, २३ हजार ८८३ प्रकरणे २० ते ३० वर्षे जुनी तर, १ लाख १६ हजार ६७७ प्रकरणे १० ते २० वर्षे जुनी आहेत.

राज्य सरकार विनंती करू शकते

उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार सर्वांत मोठा पक्षकार आहे. उच्च न्यायालयात सर्वाधिक प्रकरणे राज्य सरकारविरुद्ध प्रलंबित आहेत. प्रकरणावरील निर्णयास विलंब झाल्यास सरकारचीच कामे खोळंबतात. त्यामुळे राज्य सरकारने न्यायमूर्तींची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्या केंद्रात व राज्यात एकाच पक्षाची सरकार आहे. त्यामुळे त्यांना न्यायमूर्तींची रिक्त पदे भरणे सोपे जाईल.

- ॲड. फिरदौस मिर्झा, वरिष्ठ विधिज्ञ, हायकोर्ट

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय