शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त; राज्य सरकारने प्रयत्न करण्याची मागणी

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 7, 2022 12:06 IST

एकूण ९४ पदे मंजूर, ६६ न्यायमूर्ती कार्यरत

नागपूर : न्यायदानाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारणे होय, असे म्हटले जाते. त्यामुळे प्रकरणे झपाट्याने निकाली काढण्यासाठी आवश्यक तेवढे न्यायमूर्ती कार्यरत असणे गरजेचे आहे. परंतु, मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त आहेत. या परिस्थितीत पक्षकारांना वेळेत कसा न्याय मिळेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. करिता, न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरली जाण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

न्यायमूर्तींची नियुक्ती करणे हा केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करणे आवश्यक आहे. मुंबई उच्च न्यायालयाची वर्तमान परिस्थिती पाहता याविषयी आगामी हिवाळी अधिवेशनातच हा मुद्दा उपस्थित करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाला न्यायमूर्तींची ९४ पदे मंजूर आहेत, पण सध्या केवळ ६६ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. कामकाजाचा बोजा पाहता न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरली जाणे आवश्यक आहे.

सहा लाखांवर प्रकरणे प्रलंबित

मुंबई उच्च न्यायालयात सध्या ६ लाख ४ हजार ७२० प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामध्ये ५ लाख २ हजार ९१६ दिवाणी तर, १ लाख १ हजार ८०४ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे. यांतील ३१९ प्रकरणे ३० वर्षांवर जुनी, २३ हजार ८८३ प्रकरणे २० ते ३० वर्षे जुनी तर, १ लाख १६ हजार ६७७ प्रकरणे १० ते २० वर्षे जुनी आहेत.

राज्य सरकार विनंती करू शकते

उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार सर्वांत मोठा पक्षकार आहे. उच्च न्यायालयात सर्वाधिक प्रकरणे राज्य सरकारविरुद्ध प्रलंबित आहेत. प्रकरणावरील निर्णयास विलंब झाल्यास सरकारचीच कामे खोळंबतात. त्यामुळे राज्य सरकारने न्यायमूर्तींची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्या केंद्रात व राज्यात एकाच पक्षाची सरकार आहे. त्यामुळे त्यांना न्यायमूर्तींची रिक्त पदे भरणे सोपे जाईल.

- ॲड. फिरदौस मिर्झा, वरिष्ठ विधिज्ञ, हायकोर्ट

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय