शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

२८९ गावांना एसटीची प्रतीक्षा!

By admin | Updated: May 5, 2016 02:53 IST

महाराष्ट्राची उपराजधानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा अशी नागपूर जिल्ह्याची ओळख आहे.

नागपूर जिल्ह्यातील वास्तव : रस्ते आहेत; पण एसटी आहे तरी कुठे?गणेश खवसे नागपूरमहाराष्ट्राची उपराजधानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा अशी नागपूर जिल्ह्याची ओळख आहे. मात्र याच नागपूर जिल्ह्यातील तब्बल २८९ गावांना स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही एसटी महामंडळाच्या बसने दर्शन दिले नाही. ‘रस्ता तिथे एसटी’ असे ब्रीदवाक्य घेऊन मिरविणाऱ्या एसटी महामंडळाचे धक्कादायक वास्तव या स्थितीमुळे समोर येते. गावापर्यंत जाण्यासाठी डांबरीकरण असले तरी बसफेरी सुरू न झाल्याने ग्रामस्थांची पायपीट कित्येक वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, आदिवासीबहुल देवलापार (ता. रामटेक) भागातील नागरिकांना कोणत्याही कामासाठी गावाबाहेर जायचे असल्यास ८ते १२ किमीपर्यंतचे अंतर पायी जावे लागते.‘गाव तिथे रस्ता’ असे विकासाचे जाळे भारतात तयार करण्यात आले. याच तत्त्वावर ‘रस्ता तिथे एसटी’ असे ब्रीदवाक्य तयार करून एसटी महामंडळाने ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ वाहतुकीचे जाळे विणण्याचे काम केले. सुरुवातीच्या काळात गिट्टीचे रस्ते असले तरी बहुतांश गावांना जोडण्याचे काम एसटी महामंडळाने बसच्या माध्यमातून केले. विशेषत: मुख्य रस्त्यावर आणि या रस्त्यापासून फाटा फुटलेल्या सात किमीपेक्षा जास्त अंतरावरील गावांना एसटी बसने दळवळणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणले. परंतु असे असले तरी स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही कित्येक गावांत एसटी बस सुरू झालेली नाही. किंबहुना या गावांना एसटी बसने दर्शन दिले नाही. त्यामुळे तेथील ग्रामस्थांना पायपीट करण्याशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर या गृहजिल्ह्यातील तब्बल २८९ गावांमध्ये एसटी बसने अद्याप दर्शन दिले नाही. त्यामध्ये मौदा तालुक्यातील सर्वाधिक ४९ गावांपर्यंत एसटी बस पोहोचू शकली नाही. त्याखालोखाल कुही तालुक्यातील ४८, कामठी तालुक्यातील गावांची संख्या ३४ आहे. कळमेश्वर तालुक्यातील ३० गावांमध्ये एसटी बस पोहोचलेली नाही. रामटेक तालुक्यातील २७ गावांमध्ये एसटी बस पोहोचलेली नाही. विशेष म्हणजे, ही २७ गावे आदिवासीबहुल आहेत. या सर्व गावांना कच्च्या - पक्क्या (गिट्टी-डांबरी) रस्त्याने जोडले आहेत. मात्र एसटी बसने या गावांना जोडलेले नसल्याने ग्रामस्थांची परवड थांबलेली नाही. विशेष म्हणजे, पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेले कामठी आणि मौदा हे दोन्ही तालुके पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघांतर्गत येतात. त्यामुळे आता या गावांमध्ये बसफेरी सुरू करण्यासाठी, ते काही प्रयत्न करतात, का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. आगारात नाही माहितीनागपूर जिल्ह्यातील किती गावांमध्ये एसटी बस जात नाही, हे वास्तवचित्र जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने एसटी महामंडळाच्या आगाराशी संपर्क साधला. मात्र किती गावांमध्ये एसटी जाते, एवढीच त्यांच्याकडे माहिती उपलब्ध आहे. किती गावांमध्ये एसटी बस जात नाही, ही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, उमरेड आगाराशी संपर्क साधला असता तेथील कालोकर नामक महिला कर्मचाऱ्याने ‘साहेब, बाहेर गेले आहेत. साहेब पेट्रोलटँकजवळ आहेत. साहेब चौकशी विभागात आहेत’ अशी वेगवेगळी उत्तरे देत टोलवाटोलवी केली. वारंवार संपर्क साधल्यानंतरही उमरेड आगाराचे आगार व्यवस्थापक विलास एस. पाध्ये यांच्यापर्यंत माहिती पोहचली नाही.