शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

२६ मुले झाली अनाथ, साहाय्य मिळाले केवळ ५ मुलांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST

आकांक्षा कनोजिया नागपूर : कोरोना संक्रमणामुळे अनाथ झालेल्या मुलांना अजूनही कुठलेच साहाय्य मिळाले नाही. ज्या विभागाकडे या मुलांची जबाबदारी ...

आकांक्षा कनोजिया

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे अनाथ झालेल्या मुलांना अजूनही कुठलेच साहाय्य मिळाले नाही. ज्या विभागाकडे या मुलांची जबाबदारी आहे, तो विभाग केवळ मुलांची आकडेवारी गोळा करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे अनाथ मुलांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे अनाथ झालेल्या मुलांना संरक्षण देण्याची तरतूद आहे, परंतु विभागाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. महिला व बाल विकास विभागाजवळ अशा २६ मुलांची माहिती उपलब्ध आहे. या मुलांच्या आईवडिलांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला. यातील केवळ ५ मुलांना संरक्षण मिळाले आहे. ही मुले बालगृहात आहे. परंतु २१ मुलांपर्यंत कुठलीही मदत पोहचू शकली नाही. दुसरीकडे जिल्हा प्रशासन लोकांना अनाथ झालेल्या मुलांची माहिती देण्याचे आवाहन करीत आहे. पण महिला व बाल विकास विभाग प्रत्यक्ष मदत न करता, आकडे गोळा करण्याचे काम करीत आहे. मार्च २०२० पासून एका पालकाचा मृत्यू झालेली ५६१ बालकाची माहिती विभागाकडे आहे. त्यांचे अर्ज विचाराधीन आहे. मुलांना कुठलीही मदत मिळालेली नाही. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संक्रमणामुळे अनाथ झालेल्या बालकाना संरक्षण देण्यासाठी गठित करण्यात आलेल्या जिल्हा कृती समितीची बैठक झाली. या बैठकीत दावा करण्यात आला की, या मुलांना संरक्षण देण्यास प्रशासन प्रयत्नरत आहे. परंतु या मुलांच्या प्रकरणात कार्यवाहीची प्रक्रिया अतिशय मंद गतीत सुरू आहे. आता सांगण्यात येत आहे की आईवडिलांचा मृत्यू झालेल्या १६ बालकांच्या घरी जाऊन सामाजिक चौकशी रिपोर्ट तयार केला आहे. अन्य बालकांची चौकशी सुरू आहे. प्रशासन केवळ अहवाल तयार करण्यास प्राथमिकता देत आहे. मुलांना प्रत्यक्षात मदत मिळत नसल्यामुळे विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

- बाल संगोपन योजनेची गती मंद

महिला व बाल विकास विभागाच्या बाल संगोपन योजनेंतर्गत अनाथ झालेल्या मुलांबरोबरच एका पालकाचा मृत्यू झालेल्या मुलांना सरकारकडून संरक्षण मिळते. ० ते १८ वयोगटातील बालकांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत १८ हजार लाभार्थी आहे. पण संगोपनासाठी करावी लागणारी कार्यवाहीची गती मंद आहे.