शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

मागासवर्गीयांचे २५ कोटी पाण्यात

By admin | Updated: March 17, 2016 03:23 IST

शहरातील दुर्बल घटक व झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.

तरतूद कागदावरच : तर कसा होणार विकास?गणेश हूड नागपूरशहरातील दुर्बल घटक व झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. यासाठी एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करणे आवश्यक असते. परंतु २०१५-१६ या वर्षात या वस्त्यांवर छदामही खर्च न झाल्याने मागासवर्गीयांचा २५ कोटींचा निधी पाण्यात गेला आहे.शहराच्या एकूण लोकसंख्येच्या ३३ टक्के लोकसंख्या स्लम भागात वास्तव्यास आहे. या वस्त्यात शौचालये, रस्ते, सिवर लाईन, पावसाळी नाल्या, पेव्हमेंट, मागासवर्गीयांच्या शाळा, पथदिवे अशी कामे पाच टक्के निधीतून केली जातात. यासाठी मागासवर्गीय कल्याण समितीने वाटप केलेल्या तरतुदीनुसार झोन कार्यालयाच्या माध्यमातून हा खर्च केला जातो. परंतु गेल्या वर्षात यातील कोणतीही विकास कामे प्रस्तावित करण्यात आलेली नाही. मागासवर्गीय वस्त्यात विद्युत खांब लावणे, भूमिगत नाल्या, शौचालय निर्मिती, अतिरक्ति सवलती यासाठी ३ कोटी ५० लाख, रस्त्यांसाठी ४ कोटी ५० लाख, शाळा भवनासाठी ४० लाख, दुर्बल घटक घरकूल योजनेसाठी २ कोटी ५० लाख, खांडकी व सिमेंट पेव्हिंग यासाठी १५ लाख अशा स्वरुपाची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. परंतु हा निधी अखर्चित आहे. नागपूर शहर विकास आघाडीने गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी बहुसंख्य आश्वासने पूर्ण के ल्याचा दावा केला आहे. शहरात दरवर्षी ३०० कोटींचे सिमेंट रस्ते, अविकसित ले-आऊ टच्या विकासासाठी २०० कोटी खर्च करणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु मागासवर्गीयांच्या हक्काचा निधी अखर्चित कसा. असा प्रश्न दुर्बल घटकांना पडला आहे. (प्रतिनिधी)समितीचे कामकाज ठप्पमागासवर्गीय वस्त्यांचा विकास करण्यात महापालिकेच्या मागासवर्गीय समितीची भूमिका महत्त्वाची असते. परंतु गेल्या दोन महिन्यापूर्वी समितीच्या अध्यक्ष सविता सांगोळे यांनी विकास निधी उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. परंतु याकडे आघाडीच्या नेत्यांचे दुर्लक्ष आहे. अध्यक्ष नसल्याने समितीचे कामकाज ठप्प आहे. कशी होणार स्मार्ट सिटीस्मार्ट सिटीच्या दिशेने उपराजधानीची वाटचाल सुरू असल्याचा दावा महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु शहरातील सर्व भागाचा विकास झाल्याशिवाय स्मार्ट सिटी होण्याची कल्पना करणे चुकीचे असल्याने मागासवर्गीय वस्त्यांचा विक ास न करता स्मार्ट सिटी कशी होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.सभागृहात जाब विचारणारमागासवर्गीय वस्त्यांचा विकास व्हावा. यासाठी अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी खर्च करणे बंधनकारक आहे. परंतु गेल्या वर्षात या निधीतून कोणत्याही स्वरुपाची विकास कामे करण्यात आलेली नाही. याकडे वेळोवेळी लक्ष वेधूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. या संदर्भात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी व प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे नगरसेवक किशोर गजभिये व संदीप सहारे यांनी सांगितले.