शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

‘शतकोटी’ योजनेची २५ कोटींतच दमछाक

By admin | Updated: October 4, 2016 06:15 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने राज्यात ‘शतकोटी’ वृक्ष लागवडीची मोहीम २०११ मध्ये जाहीर करण्यात

योगेश पांडे ल्ल नागपूर पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने राज्यात ‘शतकोटी’ वृक्ष लागवडीची मोहीम २०११ मध्ये जाहीर करण्यात आला होती. मात्र, योग्य नियोजनाअभावी या योजनेचा बोजवारा उडाला आहे. १०० कोटींच्या या योजनेत केवळ एक चतुर्थांश म्हणजेच सुमारे २५ कोटी वृक्षांची लागवड करण्यातच वन विभागाला यश आले. २५ कोटी झाडे लावण्यासाठी सव्वाचारशे कोटींहून अधिक खर्च आला. यातील किती झाडे जगली याची माहिती देण्यास मात्र विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. आॅक्टोबर २०११ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारकडून ‘शतकोटी’ वृक्ष लागवड योजनेची घोषणा करण्यात आली होती. वन विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१२ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत संपूर्ण राज्यात २५ कोटी ३९ लाख झाडे लावण्यात आली. यासाठी वन विभागाने ४२७.५६ कोटी रुपयांचा निधी खर्च केला. सरासरी प्रत्येक झाडामागे जवळपास १७ रुपयांचा खर्च आला. ‘शतकोटी’ योजनेअंतर्गत लावलेल्या २५ कोटींहून अधिक झाडांपैकी नेमकी किती झाडे जगली, तसेच एकूण तरतुदीपैकी किती निधीचा उपयोग झाला याबाबतदेखील विचारणा केली होती. या बाबींची नोंद ठेवण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘एमआयएस’ (मॅनेजमेन्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम) विकसित करण्यात आली होती. परंतु तरीदेखील आकडेवारी देण्यास मात्र वन विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीच्या खर्चात घट ‘शतकोटी’ वृक्ष लागवड योजनेचे उद्दीष्ट गाठण्यात यश आले नसले तरी प्रति वृक्ष लागवडीचा खर्च कमी करण्यात मात्र नक्कीच राज्य शासनाला यश आले आहे. २०१२-१३ मध्ये एका झाड लावण्याचा खर्च १९ रुपये होता. तो खर्च २०१५-१६ मध्ये १० रुपयांवर आला. एक झाड लावण्यासाठी २०१३-१४ मध्ये २० तर २०१४-१५ मध्ये १७ रुपये खर्च आला होता.