शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
4
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
5
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
6
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
7
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
8
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
9
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
10
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
11
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
12
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
13
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
14
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
15
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
16
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
17
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
18
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
19
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
20
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक

बांधकाम खर्चात २५ ते ३० टक्क्यांची वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:07 IST

नागपूर : सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहे. इंधन, खाद्यतेल, डाळी यापाठोपाठ सिमेंट आणि स्टीलचे दर मोठ्या ...

नागपूर : सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहे. इंधन, खाद्यतेल, डाळी यापाठोपाठ सिमेंट आणि स्टीलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न आता स्वप्नच ठरणार काय, असा सवाल आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीने बिल्डरांचे बजेट कोलमडले आहे. यावर केंद्र आणि राज्य शासनाचे नियंत्रण नसल्याने सिमेंट आणि स्टीलच्या दरवाढीने आता उच्चांक गाठला आहे.

बिल्डर म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपूर्वी ४० हजार रुपये टन असलेले स्टीलचे दर ६५ ते ७० हजार रुपयांवर तर सिमेंट पोते ३३० रुपयांवरून ४०० ते ४१० रुपयांवर गेले आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असताना भाव का वाढत आहे, हे एक कोडंच आहे. सिमेंट उत्पादक कंपन्यांनी एकाधिकारशाही सुरू केली आहे. मागणी आणि उत्पादन नसतानाही सिमेंट कंपन्या अतोनात दर वाढवून नफा कमवित असल्याचा विक्रेत्यांचा आरोप आहे. त्याचा फटका बिल्डर आणि ग्राहकांना बसत आहे. सप्टेंबर २०२० मध्येही सिमेंटचे दर ४०० रुपयांवर पोहोचले होते. याशिवाय त्यापूर्वी पावसाळ्यात बांधकाम बंद असतानाही कंपन्यांनी सिमेंटचे दर वाढविले होते.

बांधकाम क्षेत्रासाठी लोखंड महत्त्वाची वस्तू आहे. सहा महिन्यांपूर्वी टन भाव ४० हजार रुपयांपर्यंत होते. आता ७० हजार रुपयांवर पोहोचले आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्याने भाववाढ झाल्याचे कंपन्यांचे मत आहे. तसे पाहता कच्च्या मालाच्या दरात फिनिश मालाएवढी वाढ झालेली नाही. त्यानंतरही होणारी दरवाढ आश्चर्यजनक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय घर पूर्ण करण्यासाठी लागणारे सिमेंट पाइप, दरवाजे, खिडक्या आदींसह हार्डवेअरचाही खर्च दीडपटीने वाढला आहे. राज्यात सर्वच जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव दोन वर्षांपासून बंद असल्याने रेतीच्या भावात दुप्पट वाढ होऊन ते ८० ते १०० रुपये फूट झाले आहेत.

बांधकाम खर्च वाढला

क्रेडाई महाराष्ट्र मेट्रोचे माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे म्हणाले, सिमेंट आणि स्टीलच्या किमती वाढल्याने बांधकाम खर्चात २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. अनेक बिल्डरांनी वर्षापूर्वी बुकिंग घेतले आहे. रेराच्या नियमांतर्गत बुकिंग भावात बदल करता येत नाही. त्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. भाववाढ करून लहान बिल्डरांना संपविण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप सरोदे यांनी केला. बांधकामाच्या मालासह प्रकल्पाच्या मंजूर नकाशा शुल्कातही दीडपट वाढ झाली आहे. बिल्डरांवर चहूबाजूने संकट आले आहे. पूर्णत्वास येणाऱ्या साइटला फटका बसत आहे. या प्रकरणी सरकारने मध्यस्थी करून भाव कमी करावेत. त्यानंतरच घराच्या किमती कमी होतील.