शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

बांधकाम खर्चात २५ ते ३० टक्क्यांची वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:07 IST

नागपूर : सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहे. इंधन, खाद्यतेल, डाळी यापाठोपाठ सिमेंट आणि स्टीलचे दर मोठ्या ...

नागपूर : सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहे. इंधन, खाद्यतेल, डाळी यापाठोपाठ सिमेंट आणि स्टीलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न आता स्वप्नच ठरणार काय, असा सवाल आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीने बिल्डरांचे बजेट कोलमडले आहे. यावर केंद्र आणि राज्य शासनाचे नियंत्रण नसल्याने सिमेंट आणि स्टीलच्या दरवाढीने आता उच्चांक गाठला आहे.

बिल्डर म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपूर्वी ४० हजार रुपये टन असलेले स्टीलचे दर ६५ ते ७० हजार रुपयांवर तर सिमेंट पोते ३३० रुपयांवरून ४०० ते ४१० रुपयांवर गेले आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असताना भाव का वाढत आहे, हे एक कोडंच आहे. सिमेंट उत्पादक कंपन्यांनी एकाधिकारशाही सुरू केली आहे. मागणी आणि उत्पादन नसतानाही सिमेंट कंपन्या अतोनात दर वाढवून नफा कमवित असल्याचा विक्रेत्यांचा आरोप आहे. त्याचा फटका बिल्डर आणि ग्राहकांना बसत आहे. सप्टेंबर २०२० मध्येही सिमेंटचे दर ४०० रुपयांवर पोहोचले होते. याशिवाय त्यापूर्वी पावसाळ्यात बांधकाम बंद असतानाही कंपन्यांनी सिमेंटचे दर वाढविले होते.

बांधकाम क्षेत्रासाठी लोखंड महत्त्वाची वस्तू आहे. सहा महिन्यांपूर्वी टन भाव ४० हजार रुपयांपर्यंत होते. आता ७० हजार रुपयांवर पोहोचले आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्याने भाववाढ झाल्याचे कंपन्यांचे मत आहे. तसे पाहता कच्च्या मालाच्या दरात फिनिश मालाएवढी वाढ झालेली नाही. त्यानंतरही होणारी दरवाढ आश्चर्यजनक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय घर पूर्ण करण्यासाठी लागणारे सिमेंट पाइप, दरवाजे, खिडक्या आदींसह हार्डवेअरचाही खर्च दीडपटीने वाढला आहे. राज्यात सर्वच जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव दोन वर्षांपासून बंद असल्याने रेतीच्या भावात दुप्पट वाढ होऊन ते ८० ते १०० रुपये फूट झाले आहेत.

बांधकाम खर्च वाढला

क्रेडाई महाराष्ट्र मेट्रोचे माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे म्हणाले, सिमेंट आणि स्टीलच्या किमती वाढल्याने बांधकाम खर्चात २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. अनेक बिल्डरांनी वर्षापूर्वी बुकिंग घेतले आहे. रेराच्या नियमांतर्गत बुकिंग भावात बदल करता येत नाही. त्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. भाववाढ करून लहान बिल्डरांना संपविण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप सरोदे यांनी केला. बांधकामाच्या मालासह प्रकल्पाच्या मंजूर नकाशा शुल्कातही दीडपट वाढ झाली आहे. बिल्डरांवर चहूबाजूने संकट आले आहे. पूर्णत्वास येणाऱ्या साइटला फटका बसत आहे. या प्रकरणी सरकारने मध्यस्थी करून भाव कमी करावेत. त्यानंतरच घराच्या किमती कमी होतील.