शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

२४८ प्रवाशांनी केला ‘ब्लड रिलेशन’मध्ये प्रवास

By admin | Updated: July 29, 2015 03:04 IST

अचानक प्रवासाचा बेत रद्द झाला. वडिलांच्या ठिकाणी मुलाला, मुलीला किंवा मुलाच्या ठिकाणी वडिलांना जाण्याची वेळ आली की धावपळ होते.

दयानंद पाईकराव  नागपूर अचानक प्रवासाचा बेत रद्द झाला. वडिलांच्या ठिकाणी मुलाला, मुलीला किंवा मुलाच्या ठिकाणी वडिलांना जाण्याची वेळ आली की धावपळ होते. ऐनवेळी तिकीट कन्फर्म होत नसल्यामुळे प्रवास कसा करायचा असा प्रश्न निर्माण होते. परंतु रेल्वेतर्फे देण्यात येत असलेली ‘ब्लड रिलेशन’ची सुविधा वरदान ठरत आहे. १ एप्रिल ते २८ जुलै या कालावधीत २४८ प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतल्याची नोंद आहे.रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षणाचे तिकीट खरेदी केल्यानंतर अनेकदा अचानक प्रवास रद्द करण्याची पाळी येते. वडील प्रवास करीत असतील तर अनेकदा त्यांच्या ठिकाणी मुलाला जाण्याची पाळी येते. अशा परिस्थितीत रेल्वेतर्फे देण्यात येत असलेल्या ‘ब्लड रिलेशन’च्या सुविधेमुळे कुटुंबातील सदस्य प्रवास करू शकतात. त्यासाठी प्रवासाच्या २४ तास आधी रेल्वेच्या आरक्षण कार्यालयात जाऊन रीतसर अर्ज करावा लागतो. जी व्यक्ती प्रवास करणार होती तिचे ओळखपत्र, जी व्यक्ती ऐनवेळी प्रवास करणार आहे तिचे ओळखपत्र सादर करावे लागते. याशिवाय दोघांमधील नातेसंबंध दाखविणारा पुरावा सादर करावा लागतो. त्यानंतर संबंधित नातेवाईकास प्रवास करण्याची परवानगी मिळते. या सुविधेमुळे अनेक प्रवाशांना लाभ मिळत आहे. केवळ रक्ताच्या नातेवाईकांनाच नव्हे तर कार्यालयातील अधिकारी जाणार असेल आणि ऐनवेळी त्याचा प्रवास रद्द करावयाचा असल्यास कार्यालयाच्या पत्रावर अर्ज केल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या ठिकाणी दुसरा कर्मचारी जाऊ शकतो. परंतु कार्यालयाच्या कर्मचाऱ्याला प्रवास करण्यासाठी प्रवासाच्या ४८ तास आधी अर्ज सादर करण्याचे बंधन आहे. १ एप्रिल ते २८ जुलै २०१५ या कालावधीत नागपूर विभागातून २४८ प्रवाशांनी ‘ब्लड रिलेशन’चे पुरावे जोडून प्रवास केल्याची नोंद आहे.अशी आहे प्रक्रिया‘ब्लड रिलेशन’मध्ये प्रवास करण्यासाठी आधी प्रवास करणारा आणि नंतर प्रवास करणारा प्रवासी या दोघांचेही ओळखपत्र द्यावे लागते. नातेवाईकांसाठी २४ तास आधी अर्ज सादर करावा लागतो. रक्ताचे नाते असल्याचा पुरावाही सादर करावा लागतो. यात रेशनकार्डवर सर्वच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्यामुळे हा पुरावा महत्त्वाचा ठरतो तर कार्यालयातील कर्मचाऱ्याला प्रवास करावयाचा असल्यास ४८ तास आधी कार्यालयाच्या पत्रावर अर्ज करावा लागतो.