नागपूर : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ‘एमएचटी-सीईटी’मध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सुमारे २४ हजार जागांसाठी ३२ हजार ६०० विद्यार्थी पात्र झाले आहेत. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २६ हजार ५९८ तर गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठातील ६ हजार १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.तंत्रशिक्षण संचालनालयाने नव्या नियमांनुसार प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. नागपूर विभागात मागील वर्षी ५९ अभियांत्रिकी महाविद्यालयांत २६ हजार जागा होत्या. यंदा चार महाविद्यालये बंद झाल्याने जागांची संख्या कमी झाली आहे. प्रवेशप्रक्रियेच्या वेळी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी संचालनालयातर्फे विभागात ४८ सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. येथे विद्यार्थ्यांना अगोदर नोंदणी करायची आहे. त्यानंतर ‘आॅनलाईन’ अर्ज व कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये यासाठी सुविधा केंद्रांमध्ये सूचना अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांचा फायदाच होणार आहे. कुठलेही महाविद्यालय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकू शकणार नाही, अशी माहिती विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी दिली.(प्रतिनिधी)अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया : नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांचा फायदा‘पासवर्ड’ गोपनीय ठेवाकाही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून ‘लॉगिन आयडी’ व ‘पासवर्ड’ घेऊन गैरप्रकार केल्याच्या तक्रारी मागील वर्षी संचालनालयाकडे आल्या होत्या. असे प्रकार होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना ‘पासवर्ड’ गोपनीय ठेवावा असे आवाहन संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत ३०० जागानागपूरमध्ये येत्या शैक्षणिक सत्रापासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार आहे. या महाविद्यालयांत ३०० जागा राहणार असून विद्यार्थी येथे प्रवेश घेऊ शकतात, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
जागा २४ हजार; विद्यार्थी ३२ हजार ६००
By admin | Updated: June 8, 2016 02:16 IST