शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वीजग्राहकांकडे २.३३ काेटीची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:40 IST

शरद मिरे लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : काेराेना संक्रमणातील टाळेबंदी काळात अनेकांचे राेजगार केल्याने तसेच उद्याेगधंदे ठप्प झाल्याने सामान्य ...

शरद मिरे

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : काेराेना संक्रमणातील टाळेबंदी काळात अनेकांचे राेजगार केल्याने तसेच उद्याेगधंदे ठप्प झाल्याने सामान्य माणसं आर्थिक संकटात सापडली. त्यातच महावितरण कंपनीने मार्च ते जुलै २०२० या काळात ग्राहकांकडे असलेल्या मीटरचे रीडिंग न घेता त्यांना बिले पाठविली. या बिलात नमूद केलेले आकडे माेठे व आवाक्याबाहेर असल्याने अनेकांना बिले भरणे शक्यच झाले नाही. त्यामुळे भिवापूर तालुक्यातील विजेच्या ग्राहकांकडे महावितरण कंपनीची दोन काेटी ३३ लाख रुपयांची थकबाकी झाली. ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने ग्राहकांना नाेटिसा बजावल्या असून, १५ दिवसात रकमेचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.

काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी शासनाने टाळेबंदी जाहीर केली आणि शहरांसाेबत ग्रामीण भागातील उद्याेगधंदे ठप्प झाले. याच काळात काहींवर त्यांचे राेजगार गमावण्याची वेळ ओढवली. एवढेच नव्हे तर मार्च ते जुलै या काळात महाविरतण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मीटरचे रीडिंग घेतले नाही. मात्र, ग्राहकांना विजेची बिले देण्यात आली. आधीच आर्थिक संकट असल्याने अनेकांना बिले भरणे शक्य झाले नाही. त्यातच बिलाच्या रकमेची आवाजवी आकारणी करण्यात आल्याचा आराेप ग्राहकांनी सुरुवातीपासून केला असून, ही बिले याेग्य असल्याचा दावाही महािवतरण कंपनीच्यावतीने वेळोवेळी करण्यात आला.

दुसरीकडे, वीजबिल माफ करण्यासाठी निवेदने देण्यात आली. प्रसंगी आंदाेलनेही करण्यात आली. परंतु, शासनाने व विराेधी पक्षाने याकडे गांभीर्याने घेतले नाही. मिळणाऱ्या मिळकतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, की ही अवाजवी बिले भरायची, असा प्रश्नही अनेक ग्राहकांनी उपस्थित केला. त्यातच महावितरण कंपनीने नाेटीस बजावून वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. बिले भरण्यासाठी लागणारी रक्कम आणायची कुठून तसेच बिले न भरल्यास अंधारात राहायचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

...

१७,०४६ घरगुती ग्राहक

भिवापूर तालुक्यात महावितरण कंपनीच्या घरगुती वीजग्राहकांची एकूण संख्या १७,०४६ एवढी आहे. यातील ४,२३७ ग्राहकांकडे विजेचे बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने त्यांना एसएमएस व लेखी नोटीस बजावल्या आहेत. या ग्राहकांकडे दोन काेटी ३३ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. थकीत बिलांचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल तसेच पुनर्जोडणी भार अतिरिक्त आकारला जाईल, असेही या नाेटीसमध्ये नमूद केले आहे.