शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वीजग्राहकांकडे २.३३ काेटीची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:40 IST

शरद मिरे लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : काेराेना संक्रमणातील टाळेबंदी काळात अनेकांचे राेजगार केल्याने तसेच उद्याेगधंदे ठप्प झाल्याने सामान्य ...

शरद मिरे

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : काेराेना संक्रमणातील टाळेबंदी काळात अनेकांचे राेजगार केल्याने तसेच उद्याेगधंदे ठप्प झाल्याने सामान्य माणसं आर्थिक संकटात सापडली. त्यातच महावितरण कंपनीने मार्च ते जुलै २०२० या काळात ग्राहकांकडे असलेल्या मीटरचे रीडिंग न घेता त्यांना बिले पाठविली. या बिलात नमूद केलेले आकडे माेठे व आवाक्याबाहेर असल्याने अनेकांना बिले भरणे शक्यच झाले नाही. त्यामुळे भिवापूर तालुक्यातील विजेच्या ग्राहकांकडे महावितरण कंपनीची दोन काेटी ३३ लाख रुपयांची थकबाकी झाली. ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने ग्राहकांना नाेटिसा बजावल्या असून, १५ दिवसात रकमेचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.

काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी शासनाने टाळेबंदी जाहीर केली आणि शहरांसाेबत ग्रामीण भागातील उद्याेगधंदे ठप्प झाले. याच काळात काहींवर त्यांचे राेजगार गमावण्याची वेळ ओढवली. एवढेच नव्हे तर मार्च ते जुलै या काळात महाविरतण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मीटरचे रीडिंग घेतले नाही. मात्र, ग्राहकांना विजेची बिले देण्यात आली. आधीच आर्थिक संकट असल्याने अनेकांना बिले भरणे शक्य झाले नाही. त्यातच बिलाच्या रकमेची आवाजवी आकारणी करण्यात आल्याचा आराेप ग्राहकांनी सुरुवातीपासून केला असून, ही बिले याेग्य असल्याचा दावाही महािवतरण कंपनीच्यावतीने वेळोवेळी करण्यात आला.

दुसरीकडे, वीजबिल माफ करण्यासाठी निवेदने देण्यात आली. प्रसंगी आंदाेलनेही करण्यात आली. परंतु, शासनाने व विराेधी पक्षाने याकडे गांभीर्याने घेतले नाही. मिळणाऱ्या मिळकतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, की ही अवाजवी बिले भरायची, असा प्रश्नही अनेक ग्राहकांनी उपस्थित केला. त्यातच महावितरण कंपनीने नाेटीस बजावून वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. बिले भरण्यासाठी लागणारी रक्कम आणायची कुठून तसेच बिले न भरल्यास अंधारात राहायचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

...

१७,०४६ घरगुती ग्राहक

भिवापूर तालुक्यात महावितरण कंपनीच्या घरगुती वीजग्राहकांची एकूण संख्या १७,०४६ एवढी आहे. यातील ४,२३७ ग्राहकांकडे विजेचे बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने त्यांना एसएमएस व लेखी नोटीस बजावल्या आहेत. या ग्राहकांकडे दोन काेटी ३३ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. थकीत बिलांचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल तसेच पुनर्जोडणी भार अतिरिक्त आकारला जाईल, असेही या नाेटीसमध्ये नमूद केले आहे.