शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

वीजग्राहकांकडे २.३३ काेटीची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:40 IST

शरद मिरे लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : काेराेना संक्रमणातील टाळेबंदी काळात अनेकांचे राेजगार केल्याने तसेच उद्याेगधंदे ठप्प झाल्याने सामान्य ...

शरद मिरे

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : काेराेना संक्रमणातील टाळेबंदी काळात अनेकांचे राेजगार केल्याने तसेच उद्याेगधंदे ठप्प झाल्याने सामान्य माणसं आर्थिक संकटात सापडली. त्यातच महावितरण कंपनीने मार्च ते जुलै २०२० या काळात ग्राहकांकडे असलेल्या मीटरचे रीडिंग न घेता त्यांना बिले पाठविली. या बिलात नमूद केलेले आकडे माेठे व आवाक्याबाहेर असल्याने अनेकांना बिले भरणे शक्यच झाले नाही. त्यामुळे भिवापूर तालुक्यातील विजेच्या ग्राहकांकडे महावितरण कंपनीची दोन काेटी ३३ लाख रुपयांची थकबाकी झाली. ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने ग्राहकांना नाेटिसा बजावल्या असून, १५ दिवसात रकमेचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.

काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी शासनाने टाळेबंदी जाहीर केली आणि शहरांसाेबत ग्रामीण भागातील उद्याेगधंदे ठप्प झाले. याच काळात काहींवर त्यांचे राेजगार गमावण्याची वेळ ओढवली. एवढेच नव्हे तर मार्च ते जुलै या काळात महाविरतण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मीटरचे रीडिंग घेतले नाही. मात्र, ग्राहकांना विजेची बिले देण्यात आली. आधीच आर्थिक संकट असल्याने अनेकांना बिले भरणे शक्य झाले नाही. त्यातच बिलाच्या रकमेची आवाजवी आकारणी करण्यात आल्याचा आराेप ग्राहकांनी सुरुवातीपासून केला असून, ही बिले याेग्य असल्याचा दावाही महािवतरण कंपनीच्यावतीने वेळोवेळी करण्यात आला.

दुसरीकडे, वीजबिल माफ करण्यासाठी निवेदने देण्यात आली. प्रसंगी आंदाेलनेही करण्यात आली. परंतु, शासनाने व विराेधी पक्षाने याकडे गांभीर्याने घेतले नाही. मिळणाऱ्या मिळकतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, की ही अवाजवी बिले भरायची, असा प्रश्नही अनेक ग्राहकांनी उपस्थित केला. त्यातच महावितरण कंपनीने नाेटीस बजावून वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. बिले भरण्यासाठी लागणारी रक्कम आणायची कुठून तसेच बिले न भरल्यास अंधारात राहायचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

...

१७,०४६ घरगुती ग्राहक

भिवापूर तालुक्यात महावितरण कंपनीच्या घरगुती वीजग्राहकांची एकूण संख्या १७,०४६ एवढी आहे. यातील ४,२३७ ग्राहकांकडे विजेचे बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने त्यांना एसएमएस व लेखी नोटीस बजावल्या आहेत. या ग्राहकांकडे दोन काेटी ३३ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. थकीत बिलांचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल तसेच पुनर्जोडणी भार अतिरिक्त आकारला जाईल, असेही या नाेटीसमध्ये नमूद केले आहे.