शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

आरटीईसाठी २१६२४ अर्ज

By admin | Updated: February 26, 2017 02:11 IST

शिक्षणहक्क अधिनियमानुसार (आरटीई) आरक्षित असलेल्या २५ टक्के जागासाठी आतापर्यत २१ हजार ६२४ विद्यार्थ्यानी आॅनलाईन अर्ज केले आहेत.

नागपूर : शिक्षणहक्क अधिनियमानुसार (आरटीई) आरक्षित असलेल्या २५ टक्के जागासाठी आतापर्यत २१ हजार ६२४ विद्यार्थ्यानी आॅनलाईन अर्ज केले आहेत. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने पसंतीच्या शाळांतील प्रवेशासाठी चांगलीच स्पर्धा होणार आहे. आरटीई अंतर्गत शहरातील नोंदणीकृत ६२२ शाळांत ७ हजारांहून अधिक जागा आहेत. परंतु आलेल्या अर्जाचा विचार करता एका जागेसाठी सरासरी तीन दावेदार असल्याचे चित्र आहे. केजी वन व पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी आलेल्या अर्जाची संख्या ६० टक्के आहे. उर्वरित प्रवेश अर्ज नर्सरी व इतर वर्गातील प्रवेशासाठी करण्यात आलेले आहे. अर्ज न भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत २ मार्चपर्यत वाढविण्यात आली आहे. या कालावधीत पुन्हा दोन ते अडीच हजार अर्ज येण्याची शक्यता आहे. अर्जाची संख्या पुन्हा वाढली तर प्रवेशासाठी चांगलीच स्पर्धा होणार आहे. अर्जाची संख्या विचारात घेता सोडत पद्धतीने आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. २ मार्चला अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर सोडत काढली जाणार आहे. पालकांना एसएमएस व्दारे यांची माहिती दिली जाणार आहे.(प्रतिनिधी)