शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द धरणाचे २१ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 20:34 IST

गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठेही वाढू लागले आहेत. मोठ्या प्रकल्पांमधील आसोलामेंढा दिना व पोथरा हे प्रकल्प तर १०० टक्के भरले आहेत. असे असले तरी मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूणच पाणीसाठा अजूनही पुरेसा झालेला नाही. मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ३८.२३ टक्के इतकाच साठा आहे. गेसेखुर्द धरण ३३.५५ टक्के भरले आहे. परंतु खबरदारी म्हणून गोसेखुर्द धरणातील २१ दरवाजे बुधवारी पुन्हा उघडण्यात आले. एक दिवसापूर्वी संपूर्ण ३१ दरवाजे उघडण्यात आले होते.

ठळक मुद्देमोठ्या प्रकल्पांमध्ये ३८.२३ टक्के साठा : असोलामेढा, दिना व पोथरा हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठेही वाढू लागले आहेत. मोठ्या प्रकल्पांमधील आसोलामेंढा दिना व पोथरा हे प्रकल्प तर १०० टक्के भरले आहेत. असे असले तरी मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूणच पाणीसाठा अजूनही पुरेसा झालेला नाही. मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ३८.२३ टक्के इतकाच साठा आहे. गेसेखुर्द धरण ३३.५५ टक्के भरले आहे. परंतु खबरदारी म्हणून गोसेखुर्द धरणातील २१ दरवाजे बुधवारी पुन्हा उघडण्यात आले. एक दिवसापूर्वी संपूर्ण ३१ दरवाजे उघडण्यात आले होते.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी आहे. या प्रकल्पांमध्ये आजच्या तारखेत एकूण १३५८.७८ दलघमी (३८.२३ टक्के) इतका पाणीसाठा आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा या धरणातील पाणीसाठा क्षमत ५२.३३ दलघमी इतकी आहे. तो १०० टक्के भरला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दिना या प्रकल्पाची क्षमता ६७.५४ दलघमी आहे, तर वर्धा जिल्ह्यातील पोथरा धरणाची साठा क्षमता ३५ दलघमी इतकी आहे. हेही प्रकल्प १० टक्के भरले आहेत. यासोबतच नागपूर जिल्ह्यातील लोवर नांद वना प्रकल्प ९४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील पूजारी टोला ८५ टक्के, कालीसरार ८३ टक्के भरले आहेत. याव्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह केवळ २१.३२ टक्के, कामठी खैरी ३३.७१ टक्के, रामटेक ४४.०३ टक्के, वडगाव ६६.०४ टक्के, इटियाडोह ५८.२३ टक्के, सिरपूर ४४.६४ टक्के, बोर ३०.२७ टक्के, धाम ३४.१८ टक्के, लोवर वर्धा (टप्पा-१), २६.९७ टक्के, बावनथडी २९.१३ टक्के, धापेवाडा बॅरेज (टप्पा-२)२५.२९ आणि गोसेखुर्द धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता ७४०.१७ दलघमी इतकी असून त्यात २४८.३४ दलघमी (३३.५५ टक्के) इतके भरले आहे. मोठ्या प्रकल्पातील बहुतांश प्रकल्पांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे.मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यात पाऊस चांगला झाल. तसेच गोसेखुर्द धरण पूर्ण क्षमतेने भरता येत नाही. त्यामुळे पाण्याचा जोर वाढला की, खबरदारी म्हणून धरणाचे दरवाजे उघडावे लागतात. सोमवारी आलेल्या पावसामुळेही गोसेखुर्दचे सर्वचे सर्व ३३ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा २१ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पfloodपूर