शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गोसेखुर्द धरणाचे २१ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 20:34 IST

गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठेही वाढू लागले आहेत. मोठ्या प्रकल्पांमधील आसोलामेंढा दिना व पोथरा हे प्रकल्प तर १०० टक्के भरले आहेत. असे असले तरी मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूणच पाणीसाठा अजूनही पुरेसा झालेला नाही. मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ३८.२३ टक्के इतकाच साठा आहे. गेसेखुर्द धरण ३३.५५ टक्के भरले आहे. परंतु खबरदारी म्हणून गोसेखुर्द धरणातील २१ दरवाजे बुधवारी पुन्हा उघडण्यात आले. एक दिवसापूर्वी संपूर्ण ३१ दरवाजे उघडण्यात आले होते.

ठळक मुद्देमोठ्या प्रकल्पांमध्ये ३८.२३ टक्के साठा : असोलामेढा, दिना व पोथरा हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठेही वाढू लागले आहेत. मोठ्या प्रकल्पांमधील आसोलामेंढा दिना व पोथरा हे प्रकल्प तर १०० टक्के भरले आहेत. असे असले तरी मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूणच पाणीसाठा अजूनही पुरेसा झालेला नाही. मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ३८.२३ टक्के इतकाच साठा आहे. गेसेखुर्द धरण ३३.५५ टक्के भरले आहे. परंतु खबरदारी म्हणून गोसेखुर्द धरणातील २१ दरवाजे बुधवारी पुन्हा उघडण्यात आले. एक दिवसापूर्वी संपूर्ण ३१ दरवाजे उघडण्यात आले होते.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी आहे. या प्रकल्पांमध्ये आजच्या तारखेत एकूण १३५८.७८ दलघमी (३८.२३ टक्के) इतका पाणीसाठा आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा या धरणातील पाणीसाठा क्षमत ५२.३३ दलघमी इतकी आहे. तो १०० टक्के भरला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दिना या प्रकल्पाची क्षमता ६७.५४ दलघमी आहे, तर वर्धा जिल्ह्यातील पोथरा धरणाची साठा क्षमता ३५ दलघमी इतकी आहे. हेही प्रकल्प १० टक्के भरले आहेत. यासोबतच नागपूर जिल्ह्यातील लोवर नांद वना प्रकल्प ९४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील पूजारी टोला ८५ टक्के, कालीसरार ८३ टक्के भरले आहेत. याव्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह केवळ २१.३२ टक्के, कामठी खैरी ३३.७१ टक्के, रामटेक ४४.०३ टक्के, वडगाव ६६.०४ टक्के, इटियाडोह ५८.२३ टक्के, सिरपूर ४४.६४ टक्के, बोर ३०.२७ टक्के, धाम ३४.१८ टक्के, लोवर वर्धा (टप्पा-१), २६.९७ टक्के, बावनथडी २९.१३ टक्के, धापेवाडा बॅरेज (टप्पा-२)२५.२९ आणि गोसेखुर्द धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता ७४०.१७ दलघमी इतकी असून त्यात २४८.३४ दलघमी (३३.५५ टक्के) इतके भरले आहे. मोठ्या प्रकल्पातील बहुतांश प्रकल्पांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे.मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यात पाऊस चांगला झाल. तसेच गोसेखुर्द धरण पूर्ण क्षमतेने भरता येत नाही. त्यामुळे पाण्याचा जोर वाढला की, खबरदारी म्हणून धरणाचे दरवाजे उघडावे लागतात. सोमवारी आलेल्या पावसामुळेही गोसेखुर्दचे सर्वचे सर्व ३३ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा २१ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पfloodपूर