शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

लग्नाला २०० लोकांची परवानगी, पण चार महिने मूहुर्तच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:12 IST

खापा : कोविड प्रतिबंधात्मक नियमामुळे सार्वजनिक कार्याक्रमावर बंदी होती. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ५० ऐवजी २०० लोकात लग्नसमारंभ ...

खापा : कोविड प्रतिबंधात्मक नियमामुळे सार्वजनिक कार्याक्रमावर बंदी होती. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ५० ऐवजी २०० लोकात लग्नसमारंभ आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. शासनाने प्रतिबंधात्मक नियमात काही अंशी शिथिलता आणली असली तरी पुढील चार महिने लग्नाचा मुहूर्त नसल्याने मंगल कार्यालय, कॅटरिंग व्यावसायिक, बॅंक पथकांना पुन्हा फटका बसला आहे.

गत दीड वर्षापासून सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असल्याने मंगल कार्यालय, कॅटरिंग व्यावसायिक, बॅंक पथकांना मोठा आर्थिक बसला आहे. यातील अनेकांवर उपासमीरीची पाळी आली आहे. लॉकडाऊन काळात काहींनी घरीच साधेपणाने लग्न समारंभ उरकवून घेतल्याने कुठेच सनई-चौघड्या वाजल्या नाही. जिथे गर्दी झाली तिथे न.प.च्या वतीने कारवाई करण्यात आली. त्यामुळे कारवाईच्या भीतीने अनेकांनी आपला व्यवसाय गुंडाळून ठेवला होता. आता लग्नसमारंभाला ही अंशी परवानगी मिळत असली तरी याला चातुर्मासाचा फटका बसतो आहे.

--

दोन वर्ष कसे काढले हे आम्हाला माहीत. लग्नसराईचा काळ लोटून गेल्यावर सरकारने परवानगी दिल्याने आनंदासारखे काही नाही. सध्या कुणाचेही बुकिंग नाही.

- दिलीप सनेश्वर, राज बॅंड पार्टी, खापा

--

सरकारने दिलेल्या परवानगीचे उपयोग काय? आता चार महिने मुहूर्त नाही. १८ महिने व्यवसाय बुडाला. कोणी भरपाई करून देणार आहे का?

देवाजी बोरकर, संचालक, मंगल कार्यालय