शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

२० वर्षात नागपूरचे १० तलाव अतिक्रमणाने गिळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:11 IST

निशांत वानखेडे नागपूर : नैसर्गिक संपत्तीच्या संवर्धनाबाबत आपण इतके बेजबाबदारपणे वागताे की हळूहळू एक एक वारसा गमावला आहे. बिल्डर ...

निशांत वानखेडे

नागपूर : नैसर्गिक संपत्तीच्या संवर्धनाबाबत आपण इतके बेजबाबदारपणे वागताे की हळूहळू एक एक वारसा गमावला आहे. बिल्डर लाॅबी व अतिक्रमणकारांनी जंगले, नद्या, तलाव घशात घातल्या आहेत आणि सरकार, सत्ताधारी, जबाबदार प्रशासन मूकपणे त्याला प्राेत्साहन देत अतिक्रमणाची मलाई खाण्यात मस्त आहेत. सामान्य माणसांना तर काही देणेघेणेच राहिले नाही. गेल्या २० वर्षात नागपुरातील १०-१२ तलाव अतिक्रमणाने अक्षरश: गिळंकृत केले आहेत. विश्वास बसत नाही ना, पुरावा हवा आहे ना, तर मग ‘गुगल मॅप’वर जा. २००० साली नागपूरच्या स्थितीचे बारकाईने अवलाेकन करा. नंतर कॅलेंडरचे वर्ष बदलवून २०१९-२० वर घेऊन या आणि निरीक्षण करा. तुमच्या शहरात, कदाचित शेजारी असलेले काही गायब झाल्याचे दिसेल.

एका पर्यावरणप्रेमीच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणातून आम्ही २० वर्षात बदललेली सत्यपरिस्थिती आपणासमाेर मांडताे आहाेत.

१) वाडी परिसरात २००० साली चार तलाव जवळजवळ हाेते. त्यातील एक तलाव एका माेठ्या बिल्डर कंपनीने पूर्ण बुजविले आणि वसाहत वसविली. दुसरा तलाव गाेडाऊनच्या अतिक्रमणात गायब झाला. उरलेले जवळचे दाेन तलाव वस्त्या वसल्याने एका तलावात रुपांतरीत झाले. या तलावांमधून अंबाझरीपर्यंत वाहणारे प्रवाहसुद्धा सुकले, नष्ट झाले.

२) हिंगणा राेड एरियात २००२ साली एअरपाेर्टजवळ एक व एमआयडीसी परिसरात दाेन तलाव तलाव स्पष्ट दिसतात. २०१९ च्या नकाशातून ते गायब झाले. विमानतळाजवळ मेट्राे यार्ड आहे तर एमआयडीसीचे तलाव निवासी वसाहतीत रुपांतर झाले.

३) २००० मध्ये अतिक्रमण नसल्याने विस्तारित असलेला साेनेगाव तलाव २०१९ मध्ये संकुचित झाला. मनीषनगर, बेसा भागात वेडावाकडा असलेला नदीचा प्रवाह अतिक्रमणाने सरळ करून टाकला.

४) रहाटे काॅलनी ते कारागृह भागात २००२ मध्ये दिसणारे लहान तलाव २०२० मध्ये नामशेष झाले.

५) पूर्व नागपूर, पारडी परिसरातून झिकझॅक असलेला नाग नदीचा प्रवाह अतिक्रमणामुळे सुतासारखा सरळ झाला.

६) काेराडी भागात २००३ मध्ये दिसणारे ३ तलाव वीज निर्मिती केंद्राच्या राखेने डबक्यात रुपांतरीत झाले.

७) इतवारीच्या परिसरातही २००० सालच्या नकाशात ३ तलाव तुम्हाला दिसतील. आता यातले दाेन तलाव तुम्ही दाखवून द्या.

८) शुक्रवारी तलावाजवळ २००० साली एक तलाव हाेता. आता त्यावर वसाहत वसली. फ्रेन्ड्स काॅलनी एरिया व नागपूरच्या बाह्यभागातूनही काही वाॅटर बाॅडिज नामशेष झाल्यात.

काेणत्याही गाेष्टीकडे दुर्लक्ष करण्याच्या सामान्यांच्या प्रवृत्तीमुळे नैसर्गिक संपत्तीची सर्रास लूट चालली आहे. या संपत्तीला पैसा कमाविण्याचे माध्यम मानणाऱ्या प्रवृत्तींच्या संगनमताने वारसा संपविला गेला. या साऱ्याचे भयंकर परिणाम भविष्याच्या पिढीला भाेगावे लागतील. निसर्ग, पर्यावरण या साऱ्याचा वचपा काढेल.

- प्राची माहुरकर, पर्यावरण अभ्यासक