शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

२० वर्षात नागपूरचे १० तलाव अतिक्रमणाने गिळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:11 IST

निशांत वानखेडे नागपूर : नैसर्गिक संपत्तीच्या संवर्धनाबाबत आपण इतके बेजबाबदारपणे वागताे की हळूहळू एक एक वारसा गमावला आहे. बिल्डर ...

निशांत वानखेडे

नागपूर : नैसर्गिक संपत्तीच्या संवर्धनाबाबत आपण इतके बेजबाबदारपणे वागताे की हळूहळू एक एक वारसा गमावला आहे. बिल्डर लाॅबी व अतिक्रमणकारांनी जंगले, नद्या, तलाव घशात घातल्या आहेत आणि सरकार, सत्ताधारी, जबाबदार प्रशासन मूकपणे त्याला प्राेत्साहन देत अतिक्रमणाची मलाई खाण्यात मस्त आहेत. सामान्य माणसांना तर काही देणेघेणेच राहिले नाही. गेल्या २० वर्षात नागपुरातील १०-१२ तलाव अतिक्रमणाने अक्षरश: गिळंकृत केले आहेत. विश्वास बसत नाही ना, पुरावा हवा आहे ना, तर मग ‘गुगल मॅप’वर जा. २००० साली नागपूरच्या स्थितीचे बारकाईने अवलाेकन करा. नंतर कॅलेंडरचे वर्ष बदलवून २०१९-२० वर घेऊन या आणि निरीक्षण करा. तुमच्या शहरात, कदाचित शेजारी असलेले काही गायब झाल्याचे दिसेल.

एका पर्यावरणप्रेमीच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणातून आम्ही २० वर्षात बदललेली सत्यपरिस्थिती आपणासमाेर मांडताे आहाेत.

१) वाडी परिसरात २००० साली चार तलाव जवळजवळ हाेते. त्यातील एक तलाव एका माेठ्या बिल्डर कंपनीने पूर्ण बुजविले आणि वसाहत वसविली. दुसरा तलाव गाेडाऊनच्या अतिक्रमणात गायब झाला. उरलेले जवळचे दाेन तलाव वस्त्या वसल्याने एका तलावात रुपांतरीत झाले. या तलावांमधून अंबाझरीपर्यंत वाहणारे प्रवाहसुद्धा सुकले, नष्ट झाले.

२) हिंगणा राेड एरियात २००२ साली एअरपाेर्टजवळ एक व एमआयडीसी परिसरात दाेन तलाव तलाव स्पष्ट दिसतात. २०१९ च्या नकाशातून ते गायब झाले. विमानतळाजवळ मेट्राे यार्ड आहे तर एमआयडीसीचे तलाव निवासी वसाहतीत रुपांतर झाले.

३) २००० मध्ये अतिक्रमण नसल्याने विस्तारित असलेला साेनेगाव तलाव २०१९ मध्ये संकुचित झाला. मनीषनगर, बेसा भागात वेडावाकडा असलेला नदीचा प्रवाह अतिक्रमणाने सरळ करून टाकला.

४) रहाटे काॅलनी ते कारागृह भागात २००२ मध्ये दिसणारे लहान तलाव २०२० मध्ये नामशेष झाले.

५) पूर्व नागपूर, पारडी परिसरातून झिकझॅक असलेला नाग नदीचा प्रवाह अतिक्रमणामुळे सुतासारखा सरळ झाला.

६) काेराडी भागात २००३ मध्ये दिसणारे ३ तलाव वीज निर्मिती केंद्राच्या राखेने डबक्यात रुपांतरीत झाले.

७) इतवारीच्या परिसरातही २००० सालच्या नकाशात ३ तलाव तुम्हाला दिसतील. आता यातले दाेन तलाव तुम्ही दाखवून द्या.

८) शुक्रवारी तलावाजवळ २००० साली एक तलाव हाेता. आता त्यावर वसाहत वसली. फ्रेन्ड्स काॅलनी एरिया व नागपूरच्या बाह्यभागातूनही काही वाॅटर बाॅडिज नामशेष झाल्यात.

काेणत्याही गाेष्टीकडे दुर्लक्ष करण्याच्या सामान्यांच्या प्रवृत्तीमुळे नैसर्गिक संपत्तीची सर्रास लूट चालली आहे. या संपत्तीला पैसा कमाविण्याचे माध्यम मानणाऱ्या प्रवृत्तींच्या संगनमताने वारसा संपविला गेला. या साऱ्याचे भयंकर परिणाम भविष्याच्या पिढीला भाेगावे लागतील. निसर्ग, पर्यावरण या साऱ्याचा वचपा काढेल.

- प्राची माहुरकर, पर्यावरण अभ्यासक