शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

वाहतूक करताना २० जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 18:03 IST

ट्रकमधून ४२ गाई-बैल कोंबून वाहतूक करीत असताना त्यातील २० जनावरांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवडनेर (वर्धा) : ट्रकमधून ४२ गाई-बैल कोंबून वाहतूक करीत असताना त्यातील २० जनावरांचा मृत्यू झाला. यानंतर चालकाने राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील कुटकी शिवारात ट्रक क्र. एमपी १७ एचएच १८०३ हा रस्त्याच्या बाजूला उभा करुन ठेवला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता सदर प्रकार उघडकीस आला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली असून पोलिसांंनी यातील २२ जनावरांची सुटका केली.प्राप्त माहितीनुसार कुटकी शिवारात एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ट्रकची तपासणी केली. ट्रकच्या केबिनमध्ये कोणीच नव्हते तर मागील डाल्यात ४२ गाई-बैल यांना दोरीने बांधून ठेवले होते. चारापाणी न मिळाल्याने तसेच कोंबून नेण्यात आल्याने काही जनावरांचा यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. नागपूर येथून सदर ट्रक हैद्राबाद येथे जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने मृत जनावरांना जमिनीत पुरले. तसेच जिवंत गुरांची सुटका करण्यात आली. वडनेर ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत बागडी, अजय रिठे, दाते, देवेंद्र उडाण यांनी सदर कार्यवाही केली. जनावरांची तस्करी सुरू असताना गुदमरुन जनावरांचा मृत्यू झाल्याने चालक वाहन सोडून पसार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वडनेर पोलिसात पशुसंवर्धन कायदा १९९५ कलम ११ (१) सहकलम ४२९ अन्वये गुन्हा दाखल केला.