शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

समरसतेची पालखी खांद्यावर घेऊन निघाले साहित्याचे वारकरी; संमेलनाचे सूप वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 20:47 IST

Nagpur News २ व ३ जुलै रोजी पार पडलेल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य व समरसतेवर आधारित १९ वे समरसता साहित्य संमेलन जेवढ्या थाटात तेवढेच आत्मचिंतनात्मक पाथेय देऊन पार पडले.

ठळक मुद्देअण्णा भाऊ साठे यांना आत्मसात करण्याचे झाले आवाहन

  नागपूर : समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्रच्या वतीने नागपुरात डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात २ व ३ जुलै रोजी पार पडलेल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य व समरसतेवर आधारित १९ वे समरसता साहित्य संमेलन जेवढ्या थाटात तेवढेच आत्मचिंतनात्मक पाथेय देऊन पार पडले. उद्घाटन सोहळ्यापासून ते विभिन्न चर्चासत्रे, कलाकृती, संगीतरजनी आणि समारोपीय सत्रातील थोरामोठ्यांच्या वक्तृत्वातून व्यक्त झालेली समरसतेची पालखी खांद्यावर घेऊन साहित्याचे वारकरी मार्गस्थ झाले आहेत.

समरसता केवळ बोलण्याची, लिहिण्याची गोष्ट नव्हे तर ती कर्तृत्व साधण्याची शिदोरी होय. ही शिदोरी साहित्यात उतरली तर एकमेकांवर आगपाखड करण्याऐवजी त्यातून एकोपा कसा साधता येईल आणि ‘आम्ही तुम्ही बंधू बंधू’ हा भाव कसा जागवता येईल, याची प्रेरणा मिळेल, असा भाव ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील राष्ट्रीयता’, ‘अण्णा भाऊ साठे : समतेचा पथिक’, ‘नव्वदोत्तर साहित्यातील समरसता’, ‘अण्णाभाऊंचे साहित्यविश्व : आकलन आणि आस्वादन’ या परिसंवादातून व्यक्त झाला. ‘विषमतेच्या विषातून समरसता निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे अण्णाभाऊंच्या जगण्या-मरण्यातील दु:ख, वेदना, संघर्ष आत्मसात करणे अपेक्षित’ असल्याची भावना संमेलनाच्या उद्घाटनीय सत्रात संमेलनाचे उद्घाटक माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार तरुण विजय यांनी व्यक्त केली होती.

तोच धागा पकडत संमेलनाचे माजी अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी.. अण्णाभाऊंच्या साहित्यात जसा भटक्या विमुक्तांचा आवाज बुलंद होतो, तसाच वंचितांच्या, पिचलेल्यांच्याही वेदनेलाही पाझर फुटतो. त्यांच्या साहित्यातील स्त्री ही रणरागिणी असल्याचा भाव व्यक्त केला. संमेलनातून निघालेला हा सूर महत्त्वाचा असून त्याला संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी श्रीमद्भगवदगीतेतील पंचसूत्रांचा जागर करत कोणत्याही कामाला अधिष्ठान, कर्ता, साधने, क्रिया आणि दैव या पाच परिसांचा स्पर्श करण्याचे आवाहन केले. संमेलनातील ‘विषयनिष्ठ भाषण’, ‘निमंत्रितांचे कविसंमेलन’, ‘संवाद : सामाजिक सृजनशीलतेशी’ आदी सत्रांतून भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळाचा कानोसा घेण्यात आला. संमेलनात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील साहित्यिक व साहित्यरसिक सहभागी झाले होते. साहित्यरसिकांसाठी साहित्याचे दालन दर्शनीय होते. साहित्य पालखी-दिंडीपासून ते समारोपापर्यंत सर्वच उपक्रमात समरसता हा विषय प्राधान्याने अंतर्भूत करण्यात आला होता.

क्रांतिवीर समशेर सिंग पारधी यांच्या स्मारकाला भेट

पारधी समाज व भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी आयुष्य खर्ची घालणारे संमेलनाचे मावळते अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे व संमेलन आयोजकांनी उमरेड तालुक्यातील समशेरनगर (चांपा) येथील क्रांतिवीर समशेर सिंग पारधी (भोसले) यांच्या स्मारकाला भेट दिली. याप्रसंगी सरपंच आतिष पवार, अ. भा. आदिम महासंघाचे राष्ट्रीय महासचिव बबन गोरामन उपस्थित होते.

 

टॅग्स :literatureसाहित्य