शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

समरसतेची पालखी खांद्यावर घेऊन निघाले साहित्याचे वारकरी; संमेलनाचे सूप वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 20:47 IST

Nagpur News २ व ३ जुलै रोजी पार पडलेल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य व समरसतेवर आधारित १९ वे समरसता साहित्य संमेलन जेवढ्या थाटात तेवढेच आत्मचिंतनात्मक पाथेय देऊन पार पडले.

ठळक मुद्देअण्णा भाऊ साठे यांना आत्मसात करण्याचे झाले आवाहन

  नागपूर : समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्रच्या वतीने नागपुरात डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात २ व ३ जुलै रोजी पार पडलेल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य व समरसतेवर आधारित १९ वे समरसता साहित्य संमेलन जेवढ्या थाटात तेवढेच आत्मचिंतनात्मक पाथेय देऊन पार पडले. उद्घाटन सोहळ्यापासून ते विभिन्न चर्चासत्रे, कलाकृती, संगीतरजनी आणि समारोपीय सत्रातील थोरामोठ्यांच्या वक्तृत्वातून व्यक्त झालेली समरसतेची पालखी खांद्यावर घेऊन साहित्याचे वारकरी मार्गस्थ झाले आहेत.

समरसता केवळ बोलण्याची, लिहिण्याची गोष्ट नव्हे तर ती कर्तृत्व साधण्याची शिदोरी होय. ही शिदोरी साहित्यात उतरली तर एकमेकांवर आगपाखड करण्याऐवजी त्यातून एकोपा कसा साधता येईल आणि ‘आम्ही तुम्ही बंधू बंधू’ हा भाव कसा जागवता येईल, याची प्रेरणा मिळेल, असा भाव ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील राष्ट्रीयता’, ‘अण्णा भाऊ साठे : समतेचा पथिक’, ‘नव्वदोत्तर साहित्यातील समरसता’, ‘अण्णाभाऊंचे साहित्यविश्व : आकलन आणि आस्वादन’ या परिसंवादातून व्यक्त झाला. ‘विषमतेच्या विषातून समरसता निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे अण्णाभाऊंच्या जगण्या-मरण्यातील दु:ख, वेदना, संघर्ष आत्मसात करणे अपेक्षित’ असल्याची भावना संमेलनाच्या उद्घाटनीय सत्रात संमेलनाचे उद्घाटक माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार तरुण विजय यांनी व्यक्त केली होती.

तोच धागा पकडत संमेलनाचे माजी अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी.. अण्णाभाऊंच्या साहित्यात जसा भटक्या विमुक्तांचा आवाज बुलंद होतो, तसाच वंचितांच्या, पिचलेल्यांच्याही वेदनेलाही पाझर फुटतो. त्यांच्या साहित्यातील स्त्री ही रणरागिणी असल्याचा भाव व्यक्त केला. संमेलनातून निघालेला हा सूर महत्त्वाचा असून त्याला संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी श्रीमद्भगवदगीतेतील पंचसूत्रांचा जागर करत कोणत्याही कामाला अधिष्ठान, कर्ता, साधने, क्रिया आणि दैव या पाच परिसांचा स्पर्श करण्याचे आवाहन केले. संमेलनातील ‘विषयनिष्ठ भाषण’, ‘निमंत्रितांचे कविसंमेलन’, ‘संवाद : सामाजिक सृजनशीलतेशी’ आदी सत्रांतून भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळाचा कानोसा घेण्यात आला. संमेलनात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील साहित्यिक व साहित्यरसिक सहभागी झाले होते. साहित्यरसिकांसाठी साहित्याचे दालन दर्शनीय होते. साहित्य पालखी-दिंडीपासून ते समारोपापर्यंत सर्वच उपक्रमात समरसता हा विषय प्राधान्याने अंतर्भूत करण्यात आला होता.

क्रांतिवीर समशेर सिंग पारधी यांच्या स्मारकाला भेट

पारधी समाज व भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी आयुष्य खर्ची घालणारे संमेलनाचे मावळते अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे व संमेलन आयोजकांनी उमरेड तालुक्यातील समशेरनगर (चांपा) येथील क्रांतिवीर समशेर सिंग पारधी (भोसले) यांच्या स्मारकाला भेट दिली. याप्रसंगी सरपंच आतिष पवार, अ. भा. आदिम महासंघाचे राष्ट्रीय महासचिव बबन गोरामन उपस्थित होते.

 

टॅग्स :literatureसाहित्य