शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

नागपुरात १८ कामगारांना अन्नातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 10:44 IST

बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील मोरारजी टेक्स्टाईल कंपनीच्या १८ कामगारांना मंगळवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली. या १८ कामगारांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

ठळक मुद्देमोरारजी टेक्स्टाईल येथील घटना जेवणात आढळली पाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील मोरारजी टेक्स्टाईल कंपनीच्या १८ कामगारांना मंगळवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली. या १८ कामगारांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.मोरारजी टेक्स्टाईल कंपनीत आशिष मिश्रा यांच्या दुर्गा गणेश केटरिंग सर्व्हिसला खानावळीचे कंत्राट आहे. या खानावळीत जेवण पुरविणे आणि स्वच्छतेचे काम उमेश पांडे हा बघतो. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान कंपनीचे कामगार जेवण करीत असताना अनिल गिºहे (४२) रा. हिंगणा यांच्या जेवणाच्या ताटातील वरणामध्ये मृत पाल आढळून आली. तोपर्यंत खानावळीत उपस्थित असलेल्या अनेक कामगारांनी जेवण करणे सुरू केले होते. परंतु अनिल गिºहे यांना जेवणात पाल आढळून येताच त्याने इतर सहकारी कामगारांना याबाबत अवगत केले. अन्नात पाल पाहून अनिल याने ओकारी केली. यानंतर इतर कामगारांनीही ओकाऱ्या करायला सुरुवात केली. जवळपास १८ कामगारांना अन्नातून विषबाधा झाली असून, त्यात मनोहर नारायण खंदारे (४२) रा. तुरकमारी, रवींद्र विठोबा निमकर (३३) रा. देवळी आमगाव, रमेश गुरनुले (४० ), ज्ञानेश्वर माहुरे (३८) रा. घोराड, विजय येलूरे (४०) रा. कान्होलीबारा, देविदास कावळे (४८) रा. टाकळघाट, अमोल पांडे (३८) रा. बुटीबोरी, मनोज जिव्हारे(४३) रा. बुटीबोरी, विकास बेलेकर(४४) रा. सातगाव, रमेश करडभाजने (३१) सालईदभा, अजय बनकर (२९) रा. शिरुळ , रामेश्वर बोपचे (३९) रा. बोथली, संजय शरणागत (२९) रा. बुटीबोरी, मोहन नाटेकर (३२) रा. बुटीबोरी, शैलेश ढबाले (२२) रा. सालईदाभा, ज्ञानेश्वर ठाकरे (४०) रा. कान्होलीबारा, दिलीप उरकुडे (४०) रा. कान्होलीबारा यांचा यात समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी एमआयडीसीचे ठाणेदार सुनील लांघी ताफ्यासह कंपनीत दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून विषबाधित कामगारांना बुटीबोरी येथील रचना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील १० कामगारांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. अन्नाचा रासायनिक विश्लेषकाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सुनील लांघी यांनी दिली. 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा