शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

नागपुरात १८ कामगारांना अन्नातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 10:44 IST

बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील मोरारजी टेक्स्टाईल कंपनीच्या १८ कामगारांना मंगळवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली. या १८ कामगारांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

ठळक मुद्देमोरारजी टेक्स्टाईल येथील घटना जेवणात आढळली पाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील मोरारजी टेक्स्टाईल कंपनीच्या १८ कामगारांना मंगळवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली. या १८ कामगारांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.मोरारजी टेक्स्टाईल कंपनीत आशिष मिश्रा यांच्या दुर्गा गणेश केटरिंग सर्व्हिसला खानावळीचे कंत्राट आहे. या खानावळीत जेवण पुरविणे आणि स्वच्छतेचे काम उमेश पांडे हा बघतो. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान कंपनीचे कामगार जेवण करीत असताना अनिल गिºहे (४२) रा. हिंगणा यांच्या जेवणाच्या ताटातील वरणामध्ये मृत पाल आढळून आली. तोपर्यंत खानावळीत उपस्थित असलेल्या अनेक कामगारांनी जेवण करणे सुरू केले होते. परंतु अनिल गिºहे यांना जेवणात पाल आढळून येताच त्याने इतर सहकारी कामगारांना याबाबत अवगत केले. अन्नात पाल पाहून अनिल याने ओकारी केली. यानंतर इतर कामगारांनीही ओकाऱ्या करायला सुरुवात केली. जवळपास १८ कामगारांना अन्नातून विषबाधा झाली असून, त्यात मनोहर नारायण खंदारे (४२) रा. तुरकमारी, रवींद्र विठोबा निमकर (३३) रा. देवळी आमगाव, रमेश गुरनुले (४० ), ज्ञानेश्वर माहुरे (३८) रा. घोराड, विजय येलूरे (४०) रा. कान्होलीबारा, देविदास कावळे (४८) रा. टाकळघाट, अमोल पांडे (३८) रा. बुटीबोरी, मनोज जिव्हारे(४३) रा. बुटीबोरी, विकास बेलेकर(४४) रा. सातगाव, रमेश करडभाजने (३१) सालईदभा, अजय बनकर (२९) रा. शिरुळ , रामेश्वर बोपचे (३९) रा. बोथली, संजय शरणागत (२९) रा. बुटीबोरी, मोहन नाटेकर (३२) रा. बुटीबोरी, शैलेश ढबाले (२२) रा. सालईदाभा, ज्ञानेश्वर ठाकरे (४०) रा. कान्होलीबारा, दिलीप उरकुडे (४०) रा. कान्होलीबारा यांचा यात समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी एमआयडीसीचे ठाणेदार सुनील लांघी ताफ्यासह कंपनीत दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून विषबाधित कामगारांना बुटीबोरी येथील रचना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील १० कामगारांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. अन्नाचा रासायनिक विश्लेषकाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सुनील लांघी यांनी दिली. 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा