शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १,७३,८२१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात चालू खरीप हंगामामध्ये सततचा पाऊस व पुरामुळे १३ तालुक्यांमधील एकूण २,१३,७१० शेतकऱ्यांचे नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात चालू खरीप हंगामामध्ये सततचा पाऊस व पुरामुळे १३ तालुक्यांमधील एकूण २,१३,७१० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची नाेंद महसूल विभागाने केली. प्रति हेक्टरी १८ हजार रुपयांप्रमाणे (कमाल दाेन हेक्टर) जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे १०९ काेटी ७८ लाख ६८ हजार रुपयांची मागणी केली. प्रशासनाने मिळालेल्या ३६ काेटी ९ लाख १२ हजार रुपयांमधून ३९,८८९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. मात्र, जिल्ह्यातील १,७३,७१० शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायम आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)च्या निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान क्षेत्र नरखेड तालुक्यात आहे. या तालुक्यात ६३० शेतकऱ्यांचे २३२.९३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची नाेंद करण्यात आली. त्याखालाेखाल हिंगणा व कुही तालुक्यातील नुकसान दर्शविले आहे. काटाेल तालुक्यातील ११८ शेतकऱ्यांचे ९१ हेक्टरमधील नुकसान दर्शविण्यात आले आहे. पुरामुळे सावनेर, कामठी व माैदा तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. वास्तवात, नुकसानीचा आकडा यापेक्षा अधिक आहे.

जिल्हा प्रशासनाने २,१३,७१० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडे १०९ काेटी ७८ लाख ६८ हजार रुपयांची मागणी केली हाेती. परंतु, प्रशासनाला आजवर ३६ काेटी ९ लाख १२ हजार रुपये दिले. त्यामुळे जिल्ह्यातील ३९,८८९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली. दुसरीकडे, प्रशासनाला उर्वरित ७३ काेटी ६९ लाख ५६ हजार रुपयांच्या निधीची प्रतीक्षा असल्याने १,७३,८२१ शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळू शकली नाही. दुसरीकडे, जिल्ह्यात किडी व राेगाच्या प्रादुर्भावामुळे साेयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. कपाशी, तूर, मूग उडीद याही पिकांना किडींचा जबर फटका बसला आहे. परंतु, प्रशासनाने किडींमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षणच केले नाही. त्यामुळे शासनाने त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसली आहेत.

मदतीसाठी एकूण निधीची मागणी

१०९७८६८०००

प्राप्त झालेला निधी

३६०९१२०००

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी

२१३७१०

मदतीचा लाभ मिळालेले शेतकरी

३९८८९

मदतीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी

१७३८२१

जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला वेळावेळी सादर करण्यात आला. शासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त हाेताे.

प्राप्त निधी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. उर्वरित निधी प्राप्त झाला की ताेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.

- रवींद्र ठाकरे

जिल्हाधिकारी, नागपूर

पावसामुळे साेयाबीन, कपाशीसह अन्य पिके व माेसंबीचे प्रचंड नुकसान झाले. साेयाबीनवर राेटाव्हेटर चालवावे लागले. शासनाने सर्वेक्षणही केले. मात्र, नुकसान भरपाईचा एक पैसाही अद्याप मिळाला नाही. शासनाने नुकसान भरपाई देताना केवळ पूरग्रस्तांना प्राधान्य दिले आहे. इतर शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा.

- मनाेज जवंजाळ

शेतकरी, काटाेल