शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

जिल्ह्यात १,७३,८२१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात चालू खरीप हंगामामध्ये सततचा पाऊस व पुरामुळे १३ तालुक्यांमधील एकूण २,१३,७१० शेतकऱ्यांचे नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात चालू खरीप हंगामामध्ये सततचा पाऊस व पुरामुळे १३ तालुक्यांमधील एकूण २,१३,७१० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची नाेंद महसूल विभागाने केली. प्रति हेक्टरी १८ हजार रुपयांप्रमाणे (कमाल दाेन हेक्टर) जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे १०९ काेटी ७८ लाख ६८ हजार रुपयांची मागणी केली. प्रशासनाने मिळालेल्या ३६ काेटी ९ लाख १२ हजार रुपयांमधून ३९,८८९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. मात्र, जिल्ह्यातील १,७३,७१० शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायम आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)च्या निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान क्षेत्र नरखेड तालुक्यात आहे. या तालुक्यात ६३० शेतकऱ्यांचे २३२.९३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची नाेंद करण्यात आली. त्याखालाेखाल हिंगणा व कुही तालुक्यातील नुकसान दर्शविले आहे. काटाेल तालुक्यातील ११८ शेतकऱ्यांचे ९१ हेक्टरमधील नुकसान दर्शविण्यात आले आहे. पुरामुळे सावनेर, कामठी व माैदा तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. वास्तवात, नुकसानीचा आकडा यापेक्षा अधिक आहे.

जिल्हा प्रशासनाने २,१३,७१० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडे १०९ काेटी ७८ लाख ६८ हजार रुपयांची मागणी केली हाेती. परंतु, प्रशासनाला आजवर ३६ काेटी ९ लाख १२ हजार रुपये दिले. त्यामुळे जिल्ह्यातील ३९,८८९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली. दुसरीकडे, प्रशासनाला उर्वरित ७३ काेटी ६९ लाख ५६ हजार रुपयांच्या निधीची प्रतीक्षा असल्याने १,७३,८२१ शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळू शकली नाही. दुसरीकडे, जिल्ह्यात किडी व राेगाच्या प्रादुर्भावामुळे साेयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. कपाशी, तूर, मूग उडीद याही पिकांना किडींचा जबर फटका बसला आहे. परंतु, प्रशासनाने किडींमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षणच केले नाही. त्यामुळे शासनाने त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसली आहेत.

मदतीसाठी एकूण निधीची मागणी

१०९७८६८०००

प्राप्त झालेला निधी

३६०९१२०००

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी

२१३७१०

मदतीचा लाभ मिळालेले शेतकरी

३९८८९

मदतीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी

१७३८२१

जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला वेळावेळी सादर करण्यात आला. शासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त हाेताे.

प्राप्त निधी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. उर्वरित निधी प्राप्त झाला की ताेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.

- रवींद्र ठाकरे

जिल्हाधिकारी, नागपूर

पावसामुळे साेयाबीन, कपाशीसह अन्य पिके व माेसंबीचे प्रचंड नुकसान झाले. साेयाबीनवर राेटाव्हेटर चालवावे लागले. शासनाने सर्वेक्षणही केले. मात्र, नुकसान भरपाईचा एक पैसाही अद्याप मिळाला नाही. शासनाने नुकसान भरपाई देताना केवळ पूरग्रस्तांना प्राधान्य दिले आहे. इतर शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा.

- मनाेज जवंजाळ

शेतकरी, काटाेल