शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
2
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
3
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
4
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
5
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
7
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
8
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
9
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
10
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
11
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
12
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
13
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
14
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
15
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
16
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
17
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
19
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
20
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपात पुन्हा घोटाळा? बाकड्यांना फुटले पाय; शोधूनही ठावठिकाणा लागेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 13:28 IST

मनपाचे बाकडे राजकीय नेत्यांची कार्यालये व घरांची शोभा वाढवत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनपा प्रशासनाने चौकशी केली असता ३ वर्षांत १७,५६२ बाकड्यांवर ११.९१ कोटींचा निधी खर्च झाल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्दे१७ हजारांहून अधिक बाकड्यांचा एनजीओ घेणार शोध

गणेश हूड

नागपूर : महापालिकेतील काेट्यवधीचा स्टेशनरी घोटाळा गाजत असतानाच बाकडांचा घोटाळा पुढे आला आहे. मागील तीन वर्षांत १७ हजार ५६२ बाकड्यांचे वाटप करण्यात आले. यावर ११ कोटी ९१ लाख ८५ हजार रुपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात यापैकी १० ते १२ हजार बाकड्यांचे वाटप झाले असून, इतर बाकडे न लावताच बिल उचलण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहानिशा करण्यासाठी शोध घेतला असता हजारो बाकड्यांचा ठावठिकाणा नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

शहरातील सार्वजनिक स्थळ, उद्यान, वाचनालय, धार्मिक स्थळी नागरिकांना सुविधा व्हावी, यासाठी महापालिकेच्या निधीतून बाकडे बसविले जातात. यासाठी नगरसेवकांच्या शिफारशीनुसार या बाकड्यांचे वाटप केले जाते. शहरातील सिवेज, नाल्या दुरुस्तीसाठी मागणी करूनही निधी मिळत नसताना बाकड्यांवर मात्र तब्बल ११.९१ कोटींचा खर्च करण्यात आला. स्थायी समिती, महापौर निधी, उपमहापौर निधी, दुर्बल घटकांच्या निधीचा यासाठी वापर करण्यात आला.

मनपाचे बाकडे राजकीय नेत्यांची कार्यालये व घरांची शोभा वाढवत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनपा प्रशासनाने याची चौकशी केली असता तीन वर्षांत तब्बल १७,५६२ बाकड्यांवर ११.९१ कोटींचा निधी खर्च झाल्याचे निदर्शनास आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी बाकड्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पथकाने शोध घेऊन याबाबतचा अहवाल सादर केला. यात हजारो बाकड्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच बाकडे निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. आयुक्तांच्या निर्देशानुसार बाकड्यांचा शोध घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार असल्याची माहिती उपायुक्त निर्भय जैन यांनी दिली.

स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शोध

मनपातील नोंदीनुसार शहरात बसविण्यात आलेल्या बाकड्यांची संख्या मोठी आहे. प्रत्यक्षात पाच ते सहा हजार बाकडे बसविण्यातच आलेले नाहीत. याचा शोध घेण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. स्वयंसेवी संस्थांवर याची जबाबदारी सोपविली जाणार आहे. मनपातील अनावश्यक खर्चाला लगाम घातला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfraudधोकेबाजी