शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपूर मनपात पुन्हा घोटाळा? बाकड्यांना फुटले पाय; शोधूनही ठावठिकाणा लागेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 13:28 IST

मनपाचे बाकडे राजकीय नेत्यांची कार्यालये व घरांची शोभा वाढवत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनपा प्रशासनाने चौकशी केली असता ३ वर्षांत १७,५६२ बाकड्यांवर ११.९१ कोटींचा निधी खर्च झाल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्दे१७ हजारांहून अधिक बाकड्यांचा एनजीओ घेणार शोध

गणेश हूड

नागपूर : महापालिकेतील काेट्यवधीचा स्टेशनरी घोटाळा गाजत असतानाच बाकडांचा घोटाळा पुढे आला आहे. मागील तीन वर्षांत १७ हजार ५६२ बाकड्यांचे वाटप करण्यात आले. यावर ११ कोटी ९१ लाख ८५ हजार रुपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात यापैकी १० ते १२ हजार बाकड्यांचे वाटप झाले असून, इतर बाकडे न लावताच बिल उचलण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहानिशा करण्यासाठी शोध घेतला असता हजारो बाकड्यांचा ठावठिकाणा नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

शहरातील सार्वजनिक स्थळ, उद्यान, वाचनालय, धार्मिक स्थळी नागरिकांना सुविधा व्हावी, यासाठी महापालिकेच्या निधीतून बाकडे बसविले जातात. यासाठी नगरसेवकांच्या शिफारशीनुसार या बाकड्यांचे वाटप केले जाते. शहरातील सिवेज, नाल्या दुरुस्तीसाठी मागणी करूनही निधी मिळत नसताना बाकड्यांवर मात्र तब्बल ११.९१ कोटींचा खर्च करण्यात आला. स्थायी समिती, महापौर निधी, उपमहापौर निधी, दुर्बल घटकांच्या निधीचा यासाठी वापर करण्यात आला.

मनपाचे बाकडे राजकीय नेत्यांची कार्यालये व घरांची शोभा वाढवत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनपा प्रशासनाने याची चौकशी केली असता तीन वर्षांत तब्बल १७,५६२ बाकड्यांवर ११.९१ कोटींचा निधी खर्च झाल्याचे निदर्शनास आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी बाकड्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पथकाने शोध घेऊन याबाबतचा अहवाल सादर केला. यात हजारो बाकड्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच बाकडे निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. आयुक्तांच्या निर्देशानुसार बाकड्यांचा शोध घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार असल्याची माहिती उपायुक्त निर्भय जैन यांनी दिली.

स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शोध

मनपातील नोंदीनुसार शहरात बसविण्यात आलेल्या बाकड्यांची संख्या मोठी आहे. प्रत्यक्षात पाच ते सहा हजार बाकडे बसविण्यातच आलेले नाहीत. याचा शोध घेण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. स्वयंसेवी संस्थांवर याची जबाबदारी सोपविली जाणार आहे. मनपातील अनावश्यक खर्चाला लगाम घातला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfraudधोकेबाजी