शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

नागपूर मनपात पुन्हा घोटाळा? बाकड्यांना फुटले पाय; शोधूनही ठावठिकाणा लागेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 13:28 IST

मनपाचे बाकडे राजकीय नेत्यांची कार्यालये व घरांची शोभा वाढवत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनपा प्रशासनाने चौकशी केली असता ३ वर्षांत १७,५६२ बाकड्यांवर ११.९१ कोटींचा निधी खर्च झाल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्दे१७ हजारांहून अधिक बाकड्यांचा एनजीओ घेणार शोध

गणेश हूड

नागपूर : महापालिकेतील काेट्यवधीचा स्टेशनरी घोटाळा गाजत असतानाच बाकडांचा घोटाळा पुढे आला आहे. मागील तीन वर्षांत १७ हजार ५६२ बाकड्यांचे वाटप करण्यात आले. यावर ११ कोटी ९१ लाख ८५ हजार रुपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात यापैकी १० ते १२ हजार बाकड्यांचे वाटप झाले असून, इतर बाकडे न लावताच बिल उचलण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहानिशा करण्यासाठी शोध घेतला असता हजारो बाकड्यांचा ठावठिकाणा नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

शहरातील सार्वजनिक स्थळ, उद्यान, वाचनालय, धार्मिक स्थळी नागरिकांना सुविधा व्हावी, यासाठी महापालिकेच्या निधीतून बाकडे बसविले जातात. यासाठी नगरसेवकांच्या शिफारशीनुसार या बाकड्यांचे वाटप केले जाते. शहरातील सिवेज, नाल्या दुरुस्तीसाठी मागणी करूनही निधी मिळत नसताना बाकड्यांवर मात्र तब्बल ११.९१ कोटींचा खर्च करण्यात आला. स्थायी समिती, महापौर निधी, उपमहापौर निधी, दुर्बल घटकांच्या निधीचा यासाठी वापर करण्यात आला.

मनपाचे बाकडे राजकीय नेत्यांची कार्यालये व घरांची शोभा वाढवत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनपा प्रशासनाने याची चौकशी केली असता तीन वर्षांत तब्बल १७,५६२ बाकड्यांवर ११.९१ कोटींचा निधी खर्च झाल्याचे निदर्शनास आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी बाकड्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पथकाने शोध घेऊन याबाबतचा अहवाल सादर केला. यात हजारो बाकड्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच बाकडे निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. आयुक्तांच्या निर्देशानुसार बाकड्यांचा शोध घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार असल्याची माहिती उपायुक्त निर्भय जैन यांनी दिली.

स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शोध

मनपातील नोंदीनुसार शहरात बसविण्यात आलेल्या बाकड्यांची संख्या मोठी आहे. प्रत्यक्षात पाच ते सहा हजार बाकडे बसविण्यातच आलेले नाहीत. याचा शोध घेण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. स्वयंसेवी संस्थांवर याची जबाबदारी सोपविली जाणार आहे. मनपातील अनावश्यक खर्चाला लगाम घातला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfraudधोकेबाजी