शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

१६७५ शेतकरी सावकारी कर्जातून मुक्त

By admin | Updated: October 16, 2015 03:18 IST

नागपूर जिल्ह्यातील उमरेड, काटोल, रामटेक, हिंगणा आणि कळमेश्वर या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील ...

२ कोटी ७७ लाख रुपयांचे सावकारी कर्ज माफनागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड, काटोल, रामटेक, हिंगणा आणि कळमेश्वर या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले ५२९ शेतकऱ्यांचे ७५ लाख ७८ हजार ४७४ रुपये इतके कर्ज गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत माफ करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील एकूण १६७५ शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्तता मिळाली आहे. आतापर्यंत एकूण १७५ सावकारांकडून घेतलेले २ कोटी ७७ लाख २५ हजार ५९२ रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीस जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रतिनिधी रतनसिंह यादव, उपनिबंधक सतीश भोसले, जिल्हा विशेष लेखापरीक्षक प्रतिनिधी डी एस. पारसे, सहायक निबंधक टी.एन. चव्हाण, अशोक गिरी, सुखदेव कोल्हे, प्रकाश भजनी, अंजुषा गराटे उपस्थित होते. गुरुवारच्या बैठकीत उमरेड तालुक्यातील २६७ शेतकऱ्यांचे ४५ लाख ३४ हजार ७९७ रुपये, काटोल येथील २१४ शेतकऱ्यांचे २३ लाख २४ हजार ८८३ रुपये, रामटेक येथील २३ शेतकऱ्यांचे ४ लाख १९ हजार ९०७ रुपये, हिंगणा येथील ४ शेतकऱ्यांचे २९,५३२ रुपये, कळमेश्वर तालुक्यातील २१ शेतकऱ्यांचे २ लाख ६९ हजार ३५५ रुपये असे एकूण ५२९ शेतकऱ्यांनी घेतलेले ७५ लाख ७८ हजार ४७४ रुपये कर्ज माफ करण्यात आले. जिल्ह्यातील पात्र शेतकरी कर्जदारांची प्रकरणे तालुकास्तरीय समितीने अद्यापपर्यंत निकाली काढली नाहीत. ती प्रकरणे येत्या २८ आॅक्टोबरपर्यंत दाखल करण्याची सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी बैठकीत केली. परवानाधारक सावकारांनी त्यांच्या स्तरावरील पात्र कर्जदार शेतकऱ्याचे कर्ज मंजुरीचे प्रस्ताव तालुका सहायक निबंधक यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले. (प्रतिनिधी)