शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वर्धा, यवतमाळातील जंगलात १६ मोरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 11:45 IST

Nagpur News peacocks गुरुवारी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील जंगलामध्ये १६ मोर मृत्युमुखी पडल्याचे आढळले आहे. बर्ड फ्लूच्या या काळामध्ये मोरांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ठळक मुद्देगुरुवारी नव्याने १६९ कोंबड्यांचे मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गुरुवारी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील जंगलामध्ये १६ मोर मृत्युमुखी पडल्याचे आढळले आहे. बर्ड फ्लूच्या या काळामध्ये मोरांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यालगतच्या जंगलात आठ मोरांचा मृत्यू झाला असून, वर्धा जिल्ह्यातील बोरगाव दातार (ता. हिंगणघाट) येथे आठ मोर मृतावस्थेत आढळले. यातील एक मादी असून, सात नर आहेत. या दोन्ही ठिकाणांवरील मृत मोरांचे नमुने गोळा करण्यात आले असून, ते प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.

गुरुवारी विदर्भात नव्याने १६९ मृत कोंबड्यांची भर पडली आहे. यासंदर्भात नागपूरचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुंभारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील एका फार्मवर ८५ कोंबड्या मृत आढळल्या, तर अन्य ठिकाणी असलेल्या खासगी फार्मवर २५ कोंबड्या मृत झालेल्या आढळल्या. गडचिरोली जिल्ह्यातील एका पोल्ट्री फार्मवर १५, गोंदियात ३० आणि वर्धा जिल्ह्यात १४ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची नोंद गुरुवारी घेण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात आर्णी येथे मृत आढळलेल्या व अन्य कोंबड्यांमध्ये ‘राणीखेत’ (मर) आजाराची लक्षणे सकृतदर्शनी आढळली आहे. त्यामुळे अशा पक्ष्यांसाठी प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

आज अहवाल येणार

नागपूर विभागातून आतापर्यंत मृत पक्ष्यांचे २४ नमुने वेगवेगळ्या तारखांना पाठविले आहेत. त्यांचा तपासणी अहवाल अद्याप आलेला नाही. हे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत असून, आज, शुक्रवारी त्यांचा अहवाल येण्याची अपेक्षा प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुंभारे यांनी व्यक्त केली आहे.

...

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू