शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात जंगलाजवळ वसली आहेत १५ हजार गावे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:14 IST

नागपूर : केवळ महाराष्ट्राचा विचार केल्यास येथील वनांमध्ये किंवा वनांजवळ १५ हजाराच्या जवळपास गावे वसलेली आहेत. येथील ग्रामस्थांच्या गरजा ...

नागपूर : केवळ महाराष्ट्राचा विचार केल्यास येथील वनांमध्ये किंवा वनांजवळ १५ हजाराच्या जवळपास गावे वसलेली आहेत. येथील ग्रामस्थांच्या गरजा वनाेपजांवर अवलंबून आहेत. अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प घाेषित झाल्याने लाेकांना समस्यांना ताेंड द्यावे लागते आणि संघर्षही निर्माण हाेताे, जाे वनसंवर्धनासाठी चांगला नाही. त्यामुळे वनांचा शाश्वत विकास साधायचा असेल तर स्थानिकांच्या सक्षमीकरणावरही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने शासनाच्या धाेरणांची काटेकाेर अंमलबजावणी करून वन्यजीव व स्थानिकांच्या उपजीविकेचा सुवर्णमध्य साधला आहे. पेंच अंतर्गत येणाऱ्या पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य तसेच पैनगंगा व टिपेश्वर अभयारण्यात त्याबाबत उपक्रम राबविले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डाॅ. रविकिरण गाेवेकर यांनी सांगितले, गेल्या पाच वर्षात पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत एकूण १५९ गावांमध्ये डॉ. श्यामाप्रसाद जन-वन-योजनेअंतर्गत सुमारे ४८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन १.८० लक्ष लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिले. एल पी जी गॅसची सुविधा, शौचालयाचे बांधकाम, सौरकुंपण, शेती उपयोगी साहित्य पुरविणे, दुधाळ जनावरांचे वाटप, सुधारित चुलीचा पुरवठा, सौरदिवे वाटप यांसह गावांमध्ये पाण्याची सोय करण्यासाठी शेततळी/बोअरवेल, ई-लर्निंग सुविधा शाळांमध्ये पुरविणे, शुध्द पाण्याचे फिल्टर्स पुरविणे, जल व मृद संवर्धनाची कामे करणे आदी कामे केली जात आहेत.

व्याघ्र संवर्धन फाऊंडेशनच्या माध्यमातून सुमारे १००० च्यावर युवक-युवतीना पेंच फाऊंडेशन व प्रथम यांच्या माध्यमातून आदरातिथ्याचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवून देण्यांत आली आहे. त्याचप्रमाणे चालक, वीजतंत्री, गवंडी, तांत्रिक, कौशल्य आधारित कार्यशाळा, टेक्टस्टाईल आदीकरिता युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आले. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात व बोर व्याघ्र प्रकल्प येथे मोबाईल आरोग्य वाहनांव्दारे डॉक्टर गावागावात जाऊन लोकांची तपासणी, मोफत औषधे आणि हेल्थ कॅम्प घेत तीन वर्षात ४१ हजार पेक्षा जास्त लोकांना लाभ दिला.

सफारी शुल्काचे हाेते काय

जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून पेंच व्याघ्र संवर्धन फाऊंडेशनच्यावतीने ‘सफारी शुल्काचे हाेते काय’ या आशयाचे पाेस्टर लाॅन्च करण्यात आले. वनांचा शाश्वत विकास साधण्यासह स्थानिकांना राेजगार देऊन या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी या शुल्काचा उपयाेग केला जात असल्याचे याद्वारे सांगण्यात आले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकाेडकर यांच्यासह पेंच प्रकल्प संचालक व मुख्य वनसंरक्षक डाॅ. रविकिरण गाेवेकर, उपसंचालक अमलेंदू पाठक प्रामुख्याने उपस्थित हाेते. सहायक वनसंरक्षक अतुल देवकर यांची ही संकल्पना हाेती.