शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

१५० गावांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यातील १५० गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या साेडविण्यासाठी एनटीपीसी औष्णिक वीज प्रकल्प प्रशासनाने पुढाकार ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : माैदा तालुक्यातील १५० गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या साेडविण्यासाठी एनटीपीसी औष्णिक वीज प्रकल्प प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. ही सर्व गावे एनटीपीसीच्या कार्यक्षेत्रातील आहेत. त्यासाठी नदी कायाकल्प प्रकल्प राबविला जात असून, या प्रकल्पामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यास तसेच तालुक्यातील जलसंकट दूर हाेण्यास मदत हाेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाय, १५० गावांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही एनटीपीसी प्रशासनाने स्वीकारली आहे.

नदी कायाकल्प प्रकल्प हा राज्य सरकार, आर्ट ऑफ लिव्हिंग व काही सामाजिक संस्थांच्या मदतीने राबविण्यात येत असल्याचेही एनटीपीसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागपूर जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्ष्यामध्ये माैदा तालुका अग्रणी असून, या तालुक्यात २०१७ मध्ये नदी कायाकल्प प्रकल्प राबवायला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रकल्पाची व्याप्ती ही माैदा, हिंगणा व कामठी तालुक्यातील किमान २०० किमीची आहे. या प्रल्पांतर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे माैदा तालुक्यातील १५० पेक्षा अधिक गावांच्या जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाल्याचेही दिसून आले आहे.

या कामांसाठी करण्यात आलेला संपूर्ण खर्च हा एनटीपीसी प्रशासनाने त्यांच्या सीएसआर फंडातून केला आहे. जलसंधारणची ही कामे करताना पावसाचे पाणी वाहून न जाता ते माेठ्या प्रमाणात जमिनीत झिरपेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा अपव्यय व पावसामुळे हाेणारी जमिनीची धूप थांबण्यास मदत झाली आहे. दुसरीकडे, शेतकरी, स्थानिक नागरिकांसह राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती असल्यास तसेच सीएसआर व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास पाण्याची समस्या दूर हाेऊ शकते, असा विश्वास आर्ट ऑफ लिव्हिंगचे संदीप शिरखेडकर यांनी व्यक्त केला.

...

१.७८ काेटी रुपयांचे याेगदान

या प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या व येत असलेल्या कामांसाठी माैदा एनटीपीसी प्रशासनाने १ काेटी ७८ लाख रुपयांचा वाटा उचलला आहे. यातील एक काेटी रुपये या भागातील पाच तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी तर ७८ लाख रुपये इतर कामांसाठी वापरण्यात आलेल्या मशीन, साधने व उपकरणांच्या इंधनासाठी वापरण्यात आले आहे. ते पाच तलाव किमान एक हजार एकर क्षेत्रात विस्तारले आहेत. जमिनीतील पाणी पातळी वाढत असल्याने सिंचनास पाणी मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

...

आम्ही आमच्या प्रकल्पाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहाेत. एनटीपीसी मौदा ‘एसओ’ करण्यात आपली भूमिका बजावेल, याची आपल्याला खात्री आहे.

- हरिप्रसाद जोशी, समूह महाव्यवस्थापक,

एनटीपीसी, माैदा.

===Photopath===

240521\img-20210521-wa0015.jpg

===Caption===

150 गावाला देणार शुद्ध पाणी फोटो