शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

१५० गावांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यातील १५० गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या साेडविण्यासाठी एनटीपीसी औष्णिक वीज प्रकल्प प्रशासनाने पुढाकार ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : माैदा तालुक्यातील १५० गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या साेडविण्यासाठी एनटीपीसी औष्णिक वीज प्रकल्प प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. ही सर्व गावे एनटीपीसीच्या कार्यक्षेत्रातील आहेत. त्यासाठी नदी कायाकल्प प्रकल्प राबविला जात असून, या प्रकल्पामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यास तसेच तालुक्यातील जलसंकट दूर हाेण्यास मदत हाेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाय, १५० गावांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही एनटीपीसी प्रशासनाने स्वीकारली आहे.

नदी कायाकल्प प्रकल्प हा राज्य सरकार, आर्ट ऑफ लिव्हिंग व काही सामाजिक संस्थांच्या मदतीने राबविण्यात येत असल्याचेही एनटीपीसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागपूर जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्ष्यामध्ये माैदा तालुका अग्रणी असून, या तालुक्यात २०१७ मध्ये नदी कायाकल्प प्रकल्प राबवायला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रकल्पाची व्याप्ती ही माैदा, हिंगणा व कामठी तालुक्यातील किमान २०० किमीची आहे. या प्रल्पांतर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे माैदा तालुक्यातील १५० पेक्षा अधिक गावांच्या जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाल्याचेही दिसून आले आहे.

या कामांसाठी करण्यात आलेला संपूर्ण खर्च हा एनटीपीसी प्रशासनाने त्यांच्या सीएसआर फंडातून केला आहे. जलसंधारणची ही कामे करताना पावसाचे पाणी वाहून न जाता ते माेठ्या प्रमाणात जमिनीत झिरपेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा अपव्यय व पावसामुळे हाेणारी जमिनीची धूप थांबण्यास मदत झाली आहे. दुसरीकडे, शेतकरी, स्थानिक नागरिकांसह राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती असल्यास तसेच सीएसआर व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास पाण्याची समस्या दूर हाेऊ शकते, असा विश्वास आर्ट ऑफ लिव्हिंगचे संदीप शिरखेडकर यांनी व्यक्त केला.

...

१.७८ काेटी रुपयांचे याेगदान

या प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या व येत असलेल्या कामांसाठी माैदा एनटीपीसी प्रशासनाने १ काेटी ७८ लाख रुपयांचा वाटा उचलला आहे. यातील एक काेटी रुपये या भागातील पाच तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी तर ७८ लाख रुपये इतर कामांसाठी वापरण्यात आलेल्या मशीन, साधने व उपकरणांच्या इंधनासाठी वापरण्यात आले आहे. ते पाच तलाव किमान एक हजार एकर क्षेत्रात विस्तारले आहेत. जमिनीतील पाणी पातळी वाढत असल्याने सिंचनास पाणी मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

...

आम्ही आमच्या प्रकल्पाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहाेत. एनटीपीसी मौदा ‘एसओ’ करण्यात आपली भूमिका बजावेल, याची आपल्याला खात्री आहे.

- हरिप्रसाद जोशी, समूह महाव्यवस्थापक,

एनटीपीसी, माैदा.

===Photopath===

240521\img-20210521-wa0015.jpg

===Caption===

150 गावाला देणार शुद्ध पाणी फोटो