शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

मोबदल्यासाठी १५ वर्षांचा लढा

By admin | Updated: April 6, 2017 02:17 IST

१५ वर्षे लढूनही महानगरपालिकेने जमिनीचा मोबदला दिला नसल्यामुळे पीडिताने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात

पीडित हायकोर्टात : मनपा आयुक्तांना उत्तर सादर करण्याचे निर्देश नागपूर : १५ वर्षे लढूनही महानगरपालिकेने जमिनीचा मोबदला दिला नसल्यामुळे पीडिताने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदुरकर यांनी बुधवारी महानगरपालिकेने याप्रकरणात उदासीन भूमिका घेतली असल्याची बाब पाहता आयुक्तांना फटकारले व २७ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच, या कालावधीत उत्तर सादर न केल्यास आयुक्तांनी व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे असे निर्देश दिलेत. शरदकुमार अग्रवाल असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते रविनगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतरही मनपाने याप्रकरणात गंभीर भूमिका घेतली नाही. न्यायालयाने पुरेसा वेळ देऊनदेखील मनपातर्फे उत्तर सादर करण्यात आले नाही. परिणामी न्यायालयाने संतप्त होऊन वरीलप्रमाणे आदेश दिला.मनपाने एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत २००१ मध्ये रस्ते रुंदीकरणाची योजना आखली होती. त्यात याचिकाकर्त्याची १३३.२० चौरस मीटर जमीन संपादित करण्यात आली होती. याचिकाकर्त्याला या जमिनीच्या मोबदल्यात आवश्यक टीडीआर मिळणार होता. दरम्यान, २००३ मध्ये मनपाने ‘टीडीआर’ऐवजी बाजारभावाने मोबदला देण्याची अधिसूचना जारी केली. परंतु, याचिकाकर्त्याला आजपर्यंत दोनपैकी एकाचाही लाभ मिळाला नाही. यासंदर्भात मनपाला अनेकदा निवेदने देऊनही काहीच फायदा झाला नाही असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)