शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
5
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
6
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
7
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
8
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
9
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
11
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
13
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
14
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
15
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
16
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
17
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
18
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
19
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
20
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी

१५ हजार कोटींचा प्रकल्प मनुष्यबळाअभावी दुबळा

By admin | Updated: May 25, 2014 00:57 IST

गोसीखुर्दनंतर विदर्भातील दुसरा मोठा निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्प मनुष्यबळाअभावी दुबळा झाला आहे. सुमारे १५ हजार कोटींच्या या प्रकल्प कार्यालयात एकही कार्यकारी अभियंता नाही.

निम्न पैनगंगा : तीनपैकी एकही कार्यकारी अभियंता नाही

विलास गावंडे - यवतमाळ

गोसीखुर्दनंतर विदर्भातील दुसरा मोठा निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्प मनुष्यबळाअभावी दुबळा झाला आहे. सुमारे १५ हजार कोटींच्या या प्रकल्प कार्यालयात एकही कार्यकारी अभियंता नाही. परिणामी अनुषंगीक कामे लंगडी झाली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यवतमाळ, चंद्रपूर आणि आंध्र प्रदेशातील शेतकर्‍यांसाठी लाभदायक असूनही या प्रकल्पाला पुरेसे मनुष्यबळ पुरविण्याबाबत शासन उदासीन आहे.

या प्रकल्पाला निधीच्या तरतुदीसोबतच आता मनुष्यबळाचा अडथळा निर्माण झाला आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून औद्योगिकरण, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, दळणवळण, कृषी उत्पादन आदी बाबींना चालना मिळून या क्षेत्राच्या विकासासह बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील ताडसावळी येथे निर्माण केला जात आहे.

या विभागाचे यवतमाळ येथे एक आणि आर्णी येथे दोन विभाग आहेत. या तीनही कार्यालयांना पूर्ण वेळ कार्यकारी अभियंता नाही. तांत्रिक कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. शाखा अभियंत्यांची मंजूर पदांपैकी केवळ ५0 टक्के पदे भरण्यात आली आहे.

प्रत्यक्ष १२ ची गरज असताना केवळ सात उपविभागीय अभियंते आहेत. ५२ पैकी २६ शाखा अभियंते आहेत. निम्न पैनगंगा उपसा सिंचन विभाग आर्णी, पुनर्वसन विभाग आर्णी आणि निम्न पैनगंगा प्रकल्प यवतमाळ या तीनही ठिकाणी कार्यकारी अभियंता प्रभारी आहे.

प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यापासून पुनर्वसनाच्यादृष्टीने अजूनही अधिसूचना काढली गेली नाही. या प्रकल्पामुळे ४६ गावे बाधित होणार असून ९६ गावांची शेतजमीन संपादित केली जाणार आहे. प्रकल्पातील काही अडथळे दूर झाले आहेत. यात वनखात्याची अंतिम मान्यता मिळाली आहे.

पुनर्वसन आराखडाही मंजूर करण्यात आला. हरित लवाद पुणेतर्फे अटींच्या अधीन राहून पर्यावरण मान्यता दिली आहे. केंद्रीय जल आयोगानेही प्राथमिक अहवालास तत्वत: मान्यता दिली आहे. एवढय़ा सर्व अडथळ्यांची शर्यत पार करत प्रकल्पाला गती मिळण्याची आशा पल्लवीत होत असतानाच प्रशासनातील कामकाजासाठी मात्र मनुष्यबळ पुरविले जात नाही.