शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार कोटींचा प्रकल्प मनुष्यबळाअभावी दुबळा

By admin | Updated: May 25, 2014 00:57 IST

गोसीखुर्दनंतर विदर्भातील दुसरा मोठा निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्प मनुष्यबळाअभावी दुबळा झाला आहे. सुमारे १५ हजार कोटींच्या या प्रकल्प कार्यालयात एकही कार्यकारी अभियंता नाही.

निम्न पैनगंगा : तीनपैकी एकही कार्यकारी अभियंता नाही

विलास गावंडे - यवतमाळ

गोसीखुर्दनंतर विदर्भातील दुसरा मोठा निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्प मनुष्यबळाअभावी दुबळा झाला आहे. सुमारे १५ हजार कोटींच्या या प्रकल्प कार्यालयात एकही कार्यकारी अभियंता नाही. परिणामी अनुषंगीक कामे लंगडी झाली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यवतमाळ, चंद्रपूर आणि आंध्र प्रदेशातील शेतकर्‍यांसाठी लाभदायक असूनही या प्रकल्पाला पुरेसे मनुष्यबळ पुरविण्याबाबत शासन उदासीन आहे.

या प्रकल्पाला निधीच्या तरतुदीसोबतच आता मनुष्यबळाचा अडथळा निर्माण झाला आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून औद्योगिकरण, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, दळणवळण, कृषी उत्पादन आदी बाबींना चालना मिळून या क्षेत्राच्या विकासासह बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील ताडसावळी येथे निर्माण केला जात आहे.

या विभागाचे यवतमाळ येथे एक आणि आर्णी येथे दोन विभाग आहेत. या तीनही कार्यालयांना पूर्ण वेळ कार्यकारी अभियंता नाही. तांत्रिक कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. शाखा अभियंत्यांची मंजूर पदांपैकी केवळ ५0 टक्के पदे भरण्यात आली आहे.

प्रत्यक्ष १२ ची गरज असताना केवळ सात उपविभागीय अभियंते आहेत. ५२ पैकी २६ शाखा अभियंते आहेत. निम्न पैनगंगा उपसा सिंचन विभाग आर्णी, पुनर्वसन विभाग आर्णी आणि निम्न पैनगंगा प्रकल्प यवतमाळ या तीनही ठिकाणी कार्यकारी अभियंता प्रभारी आहे.

प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यापासून पुनर्वसनाच्यादृष्टीने अजूनही अधिसूचना काढली गेली नाही. या प्रकल्पामुळे ४६ गावे बाधित होणार असून ९६ गावांची शेतजमीन संपादित केली जाणार आहे. प्रकल्पातील काही अडथळे दूर झाले आहेत. यात वनखात्याची अंतिम मान्यता मिळाली आहे.

पुनर्वसन आराखडाही मंजूर करण्यात आला. हरित लवाद पुणेतर्फे अटींच्या अधीन राहून पर्यावरण मान्यता दिली आहे. केंद्रीय जल आयोगानेही प्राथमिक अहवालास तत्वत: मान्यता दिली आहे. एवढय़ा सर्व अडथळ्यांची शर्यत पार करत प्रकल्पाला गती मिळण्याची आशा पल्लवीत होत असतानाच प्रशासनातील कामकाजासाठी मात्र मनुष्यबळ पुरविले जात नाही.