शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

फॉरवर्ड ब्लॉक लढवणार १५ जागा  : श्रीकांत तराळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 22:23 IST

एकेकाळी दबदबा असलेला ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (एआयएफबी) सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. पक्षातर्फे राज्यात १५ जागा लढवण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष श्रीकांत तराळ यांनी दिली.

ठळक मुद्देपक्षाला जुने वैभव प्राप्त करून देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. एकेकाळी दबदबा असलेला ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (एआयएफबी) सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. पक्षातर्फे राज्यात १५ जागा लढवण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष श्रीकांत तराळ यांनी दिली.तराळ यांनी सांगितले की, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाला ८० वर्षाची परंपरा आहे. २२ जून १९३९ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या पक्षाची स्थापना केली होती. विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांनी या पक्षाची धुरा सांभाळताना विदर्भात पक्षाला वैभव प्राप्त करून दिले होते. १७ आमदार आणि ३ खासदार असलेला हा पक्ष होता. आज पक्षाची तितकी ताकद नसली तरी पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटन बांधणीवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.सध्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे. अशा परिस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज आहे. या निवडणुकीत शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार आणि स्वतंत्र विदर्भ राज्य हे आमचे प्रमुख मुद्दे राहणार असल्याचेही तराळ यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Mediaमाध्यमे