शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसामुळे नागपूर विभागात १४८ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:07 IST

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. नागपूर विभागातील १ लाख ८९ हजार १९८ हेक्टरवरील पीक पाण्यात गेले आहे.

ठळक मुद्देभरपाईचा प्रस्ताव पाठविला शासनाकडे १.८९ लाख हेक्टरवरील पीक पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. नागपूर विभागातील १ लाख ८९ हजार १९८ हेक्टरवरील पीक पाण्यात गेले आहे. शासनाने १५ नोव्हेंंबरपूर्वी पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने झालेल्या नुकसानीपोटी १४८ कोटी २९ लाख १७ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.सुरुवातीला उशिरा आलेल्या मान्सूनमुळे शेतीवर परिणाम झाला. कसेबसे शेतात पीक डोलायला लागले असता, दिवाळीपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतीतील अख्खे उभे पीक पाण्यात गेले. शासनाकडून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्याच्या अहवालानुसार नागपूर विभागात १ लाख ८९ हजार १९८ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने एकप्रकारे शेतकऱ्यांचे कं बरडेच मोडले आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या सहा जिल्ह्यात ३ लाख ८१ हजार ४४० शेतकरी बाधित झाले आहे. कापूस आणि सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला. सोयाबीनच्या शेंगातील दाणे काळे पडले. कापसाची सरकी भिजल्याने कोंब फुटले आहे. धान, ज्वारी, भाजीपाला पिकांनाही पावसाचा फटका बसला.

स्मानी संकटामुळे शेतमालाची प्रत प्रचंड खालावली.संत्रा, मोसंबीच्या बागेतील फळे गळून पडली. गळालेली फळं डागाळली. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले. प्रशासकीय पातळीवरील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचा एकत्र अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. कृषी विभागाकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून १४८ कोटी २९ लक्ष १७ हजार रुपये मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :agricultureशेती