शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परतीच्या पावसामुळे नागपूर विभागात १४८ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:07 IST

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. नागपूर विभागातील १ लाख ८९ हजार १९८ हेक्टरवरील पीक पाण्यात गेले आहे.

ठळक मुद्देभरपाईचा प्रस्ताव पाठविला शासनाकडे १.८९ लाख हेक्टरवरील पीक पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. नागपूर विभागातील १ लाख ८९ हजार १९८ हेक्टरवरील पीक पाण्यात गेले आहे. शासनाने १५ नोव्हेंंबरपूर्वी पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने झालेल्या नुकसानीपोटी १४८ कोटी २९ लाख १७ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.सुरुवातीला उशिरा आलेल्या मान्सूनमुळे शेतीवर परिणाम झाला. कसेबसे शेतात पीक डोलायला लागले असता, दिवाळीपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतीतील अख्खे उभे पीक पाण्यात गेले. शासनाकडून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्याच्या अहवालानुसार नागपूर विभागात १ लाख ८९ हजार १९८ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने एकप्रकारे शेतकऱ्यांचे कं बरडेच मोडले आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या सहा जिल्ह्यात ३ लाख ८१ हजार ४४० शेतकरी बाधित झाले आहे. कापूस आणि सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला. सोयाबीनच्या शेंगातील दाणे काळे पडले. कापसाची सरकी भिजल्याने कोंब फुटले आहे. धान, ज्वारी, भाजीपाला पिकांनाही पावसाचा फटका बसला.

स्मानी संकटामुळे शेतमालाची प्रत प्रचंड खालावली.संत्रा, मोसंबीच्या बागेतील फळे गळून पडली. गळालेली फळं डागाळली. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले. प्रशासकीय पातळीवरील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचा एकत्र अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. कृषी विभागाकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून १४८ कोटी २९ लक्ष १७ हजार रुपये मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :agricultureशेती