शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

खत-बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात १३ भरारी पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:07 IST

नागपूर : खरीप हंगामातील खत आणि बियाण्यांच्या टंचाईवर मात करण्यासाठी आणि यातील काळाबाजार रोखण्यासाठी १३ भरारी पथकांची निर्मिती करण्यात ...

नागपूर : खरीप हंगामातील खत आणि बियाण्यांच्या टंचाईवर मात करण्यासाठी आणि यातील काळाबाजार रोखण्यासाठी १३ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्हा कृषी विभागाने खत आणि बियाण्यांसाठी नियोजन केले आहे. त्यानुसार, जिल्ह्यात यंदा १,६०,४९२ मे. टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यात युरिया ४५,९१७.२ मे. टन, मिश्र खते ५१,०३७.६ मे. टन, डीएपी २२,७४०.६ मे. टन, एमओपी ४,८६७.३ मे. टन आणि एसएसपी ३५,९२९.३ मे. टन या खतांचा समावेश आहे. या सोबतच ८२,१२१ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. या पुरवठ्यातील अनियमितता, तसेच काळाबाजार रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासोबतच १२ तालुक्यांसह नागपूर शहर व ग्रामीण मिळून १३ भरारी पथकांची स्थापना केली आहे. जिल्हा स्तरावरील पथक कृषी विकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात, तर तालुका स्तरावरील पथके तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली काम करतील.

मागील वर्षी खत-बियाणांच्या संदर्भात आठ ते नऊ तक्रारी दाखल झाल्या होत्या. काही ठिकाणी भरारी पथकाने छापे घालून कारवाया केल्या होत्या.

...

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारींसाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षातील क्रमांकावर शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवाव्या. त्यानुसार चौकशी करून तातडीने अडचणी निवारल्या जातील, तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येतील.

- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

...