शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

खत-बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात १३ भरारी पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:07 IST

नागपूर : खरीप हंगामातील खत आणि बियाण्यांच्या टंचाईवर मात करण्यासाठी आणि यातील काळाबाजार रोखण्यासाठी १३ भरारी पथकांची निर्मिती करण्यात ...

नागपूर : खरीप हंगामातील खत आणि बियाण्यांच्या टंचाईवर मात करण्यासाठी आणि यातील काळाबाजार रोखण्यासाठी १३ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्हा कृषी विभागाने खत आणि बियाण्यांसाठी नियोजन केले आहे. त्यानुसार, जिल्ह्यात यंदा १,६०,४९२ मे. टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यात युरिया ४५,९१७.२ मे. टन, मिश्र खते ५१,०३७.६ मे. टन, डीएपी २२,७४०.६ मे. टन, एमओपी ४,८६७.३ मे. टन आणि एसएसपी ३५,९२९.३ मे. टन या खतांचा समावेश आहे. या सोबतच ८२,१२१ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. या पुरवठ्यातील अनियमितता, तसेच काळाबाजार रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासोबतच १२ तालुक्यांसह नागपूर शहर व ग्रामीण मिळून १३ भरारी पथकांची स्थापना केली आहे. जिल्हा स्तरावरील पथक कृषी विकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात, तर तालुका स्तरावरील पथके तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली काम करतील.

मागील वर्षी खत-बियाणांच्या संदर्भात आठ ते नऊ तक्रारी दाखल झाल्या होत्या. काही ठिकाणी भरारी पथकाने छापे घालून कारवाया केल्या होत्या.

...

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारींसाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षातील क्रमांकावर शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवाव्या. त्यानुसार चौकशी करून तातडीने अडचणी निवारल्या जातील, तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येतील.

- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

...