शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१२ एकरात १२ किलो कापूस

By admin | Updated: December 17, 2014 00:26 IST

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाला मंगळवारी वर्धा जिल्ह्यात विदारक चित्र दिसले. पथकाला जिल्ह्यातील विजयगोपाल गावातील एका शेतकऱ्याने १२ एकरात १२

केंद्रीय पथकाची भेट : वर्धा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा वर्धा/अमरावती/यवतमाळ : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाला मंगळवारी वर्धा जिल्ह्यात विदारक चित्र दिसले. पथकाला जिल्ह्यातील विजयगोपाल गावातील एका शेतकऱ्याने १२ एकरात १२ किलोंपेक्षा कमी कापूस घरी आणल्याचे सांगितले. वर्धा जिल्ह्यासह अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात विविध गावांना भेटी देऊन शेतीची पाहणी केली. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे १० सदस्य असलेले पथक मंगळवारी वर्धा जिल्ह्यात दाखल झाले. सदर पथकाने दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास विजयगोपाल येथे येथील माहिती घेतल्यानंतर ते इंझाळा, कवठा नंतर बोदड या गावाला भेट देत वर्धेकडे रवाना झाले. विजयगोपाल येथील किशोर झोरे या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. झोरे यांना उत्पन्नासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी तीन एकर शेतात २० किलो कापूस झाल्याचे सांगितले. तर शेतकरी बाळाजी म्हसे यांच्याशी पथकाने संवाद साधला असता त्यांनी १२ एकर शेतीत १२ किलो कापूस घरी आलेला नाही, अशी माहिती दिली. इंझाळा येथील शेतकरी बाबाराव चरडे यांची भेट घेत शेतीची पाहणी केली. या गावातून अवघ्या तीन मिनिटात पथक कवठा येथील शेतीची पाहणी करण्याकरिता रवाना झाले. या दोन गावात बराच वेळ झाल्याने पथकाने कवठा व बोदड या गावाला धावती भेट दिल्याची माहिती आहे.अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे तसेच हवामानातील बदलामुळे खरीप पिकांचे आणि फळपिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यानुषंगाने केंद्र शासनाकडून आलेले पथक प्रमुख आर.पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली अन्य तीन सदस्यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जळू, टिमटाळा, सावनेर, शेलूनटवा या गावास भेट देऊन तेथील ग्रामस्थ, शेतकरी यांच्या भेटी घेतल्या, संवाद साधला, नुकसान झालेल्या कापूस, सोयाबीन या पिकांची तसेच संत्रा बागांची पाहणी केली. यवतमाळ जिल्ह्यात केंद्रीय पथकातील एका चमूने दोन तालुक्यातील शेतीची पाहणी केली, तर एक पथक सायंकाळी उशिरा जिल्ह्यात दाखल झाले. परंतु दुसरे पथक सायंकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात पोहोचले नव्हते. पहिले पथक अमरावती जिल्ह्यातून बाभूळगाव तालुक्यातील नायगाव येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास पोहोचले. कापूस विकास संचालनालयाचे संचालक आर.पी.सिंग यांच्या नेतृत्वातील या पथकाने शंकरराव नागोसे यांच्या शेताची पाहणी केली. तसेच गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर या पथकाने कळंब तालुक्यातील गांधा गावाला भेट दिली. श्रीराम कांबळे व रामाजी टेकाम यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथे केंद्रीय पथक दुपारी ५ वाजताच्या सुमारास येणार होते. शेकडो शेतकरी त्या ठिकाणी जमले होते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत सदर पथक पोहोचलेच नव्हते. नागेशवाडी आणि महागाव तालुक्यातील मुडाणा येथे शेकडो शेतकरी पथकाची प्रतीक्षा करीत होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)