शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

१२ एकरात १२ किलो कापूस

By admin | Updated: December 17, 2014 00:26 IST

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाला मंगळवारी वर्धा जिल्ह्यात विदारक चित्र दिसले. पथकाला जिल्ह्यातील विजयगोपाल गावातील एका शेतकऱ्याने १२ एकरात १२

केंद्रीय पथकाची भेट : वर्धा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा वर्धा/अमरावती/यवतमाळ : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाला मंगळवारी वर्धा जिल्ह्यात विदारक चित्र दिसले. पथकाला जिल्ह्यातील विजयगोपाल गावातील एका शेतकऱ्याने १२ एकरात १२ किलोंपेक्षा कमी कापूस घरी आणल्याचे सांगितले. वर्धा जिल्ह्यासह अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात विविध गावांना भेटी देऊन शेतीची पाहणी केली. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे १० सदस्य असलेले पथक मंगळवारी वर्धा जिल्ह्यात दाखल झाले. सदर पथकाने दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास विजयगोपाल येथे येथील माहिती घेतल्यानंतर ते इंझाळा, कवठा नंतर बोदड या गावाला भेट देत वर्धेकडे रवाना झाले. विजयगोपाल येथील किशोर झोरे या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. झोरे यांना उत्पन्नासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी तीन एकर शेतात २० किलो कापूस झाल्याचे सांगितले. तर शेतकरी बाळाजी म्हसे यांच्याशी पथकाने संवाद साधला असता त्यांनी १२ एकर शेतीत १२ किलो कापूस घरी आलेला नाही, अशी माहिती दिली. इंझाळा येथील शेतकरी बाबाराव चरडे यांची भेट घेत शेतीची पाहणी केली. या गावातून अवघ्या तीन मिनिटात पथक कवठा येथील शेतीची पाहणी करण्याकरिता रवाना झाले. या दोन गावात बराच वेळ झाल्याने पथकाने कवठा व बोदड या गावाला धावती भेट दिल्याची माहिती आहे.अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे तसेच हवामानातील बदलामुळे खरीप पिकांचे आणि फळपिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यानुषंगाने केंद्र शासनाकडून आलेले पथक प्रमुख आर.पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली अन्य तीन सदस्यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जळू, टिमटाळा, सावनेर, शेलूनटवा या गावास भेट देऊन तेथील ग्रामस्थ, शेतकरी यांच्या भेटी घेतल्या, संवाद साधला, नुकसान झालेल्या कापूस, सोयाबीन या पिकांची तसेच संत्रा बागांची पाहणी केली. यवतमाळ जिल्ह्यात केंद्रीय पथकातील एका चमूने दोन तालुक्यातील शेतीची पाहणी केली, तर एक पथक सायंकाळी उशिरा जिल्ह्यात दाखल झाले. परंतु दुसरे पथक सायंकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात पोहोचले नव्हते. पहिले पथक अमरावती जिल्ह्यातून बाभूळगाव तालुक्यातील नायगाव येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास पोहोचले. कापूस विकास संचालनालयाचे संचालक आर.पी.सिंग यांच्या नेतृत्वातील या पथकाने शंकरराव नागोसे यांच्या शेताची पाहणी केली. तसेच गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर या पथकाने कळंब तालुक्यातील गांधा गावाला भेट दिली. श्रीराम कांबळे व रामाजी टेकाम यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथे केंद्रीय पथक दुपारी ५ वाजताच्या सुमारास येणार होते. शेकडो शेतकरी त्या ठिकाणी जमले होते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत सदर पथक पोहोचलेच नव्हते. नागेशवाडी आणि महागाव तालुक्यातील मुडाणा येथे शेकडो शेतकरी पथकाची प्रतीक्षा करीत होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)