शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

१२ एकरात १२ किलो कापूस

By admin | Updated: December 17, 2014 00:26 IST

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाला मंगळवारी वर्धा जिल्ह्यात विदारक चित्र दिसले. पथकाला जिल्ह्यातील विजयगोपाल गावातील एका शेतकऱ्याने १२ एकरात १२

केंद्रीय पथकाची भेट : वर्धा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा वर्धा/अमरावती/यवतमाळ : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाला मंगळवारी वर्धा जिल्ह्यात विदारक चित्र दिसले. पथकाला जिल्ह्यातील विजयगोपाल गावातील एका शेतकऱ्याने १२ एकरात १२ किलोंपेक्षा कमी कापूस घरी आणल्याचे सांगितले. वर्धा जिल्ह्यासह अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात विविध गावांना भेटी देऊन शेतीची पाहणी केली. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे १० सदस्य असलेले पथक मंगळवारी वर्धा जिल्ह्यात दाखल झाले. सदर पथकाने दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास विजयगोपाल येथे येथील माहिती घेतल्यानंतर ते इंझाळा, कवठा नंतर बोदड या गावाला भेट देत वर्धेकडे रवाना झाले. विजयगोपाल येथील किशोर झोरे या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. झोरे यांना उत्पन्नासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी तीन एकर शेतात २० किलो कापूस झाल्याचे सांगितले. तर शेतकरी बाळाजी म्हसे यांच्याशी पथकाने संवाद साधला असता त्यांनी १२ एकर शेतीत १२ किलो कापूस घरी आलेला नाही, अशी माहिती दिली. इंझाळा येथील शेतकरी बाबाराव चरडे यांची भेट घेत शेतीची पाहणी केली. या गावातून अवघ्या तीन मिनिटात पथक कवठा येथील शेतीची पाहणी करण्याकरिता रवाना झाले. या दोन गावात बराच वेळ झाल्याने पथकाने कवठा व बोदड या गावाला धावती भेट दिल्याची माहिती आहे.अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे तसेच हवामानातील बदलामुळे खरीप पिकांचे आणि फळपिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यानुषंगाने केंद्र शासनाकडून आलेले पथक प्रमुख आर.पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली अन्य तीन सदस्यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जळू, टिमटाळा, सावनेर, शेलूनटवा या गावास भेट देऊन तेथील ग्रामस्थ, शेतकरी यांच्या भेटी घेतल्या, संवाद साधला, नुकसान झालेल्या कापूस, सोयाबीन या पिकांची तसेच संत्रा बागांची पाहणी केली. यवतमाळ जिल्ह्यात केंद्रीय पथकातील एका चमूने दोन तालुक्यातील शेतीची पाहणी केली, तर एक पथक सायंकाळी उशिरा जिल्ह्यात दाखल झाले. परंतु दुसरे पथक सायंकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात पोहोचले नव्हते. पहिले पथक अमरावती जिल्ह्यातून बाभूळगाव तालुक्यातील नायगाव येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास पोहोचले. कापूस विकास संचालनालयाचे संचालक आर.पी.सिंग यांच्या नेतृत्वातील या पथकाने शंकरराव नागोसे यांच्या शेताची पाहणी केली. तसेच गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर या पथकाने कळंब तालुक्यातील गांधा गावाला भेट दिली. श्रीराम कांबळे व रामाजी टेकाम यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथे केंद्रीय पथक दुपारी ५ वाजताच्या सुमारास येणार होते. शेकडो शेतकरी त्या ठिकाणी जमले होते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत सदर पथक पोहोचलेच नव्हते. नागेशवाडी आणि महागाव तालुक्यातील मुडाणा येथे शेकडो शेतकरी पथकाची प्रतीक्षा करीत होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)