शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

१२५ कोटींचा प्रस्ताव गेला कुठे? सक्करदरा तलावातील पाण्याला हिरवा रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:36 IST

भोसले राजवटीत बांधण्यात आलेला सक्करदरा तलाव हा नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा आहे. परंतु तलावाची साफसफाई होत नसल्याने तलावात गाळ व कचरा साचला आहे. कचरा, शेवाळ व झाडांमुळे तलावातील पाणी हिरव्या रंगाचे झाले आहे. डागडुजी होत नसल्याने तलावाच्या पायऱ्या खचत असल्याने काठावरील प्राचीन हनुमान मंदिराला धोका निर्माण झाला आहे. ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमनपा व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भोसले राजवटीत बांधण्यात आलेला सक्करदरा तलाव हा नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा आहे. परंतु तलावाची साफसफाई होत नसल्याने तलावात गाळ व कचरा साचला आहे. कचरा, शेवाळ व झाडांमुळे तलावातील पाणी हिरव्या रंगाचे झाले आहे. डागडुजी होत नसल्याने तलावाच्या पायऱ्या खचत असल्याने काठावरील प्राचीन हनुमान मंदिराला धोका निर्माण झाला आहे. ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे.तलावाच्या विकासासाठी सव्वाशे कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच या तलावाचा कायापालट होईल. अशी आश्वासने गेल्या साडेचार वर्षापासून मिळत आहे. परंतु ही फाईल अडकली कुठे, असा प्रश्न दक्षिण नागपुरातील लोकांना पडला आहे. तलावाच्या देखभाल व विकासाकडे लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बाजूला नासुप्रचे उद्यान आहे. तर समोरच्या भागात बॉलिवूड सेंटर पॉर्इंट हॉटेल आहे. उद्यान बीओटीवर देण्यात आले आहे. येथे नागरिक सुविधा उपलब्ध न करता उद्यान समारंभाला भाड्याने देण्याचा प्रकार सुरू आहे. यातून निर्माण होणारा कचरा तलावाच्या काठावर वा तलावात टाकला जातो. दोन्ही बाजूने तलावात कचरा टाकला जात असल्याने तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे.नागपूर शहरातील प्रमुख तलावात सक्करदरा तलावाचा समावेश आहे. या तलावाचा विकास झाला तर दक्षिण नागपुरातील हे एक चांगले पर्यटन स्थळ होऊ शकते. विधानसभा निवडणुकीपूर्वी या तलावातील काही भागातील गाळ काढण्यात आला. सोबतच १२५ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आल्याने तलावाचा लवकरच कायापालट होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र निवडणुका संपताच नेत्यांना तलावाचा विसर पडला. यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे.प्लास्टिक व कचऱ्याचे ढिगारेतलावाच्या काठावर कचरा व प्लास्टिक टाकले जाते. यामुळे तलाव परिसराला कचराघराचे स्वरूप आले आहे. साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरल्याने फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.घाणीमुळे कचरा घराचे स्वरूपशहरातील तलावांचे संवर्धन झाल्यास पर्यटनासोबत भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्याला मदत होऊ शकते. परंतु दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या विहिरींचे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तलावाच्या काठावर घाण साचल्याने परिसराला कचरा घराचे स्वरूप आले आहे.संरक्षण भिंतीला तडेतलावाच्या संरक्षण भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे तलावाच्या काठावर खेळणाऱ्या लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. डागडुजी व दुरुस्ती नसल्याने तलावाच्या पायऱ्या खचत आहे. तलावात झाडे वाढल्याने विदू्रप स्वरूप आले आहे.डासांचा प्रादुर्भाव वाढलातलावातील दूषित पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.१२५ कोटी गेले कुठेसक्करदरा तलावाच्या काठावर सकाळ -संध्याकाळ फिरणाऱ्यांची गर्दी असायची. परंतु देखभाल व दुरुस्ती नसल्याने तलावाला अवकळा आली आहे. पाणी प्रदूषित झाले असून घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिका प्रशासनाला या संदर्भात वारंवार पत्र दिले. परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. साफसफाई होत नसल्याने कचरा साचला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तलावाचा विकास करण्यासाठी १२५ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. साडेचार वर्षे झाल्याने १२५ कोटी कुठे गेले असा प्रश्न दक्षिण नागपुरातील लोकांना पडला आहे. 

संजय महाकाळकर, माजी विरोधीपक्षनेते मनपा

 

टॅग्स :Sakkardara Lakeसक्करदरा तलावNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका