शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

टी-२० साठी १२०० पोलिसांचा बंदोबस्त

By admin | Updated: January 25, 2017 02:57 IST

भारत आणि इंग्लंडदरम्यान येथील जामठा स्टेडियमवर खेळला जाणाऱ्या टी-२० सामन्याला कसलाही धोका नाही

 भारत-इंग्लंड सामना रविवारी : जामठ्यात राहणार कडेकोट सुरक्षा व्यवस्था नागपूर : भारत आणि इंग्लंडदरम्यान येथील जामठा स्टेडियमवर खेळला जाणाऱ्या टी-२० सामन्याला कसलाही धोका नाही किंवा कुण्या दहशतवादी संघटनांचा इशाराही नाही. मात्र, पोलिसांनी सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. सामन्याच्या निमित्ताने ४ पोलीस उपायुक्तांसह १२०० पोलिसांचा ताफा नियुक्त करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकारांना दिली. शर्मा यांनी पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्ताची पत्रकारांना माहिती दिली. यावेळी परिमंडळ १ च्या उपायुक्त दीपाली मासिरकर, वाहतूक शाखेच्या उपायुक्त स्मार्तना पाटील आणि विशेष शाखेचे उपायुक्त रवींद्रसिंग परदेसी उपस्थित होते. जामठ्यावर क्रिकेट सामना असला की नागपूर-वर्धा-चंद्रपूर मार्गावरची वाहतूक विस्कळीत होते. परिणामी नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. हा अनुभव लक्षात घेता, यावेळी पोलिसांनी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वीपासूनच या मार्गावरची वाहतूक हिंगणा मार्गावरून वळविण्यात येणार आहे. सामना बघण्यासाठी येणारे अतिमहत्त्वाचे आणि महत्त्वाचे व्यक्ती, व्हीसीएचे पदाधिकारी आणि कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि प्रेक्षक या सर्वांसाठी वेगवेगळी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी होऊ नये म्हणून दुपारी ३ वाजताच प्रवेशद्वार उघडून प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने हेल्मेट, खाण्यापिण्याच्या चीजवस्तू किंवा पाण्याची बॉटल आतमध्ये नेता येणार नाही. घातपातासाठी द्रवरूपातील स्फोटकाचा वापर केला जातो. ही स्फोटके पाण्यासारखीच दिसतात. प्रत्येकाची पाण्याची बॉटल तपासणे शक्य होणार नाही, म्हणून पाण्याची बॉटल आत नेण्यास परवानगी नसल्याचे सांगून प्रेक्षकांना व्हीसीएतर्फे पाण्याचे मोफत पाऊच दिले जाणार आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ४४ हजार रसिकांची अपेक्षा जामठा स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ४४, ५०० एवढी आहे. सामना चुरशीचा होणार, हे ध्यानात घेता स्टेडियम (सामना) हाऊसफुल्ल होईल, असा पोलिसांचा अंदाज आहे. नागपूर शहराबाहेर स्टेडियम असल्याने बहुतांश प्रेक्षक आपली वाहने नेतील. वर्धा मार्गावर मेट्रोच्या कामाच्या निमित्ताने जागोजागी खड्डे आहेत. रस्ता अरुंद असल्याने ठिकठिकाणी वाहतूक रखडण्याची भीती आहे. त्याचमुळे वाहतूक हिंगणा, एमआयडीसी मार्गे वळविण्यात आली असून, एकाच ठिकाणी चार हजार वाहने राहतील, अशी व्यवस्था जामठ्याच्या बाजूला असलेल्या शाळेच्या समोर करण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितले. वाहतुकीच्या समस्येसोबतच कसल्याही प्रकारच्या सुरक्षेची समस्या उद्भवू नये म्हणून, ४ पोलीस उपायुक्त, १० सहायक आयुक्त, १५० पोलीस उपनिरीक्षक ते निरीक्षक आणि १००० पोलीस कर्मचारी बंदोबस्ताची धुरा सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पैशासाठी घासाघीस विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) प्रत्येक सामन्याच्या वेळी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था घेते. आतापर्यंत शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही पोलिसांचा बंदोबस्त व्हीसीए मागत होती. मात्र सामना झाल्यानंतर सुरक्षा शुल्क देण्यास टाळाटाळ करीत असल्याने पोलिसांची व्हीसीएकडे लाखोंची थकबाकी आहे. २०१० पासून शहर पोलिसांचे दीड ते पावणेदोन कोटी रुपये व्हीसीएने दिलेले नाही. घासाघीस करीत असल्याने यावेळी पोलिसांनी रक्कम वसुलीसाठी आधीपासूनच बोलणी चालवली आहे.