शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टी-२० साठी १२०० पोलिसांचा बंदोबस्त

By admin | Updated: January 25, 2017 02:57 IST

भारत आणि इंग्लंडदरम्यान येथील जामठा स्टेडियमवर खेळला जाणाऱ्या टी-२० सामन्याला कसलाही धोका नाही

 भारत-इंग्लंड सामना रविवारी : जामठ्यात राहणार कडेकोट सुरक्षा व्यवस्था नागपूर : भारत आणि इंग्लंडदरम्यान येथील जामठा स्टेडियमवर खेळला जाणाऱ्या टी-२० सामन्याला कसलाही धोका नाही किंवा कुण्या दहशतवादी संघटनांचा इशाराही नाही. मात्र, पोलिसांनी सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. सामन्याच्या निमित्ताने ४ पोलीस उपायुक्तांसह १२०० पोलिसांचा ताफा नियुक्त करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकारांना दिली. शर्मा यांनी पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्ताची पत्रकारांना माहिती दिली. यावेळी परिमंडळ १ च्या उपायुक्त दीपाली मासिरकर, वाहतूक शाखेच्या उपायुक्त स्मार्तना पाटील आणि विशेष शाखेचे उपायुक्त रवींद्रसिंग परदेसी उपस्थित होते. जामठ्यावर क्रिकेट सामना असला की नागपूर-वर्धा-चंद्रपूर मार्गावरची वाहतूक विस्कळीत होते. परिणामी नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. हा अनुभव लक्षात घेता, यावेळी पोलिसांनी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वीपासूनच या मार्गावरची वाहतूक हिंगणा मार्गावरून वळविण्यात येणार आहे. सामना बघण्यासाठी येणारे अतिमहत्त्वाचे आणि महत्त्वाचे व्यक्ती, व्हीसीएचे पदाधिकारी आणि कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि प्रेक्षक या सर्वांसाठी वेगवेगळी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी होऊ नये म्हणून दुपारी ३ वाजताच प्रवेशद्वार उघडून प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने हेल्मेट, खाण्यापिण्याच्या चीजवस्तू किंवा पाण्याची बॉटल आतमध्ये नेता येणार नाही. घातपातासाठी द्रवरूपातील स्फोटकाचा वापर केला जातो. ही स्फोटके पाण्यासारखीच दिसतात. प्रत्येकाची पाण्याची बॉटल तपासणे शक्य होणार नाही, म्हणून पाण्याची बॉटल आत नेण्यास परवानगी नसल्याचे सांगून प्रेक्षकांना व्हीसीएतर्फे पाण्याचे मोफत पाऊच दिले जाणार आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ४४ हजार रसिकांची अपेक्षा जामठा स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ४४, ५०० एवढी आहे. सामना चुरशीचा होणार, हे ध्यानात घेता स्टेडियम (सामना) हाऊसफुल्ल होईल, असा पोलिसांचा अंदाज आहे. नागपूर शहराबाहेर स्टेडियम असल्याने बहुतांश प्रेक्षक आपली वाहने नेतील. वर्धा मार्गावर मेट्रोच्या कामाच्या निमित्ताने जागोजागी खड्डे आहेत. रस्ता अरुंद असल्याने ठिकठिकाणी वाहतूक रखडण्याची भीती आहे. त्याचमुळे वाहतूक हिंगणा, एमआयडीसी मार्गे वळविण्यात आली असून, एकाच ठिकाणी चार हजार वाहने राहतील, अशी व्यवस्था जामठ्याच्या बाजूला असलेल्या शाळेच्या समोर करण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितले. वाहतुकीच्या समस्येसोबतच कसल्याही प्रकारच्या सुरक्षेची समस्या उद्भवू नये म्हणून, ४ पोलीस उपायुक्त, १० सहायक आयुक्त, १५० पोलीस उपनिरीक्षक ते निरीक्षक आणि १००० पोलीस कर्मचारी बंदोबस्ताची धुरा सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पैशासाठी घासाघीस विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) प्रत्येक सामन्याच्या वेळी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था घेते. आतापर्यंत शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही पोलिसांचा बंदोबस्त व्हीसीए मागत होती. मात्र सामना झाल्यानंतर सुरक्षा शुल्क देण्यास टाळाटाळ करीत असल्याने पोलिसांची व्हीसीएकडे लाखोंची थकबाकी आहे. २०१० पासून शहर पोलिसांचे दीड ते पावणेदोन कोटी रुपये व्हीसीएने दिलेले नाही. घासाघीस करीत असल्याने यावेळी पोलिसांनी रक्कम वसुलीसाठी आधीपासूनच बोलणी चालवली आहे.