शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हॉटेल, रेस्टॉरन्ट व बारला व्यवसायात १२०० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 09:11 IST

Hotel, Corona, Nagpur News जवळपास सहा महिन्यात व्यापाऱ्यांना १२०० कोटींच्या व्यवसायाचा फटका बसल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे आर्थिक संकटव्यवसाय सुरळीत होण्यास दोन महिने लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या २० मार्च आणि केंद्र सरकारच्या २५ मार्चच्या लॉकडाऊननंतर नागपूर शहरातील सर्वच हॉटेल, रेस्टॉरन्ट, बार आणि भोजनालयाचे व्यवहार ठप्प झाले. या सर्वांची वर्षभरात २५०० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल होते. जवळपास सहा महिन्यात व्यापाऱ्यांना १२०० कोटींच्या व्यवसायाचा फटका बसल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.

५० टक्केच हॉटेल, रेस्टॉरन्ट सुरूनागपूर रेशिडेन्शियल हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, उपरोक्त व्यवसायावर जवळपास ४० हजार लोकांचा व्यवसाय चालतो. लॉकडाऊननंतर सर्वच व्यवसाय बंद झाल्याने कर्मचारी स्थलांतरित झाले तर काही भाजी विक्रीचा व्यवसाय करू लागले. ५ आॅक्टोबरपासून सर्वच व्यवसाय सुरू झाल्यानंतर कामगार अजूनही कामावर परत आलेले नाहीत. त्यामुळे नागपुरात ५० टक्केच हॉटेल, रेस्टॉरंट आणि भोजनालय सुरू झाले आहेत. याशिवाय बहुतांश बारमध्ये किचन सुरू झालेले नाही. पुढे येणाºया दसरा-दिवाळी सणानंतर अर्थात दोन महिन्यानंतरच व्यवसाय सुरळीत होतील. नागपुरात लहानमोठे अडीच ते ३ हजार बार, रेस्टॉरंट, हॉटेल आणि भोजनालये आहेत. त्यात मोठे हॉटेल्स जवळपास १५ आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि पूर्ण क्षमतेने घरगुती विमानसेवा, रेल्वे सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे हॉटेल्सचा व्यवसाय अजूनही ठप्प आहे.

वेळेचा अजूनही संभ्रमरेणू म्हणाले, राज्य शासनाने परवानगी दिली तरीही हॉटेल, रेस्टॉरंट व बार सुरू ठेवण्याच्या वेळेची गाईडलाईन अजूनही आलेली नाही. पण मालकांनी कोरोना नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू केले आहेत. पहिल्या दिवशी पोलिसांनी ९ वाजता बंद करण्यास सांगितले. नागपुरात रेस्टॉरंटमध्ये ग्राहक रात्री ८ नंतर येतात. रात्री ११ पर्यंत प्रतिष्ठाने खुली ठेवण्यास परवानगी द्यावी.वेळेची समस्यापहिल्या दिवशी सदर अणि सीताबर्डी भागात पोलिसांनी प्रतिष्ठाने ९ वाजता बंद करण्यास सांगितली होती. मुंबईत रात्री १२.३० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. नागपुरात किमान ११ वाजेपर्यंत सुरू ठेवावीत. या संदर्भात प्रशासनाने नियमावली जाहीर करावी.स्वप्नील अहिरकर, हॉटेल व्यावसायिक़

 

टॅग्स :hotelहॉटेल