शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

हॉटेल, रेस्टॉरन्ट व बारला व्यवसायात १२०० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 09:11 IST

Hotel, Corona, Nagpur News जवळपास सहा महिन्यात व्यापाऱ्यांना १२०० कोटींच्या व्यवसायाचा फटका बसल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे आर्थिक संकटव्यवसाय सुरळीत होण्यास दोन महिने लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या २० मार्च आणि केंद्र सरकारच्या २५ मार्चच्या लॉकडाऊननंतर नागपूर शहरातील सर्वच हॉटेल, रेस्टॉरन्ट, बार आणि भोजनालयाचे व्यवहार ठप्प झाले. या सर्वांची वर्षभरात २५०० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल होते. जवळपास सहा महिन्यात व्यापाऱ्यांना १२०० कोटींच्या व्यवसायाचा फटका बसल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.

५० टक्केच हॉटेल, रेस्टॉरन्ट सुरूनागपूर रेशिडेन्शियल हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, उपरोक्त व्यवसायावर जवळपास ४० हजार लोकांचा व्यवसाय चालतो. लॉकडाऊननंतर सर्वच व्यवसाय बंद झाल्याने कर्मचारी स्थलांतरित झाले तर काही भाजी विक्रीचा व्यवसाय करू लागले. ५ आॅक्टोबरपासून सर्वच व्यवसाय सुरू झाल्यानंतर कामगार अजूनही कामावर परत आलेले नाहीत. त्यामुळे नागपुरात ५० टक्केच हॉटेल, रेस्टॉरंट आणि भोजनालय सुरू झाले आहेत. याशिवाय बहुतांश बारमध्ये किचन सुरू झालेले नाही. पुढे येणाºया दसरा-दिवाळी सणानंतर अर्थात दोन महिन्यानंतरच व्यवसाय सुरळीत होतील. नागपुरात लहानमोठे अडीच ते ३ हजार बार, रेस्टॉरंट, हॉटेल आणि भोजनालये आहेत. त्यात मोठे हॉटेल्स जवळपास १५ आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि पूर्ण क्षमतेने घरगुती विमानसेवा, रेल्वे सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे हॉटेल्सचा व्यवसाय अजूनही ठप्प आहे.

वेळेचा अजूनही संभ्रमरेणू म्हणाले, राज्य शासनाने परवानगी दिली तरीही हॉटेल, रेस्टॉरंट व बार सुरू ठेवण्याच्या वेळेची गाईडलाईन अजूनही आलेली नाही. पण मालकांनी कोरोना नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू केले आहेत. पहिल्या दिवशी पोलिसांनी ९ वाजता बंद करण्यास सांगितले. नागपुरात रेस्टॉरंटमध्ये ग्राहक रात्री ८ नंतर येतात. रात्री ११ पर्यंत प्रतिष्ठाने खुली ठेवण्यास परवानगी द्यावी.वेळेची समस्यापहिल्या दिवशी सदर अणि सीताबर्डी भागात पोलिसांनी प्रतिष्ठाने ९ वाजता बंद करण्यास सांगितली होती. मुंबईत रात्री १२.३० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. नागपुरात किमान ११ वाजेपर्यंत सुरू ठेवावीत. या संदर्भात प्रशासनाने नियमावली जाहीर करावी.स्वप्नील अहिरकर, हॉटेल व्यावसायिक़

 

टॅग्स :hotelहॉटेल