शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१२ वी अकाऊंटच्या उत्तरपत्रिका गहाळ

By admin | Updated: March 26, 2017 01:35 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या जीवशास्त्र व अकाऊंटचा पेपर एकाच दिवशी झाला. जीवशास्त्राच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी संबंधित महाविद्यालयात पोहोचल्या आहेत.

बोर्डाने पाठविल्या होत्या मूल्यांकनासाठी : शिक्षक करताहेत प्रतीक्षाआशिष दुबे नागपूरराज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या जीवशास्त्र व अकाऊंटचा पेपर एकाच दिवशी झाला. जीवशास्त्राच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी संबंधित महाविद्यालयात पोहोचल्या आहेत. परंतु अकाऊंटच्या उत्तरपत्रिका अद्याप पोहोचलेल्या नाहीत. बोर्डाचे अधिकारी यासंदर्भात समाधानकारक उत्तर देण्यास असक्षम ठरत आहेत. त्यामुळे अकाऊंटच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे. पेपर होऊन १५ दिवस लोटल्यानंतरही उत्तरपत्रिका महाविद्यालयात न पोहोचल्याने बोर्डाच्या विभागीय कार्यालयात खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी उत्तरपत्रिकेची तपासणी सुरू केली आहे. परंतु अद्यापपर्यंत पोलिसात कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. १० मार्चला अकाऊंटचा पेपर घेण्यात आला. पेपर झाल्यानंतर लगेच उत्तरपत्रिका बोर्डाच्या कस्टडीमध्ये पोहोचली. तेथून उत्तरपत्रिका पोस्टाच्या माध्यमातून महाविद्यालयांमध्ये पाठविण्यात आल्या. परंतु १५ दिवसानंतरही अकाऊंटची उत्तरपत्रिका शिक्षकांना मिळाली नसल्याचे वाणिज्य शाखेच्या शिक्षकांकडून सांगण्यात आले. पेपर झाल्यानंतर उत्तरपत्रिका संबंधित महाविद्यालयात दोन ते तीन दिवसात पोहोचणे गरजेचे आहे. महाविद्यालयांमध्ये विषय शिक्षक दररोज उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनासाठी येत आहेत आणि रिकाम्या हाती परतत आहेत. उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी महाविद्यालयांमध्ये का नाही पोहोचली, यासंदर्भात विभागीय सहसचिव श्रीराम चव्हाण यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. ते म्हणाले की, पेपरनंतर पोस्टाचा एक दिवसाचा संप होता. त्यामुळे उत्तरपत्रिका पोहोचू शकल्या नसेल, परंतु लवकरच पोहोचविण्यात येईल. परंतु एकाच दिवशी जीवशास्त्र आणि अकाऊंटचे पेपर झाले.(प्रतिनिधी)वर्षापूर्वी हरवलेली उत्तरपत्रिका अद्यापही मिळाली नाही गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेच्या काळात सावनेरच्या एका परीक्षा केंद्रातून वाणिज्य शाखेच्या एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका हरवली होती. ती अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे बोर्डाने बचावात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना अंदाजे गुण देऊन उत्तीर्ण केले होते. परंतु उत्तरपत्रिका नाही मिळाल्यामुळे बोर्डाने संबंधित केंद्र अधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला होता. त्याआधारे पोलिसात तक्रारदेखील करण्यात आली होती. परंतु तीन दिवसांच्या आत तक्रार मागे घेण्यात आली. तक्रार मागे घेण्याचे कुठलेही कारण बोर्डाने सांगितले नाही.