शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील १२ रेशन दुकानांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 21:29 IST

लाभार्थ्यांना अर्धे रेशन देऊन त्यांना पूर्ण कोट्याचे धान्य दिल्याचे दाखवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अन्न व पुरवठा विभागाने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून १२ रेशन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच विभागाने शहरातील सर्व रेशन दुकानांची चौकशी सुरू केली आहे.

ठळक मुद्देअन्न पुरवठा विभागाने सुरू केली दुकानांची चौकशी : आठवडाभरात अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाभार्थ्यांना अर्धे रेशन देऊन त्यांना पूर्ण कोट्याचे धान्य दिल्याचे दाखवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अन्न व पुरवठा विभागाने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून १२ रेशन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच विभागाने शहरातील सर्व रेशन दुकानांची चौकशी सुरू केली आहे.जिल्हा धान्य पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी ही माहिती दिली. लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्ताचा उल्लेख करीत त्यांनी सांगितले की, लाभार्थ्यांना त्यांच्या कोट्याचे धान्य वितरित न करणाऱ्या रेशन दुकानांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. लोकमतने १० नोव्हेंबर रोजी , धान्य कमी बिल जास्त’ या शिर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित करीत रेशन दुकनातील काळाबाजार उघडकीस आणला होता. अंत्योदय योजना सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत लाभार्थ्यांना दोन रुपये किलो प्रमाणे २० किलो गहू, आणि ३ रुपये प्रति किलोप्रमाणे १५ किलो तांदूळ दिले जाते. यासोबतच ३५ रुपये किलो तूर डाळ आणि २० रुपये किलो साखर देण्याचीही तरतूद आहे. लाभार्थ्यांनुसार सर्व कागदोपत्री आहे. लाभार्थ्यांना गहू व तांदूळ कोट्यानुसार मिळत नाही. अर्धेच दिले जाते. बिल मात्र पूर्ण कोट्याचे दिले जाते. डाळ आणि साखर दिलीच जात नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत निवेदनही सादर केले होते.यासंदर्भात विचारणा केली असता प्रशांत काळे यांनी अन्न व पुरवठा विभागातर्फे याची सखोल चौकशी केली जात असल्याचे सांगितले. प्रत्येक दुकानांची तपासणी केली जात आहे. चार ते पाच दिवसात अहवाल सदर केला जाईल. या आधरावर दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल. अशाच प्रकारे यापूर्वीही आलेल्या तक्रारीवर १२ दुकानांचे परवाने निलंबित केले असून आर्थिक दंडही ठोठावल्याचे त्यांनी सांगितले.तक्रार करण्याचे आवाहनकुठल्याही लाभार्थ्यास कोट्यापेक्षा कमी धान्य मिळत असेल. बिल दिले जात नसेल किंवा इतर काही समस्या असल्यास त्यांनी रेशन दुकानदाराची विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी केले आहे. आॅनलाईनही तक्रार करता येऊ शकते. लाभार्थ्यांची तक्रार आल्यास संबंधिताची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :foodअन्नGovernmentसरकार