शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

नागपुरातील १२ रेशन दुकानांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 21:29 IST

लाभार्थ्यांना अर्धे रेशन देऊन त्यांना पूर्ण कोट्याचे धान्य दिल्याचे दाखवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अन्न व पुरवठा विभागाने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून १२ रेशन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच विभागाने शहरातील सर्व रेशन दुकानांची चौकशी सुरू केली आहे.

ठळक मुद्देअन्न पुरवठा विभागाने सुरू केली दुकानांची चौकशी : आठवडाभरात अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाभार्थ्यांना अर्धे रेशन देऊन त्यांना पूर्ण कोट्याचे धान्य दिल्याचे दाखवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अन्न व पुरवठा विभागाने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून १२ रेशन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच विभागाने शहरातील सर्व रेशन दुकानांची चौकशी सुरू केली आहे.जिल्हा धान्य पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी ही माहिती दिली. लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्ताचा उल्लेख करीत त्यांनी सांगितले की, लाभार्थ्यांना त्यांच्या कोट्याचे धान्य वितरित न करणाऱ्या रेशन दुकानांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. लोकमतने १० नोव्हेंबर रोजी , धान्य कमी बिल जास्त’ या शिर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित करीत रेशन दुकनातील काळाबाजार उघडकीस आणला होता. अंत्योदय योजना सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत लाभार्थ्यांना दोन रुपये किलो प्रमाणे २० किलो गहू, आणि ३ रुपये प्रति किलोप्रमाणे १५ किलो तांदूळ दिले जाते. यासोबतच ३५ रुपये किलो तूर डाळ आणि २० रुपये किलो साखर देण्याचीही तरतूद आहे. लाभार्थ्यांनुसार सर्व कागदोपत्री आहे. लाभार्थ्यांना गहू व तांदूळ कोट्यानुसार मिळत नाही. अर्धेच दिले जाते. बिल मात्र पूर्ण कोट्याचे दिले जाते. डाळ आणि साखर दिलीच जात नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत निवेदनही सादर केले होते.यासंदर्भात विचारणा केली असता प्रशांत काळे यांनी अन्न व पुरवठा विभागातर्फे याची सखोल चौकशी केली जात असल्याचे सांगितले. प्रत्येक दुकानांची तपासणी केली जात आहे. चार ते पाच दिवसात अहवाल सदर केला जाईल. या आधरावर दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल. अशाच प्रकारे यापूर्वीही आलेल्या तक्रारीवर १२ दुकानांचे परवाने निलंबित केले असून आर्थिक दंडही ठोठावल्याचे त्यांनी सांगितले.तक्रार करण्याचे आवाहनकुठल्याही लाभार्थ्यास कोट्यापेक्षा कमी धान्य मिळत असेल. बिल दिले जात नसेल किंवा इतर काही समस्या असल्यास त्यांनी रेशन दुकानदाराची विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी केले आहे. आॅनलाईनही तक्रार करता येऊ शकते. लाभार्थ्यांची तक्रार आल्यास संबंधिताची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :foodअन्नGovernmentसरकार