शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

जनावरांच्याही कानावर १२ डिजिट नंबरचा टॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:29 IST

केंद्र सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीला आधारने जोडून, स्वतंत्र ओळख दिली आहे. हे आधार कार्ड आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज झाले आहे.

ठळक मुद्दे१ जुलैपासून सुरू झाली मोहिमेला सुरुवात : सरकारला मिळणार देशभरातील जनावरांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीला आधारने जोडून, स्वतंत्र ओळख दिली आहे. हे आधार कार्ड आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज झाले आहे. याच धर्तीवर आता केंद्र सरकारने जनावरांनासुद्धा आधारशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या फक्त दुधाळ जनावरांचा समावेश आहे. १ जुलैपासून नागपूर जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात झाली आहे. नोंद झालेल्या गाई आणि म्हशीला १२ डिजिट नंबरचा टॅग कानाला टोचला जात आहे.राज्यातील दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी, नष्ट होत असलेल्या देशी ब्रीडचे संगोपन करण्यासाठी, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकºयांना मिळवून देण्यासाठी जनावरांना आधारशी जोडल्या जात आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल मिशन फॉर बोव्हाईन प्रोडक्टीव्हीटी मोहिमेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आजपर्यंत जनगणनेसारखी पशुगणनाही होत होती. परंतु पशुगणनेत त्या पशूची पुरेशी माहिती उपलब्ध होत नव्हती. २०१२ च्या पशुगणनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १० हजार दुधाळ जनावरांची नोंद आहे. केंद्र सरकारने प्रत्येक पशूला आधार क्रमांकाच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख देण्याचा कार्यक्रम राबविला आहे. नागपूर जिल्ह्यात १ जुलैपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात १७६ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. दवाखान्यातील डॉक्टर व पर्यवेक्षकाच्या माध्यमातून पशूची नोंदणी करण्यात येत आहे. पशूंना १२ डिजिटचा आधार नंबर देताना इत्थंभूत माहिती जसे, पशूचा जन्म, वय, प्रजननाचा अवधी व संगोपन करणाºया शेतकºयाचे नाव आदी माहिती नोंदविण्यात येत आहे. ही माहिती एका सॉफ्टवेअरमध्ये डाऊनलोड करण्यात येत आहे.आधारचे फायदेआधार नोंदणीमुळे जनावरांचे ब्रीडिंग, न्यूट्रीशन, आरोग्य याची इत्थंभूत माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळणार आहे. त्याचबरोबर जनावरांचे लसीकरण, जनावरांची आॅनलाईन विक्री, जनावरांची संख्या, विभागातर्फे पशूंसाठी राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी, हरविलेल्या जनावरांची सहज ओळख पटणार आहे. गोरक्षणाचा भार व कोंडवाड्याचा खर्च कमी होणार आहे.केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. भविष्यात याचा लाभ होणार आहे. सध्या दुधाळ जनावरांना आधार क्रमांक देण्यात येत आहे. पशूच्या संदर्भातील अख्खी शासकीय यंत्रणा यात जोडली जाणार आहे. सध्या जिल्ह्यात ६०० जनावरांना आधार क्रमांक दिला गेला आहे.डॉ. राजेंद्र रेवतकर,पशुधन विकास अधिकारी