शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जनावरांच्याही कानावर १२ डिजिट नंबरचा टॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:29 IST

केंद्र सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीला आधारने जोडून, स्वतंत्र ओळख दिली आहे. हे आधार कार्ड आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज झाले आहे.

ठळक मुद्दे१ जुलैपासून सुरू झाली मोहिमेला सुरुवात : सरकारला मिळणार देशभरातील जनावरांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीला आधारने जोडून, स्वतंत्र ओळख दिली आहे. हे आधार कार्ड आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज झाले आहे. याच धर्तीवर आता केंद्र सरकारने जनावरांनासुद्धा आधारशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या फक्त दुधाळ जनावरांचा समावेश आहे. १ जुलैपासून नागपूर जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात झाली आहे. नोंद झालेल्या गाई आणि म्हशीला १२ डिजिट नंबरचा टॅग कानाला टोचला जात आहे.राज्यातील दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी, नष्ट होत असलेल्या देशी ब्रीडचे संगोपन करण्यासाठी, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकºयांना मिळवून देण्यासाठी जनावरांना आधारशी जोडल्या जात आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल मिशन फॉर बोव्हाईन प्रोडक्टीव्हीटी मोहिमेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आजपर्यंत जनगणनेसारखी पशुगणनाही होत होती. परंतु पशुगणनेत त्या पशूची पुरेशी माहिती उपलब्ध होत नव्हती. २०१२ च्या पशुगणनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १० हजार दुधाळ जनावरांची नोंद आहे. केंद्र सरकारने प्रत्येक पशूला आधार क्रमांकाच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख देण्याचा कार्यक्रम राबविला आहे. नागपूर जिल्ह्यात १ जुलैपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात १७६ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. दवाखान्यातील डॉक्टर व पर्यवेक्षकाच्या माध्यमातून पशूची नोंदणी करण्यात येत आहे. पशूंना १२ डिजिटचा आधार नंबर देताना इत्थंभूत माहिती जसे, पशूचा जन्म, वय, प्रजननाचा अवधी व संगोपन करणाºया शेतकºयाचे नाव आदी माहिती नोंदविण्यात येत आहे. ही माहिती एका सॉफ्टवेअरमध्ये डाऊनलोड करण्यात येत आहे.आधारचे फायदेआधार नोंदणीमुळे जनावरांचे ब्रीडिंग, न्यूट्रीशन, आरोग्य याची इत्थंभूत माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळणार आहे. त्याचबरोबर जनावरांचे लसीकरण, जनावरांची आॅनलाईन विक्री, जनावरांची संख्या, विभागातर्फे पशूंसाठी राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी, हरविलेल्या जनावरांची सहज ओळख पटणार आहे. गोरक्षणाचा भार व कोंडवाड्याचा खर्च कमी होणार आहे.केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. भविष्यात याचा लाभ होणार आहे. सध्या दुधाळ जनावरांना आधार क्रमांक देण्यात येत आहे. पशूच्या संदर्भातील अख्खी शासकीय यंत्रणा यात जोडली जाणार आहे. सध्या जिल्ह्यात ६०० जनावरांना आधार क्रमांक दिला गेला आहे.डॉ. राजेंद्र रेवतकर,पशुधन विकास अधिकारी