शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

२६७ गावांसाठी ११४ कोटींचा आराखडा

By admin | Updated: January 29, 2015 00:59 IST

शहरालगतच्या गावातील वाढती लोकसंख्या व प्रदूषित जलस्रोतामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने

पेयजल कार्यक्रम : २७६ गावांतील टंचाई दूर होणारनागपूर : शहरालगतच्या गावातील वाढती लोकसंख्या व प्रदूषित जलस्रोतामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २६७ गावांसाठी ११४.४६ कोटींचा आराखडा तयार केला आहे. भूगर्भातील पाणी पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. त्यातच शहरालगतच्या नदी व नाल्यात सांडपाणी सोडले जात असल्याने प्रदूषणामुळे नदी लगतच्या गावातील जलस्रोत प्रदूषित झालेले आहेत. त्यामुळे अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करून कायमस्वरूपी उपायोजना म्हणून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. २०१५-१६ मध्ये ११२ तर २०१६-१७ या वर्षात १५५ योजनांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दोन वर्षात या योजना पूर्ण करावयाच्या आहेत. यात ५८ गुणवत्ता बाधित गावांचा समावेश असून २०९ गावांसाठी वाढीव पाणी पुरवठा राबविल्या जाणार आहेत. यातील २३६ योजना पाणी पुरवठा विभागामार्फत तर ३१ योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राबविणार आहेत. यातील ७० योजनांची कामे हाती घेण्यात आली असून नवीन ४२ योजना प्र्रस्तावित आहेत.लोकसंख्या वाढ व भूगर्र्भातील पाणी पातळी खाली गेल्याने सुरु असलेल्या योजनामार्फत पाणी पुरवठा शक्य होत नाही. ही बाब विचारात घेता पाणी पुरवठा विभागाने नवीन आराखडा तयार केला असून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. (प्रतिनिधी)मंजुरी मिळताच अंमलबजावणीशासनाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळताच पाणी पुरवठा विभागामार्फत प्रस्तावित योजना हाती घेण्यात येतील. दोन वर्षात प्रस्तावित योजना पूर्ण होतील. तसेच टंचाईग्रस्त गावांसाठी उपाययोजना लवकरच हाती घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गव्हाणकर यांनी दिली.