शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना थैमान घालणार?, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
3
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
4
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
5
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
6
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
7
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
8
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
9
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
10
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
11
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
12
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
13
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
14
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
16
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर
17
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
18
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
19
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
20
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

२६७ गावांसाठी ११४ कोटींचा आराखडा

By admin | Updated: January 29, 2015 00:59 IST

शहरालगतच्या गावातील वाढती लोकसंख्या व प्रदूषित जलस्रोतामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने

पेयजल कार्यक्रम : २७६ गावांतील टंचाई दूर होणारनागपूर : शहरालगतच्या गावातील वाढती लोकसंख्या व प्रदूषित जलस्रोतामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २६७ गावांसाठी ११४.४६ कोटींचा आराखडा तयार केला आहे. भूगर्भातील पाणी पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. त्यातच शहरालगतच्या नदी व नाल्यात सांडपाणी सोडले जात असल्याने प्रदूषणामुळे नदी लगतच्या गावातील जलस्रोत प्रदूषित झालेले आहेत. त्यामुळे अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करून कायमस्वरूपी उपायोजना म्हणून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. २०१५-१६ मध्ये ११२ तर २०१६-१७ या वर्षात १५५ योजनांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दोन वर्षात या योजना पूर्ण करावयाच्या आहेत. यात ५८ गुणवत्ता बाधित गावांचा समावेश असून २०९ गावांसाठी वाढीव पाणी पुरवठा राबविल्या जाणार आहेत. यातील २३६ योजना पाणी पुरवठा विभागामार्फत तर ३१ योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राबविणार आहेत. यातील ७० योजनांची कामे हाती घेण्यात आली असून नवीन ४२ योजना प्र्रस्तावित आहेत.लोकसंख्या वाढ व भूगर्र्भातील पाणी पातळी खाली गेल्याने सुरु असलेल्या योजनामार्फत पाणी पुरवठा शक्य होत नाही. ही बाब विचारात घेता पाणी पुरवठा विभागाने नवीन आराखडा तयार केला असून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. (प्रतिनिधी)मंजुरी मिळताच अंमलबजावणीशासनाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळताच पाणी पुरवठा विभागामार्फत प्रस्तावित योजना हाती घेण्यात येतील. दोन वर्षात प्रस्तावित योजना पूर्ण होतील. तसेच टंचाईग्रस्त गावांसाठी उपाययोजना लवकरच हाती घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गव्हाणकर यांनी दिली.