शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

११०० कोटींची गुंतवणूक ७५०० जणांना रोजगार

By admin | Updated: December 22, 2015 04:24 IST

वस्त्रोद्योग क्षेत्रातील अव्वल असलेल्या रेमंड कंपनीस अमरावतीजवळील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील २०० हेक्टर

मुख्यमंत्र्यांनी दिले सिंघानियांना देकार पत्र : रेमंडच्या प्रकल्पासाठी दिली २०० हेक्टर जमीननागपूर : वस्त्रोद्योग क्षेत्रातील अव्वल असलेल्या रेमंड कंपनीस अमरावतीजवळील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील २०० हेक्टर जमीन देण्यासंदर्भातील देकार पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रेमंडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांना दिले.या प्रकल्पात ११०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल आणि ७५०० जणांना रोजगार मिळेल. आज सकाळी विधिमंडळातील मंत्रिमंडळ सभागृहात सिंघानिया यांना जमिनीचे देकार पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, वस्त्रोद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार डॉ.सुनील देशमुख व आमदार रवी राणा, वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, उद्योग सचिव अपूर्व चंद्रा यांच्यासह औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. रेमंडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सिंघानिया म्हणाले की, रेमंड समूहाने वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठे नाव कमाविले आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताला मोठी संधी आहे. पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया धोरणानुसार रेमंड समूहाने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योगांसाठीचे महाराष्ट्राचे धोरण हे देशातील सर्वात प्रभावी व चांगले धोरण आहे. तसेच उद्योग विभागाचेही मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळते. त्यामुळे रेमंड समूह राज्यात आणखी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. रेमंड समूहाने राज्यात एकूण आठ ठिकाणी उद्योग सुरू केले आहेत. या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादकांच्या कच्च्या मालाला आता हक्काची बाजारपेठ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विदर्भ, खान्देश व मराठवाड्या कापूस मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे वस्त्रोद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठसह महाराष्ट्रातील नऊ ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नव्याने वस्त्रोद्योग उद्यान (टेक्सटाईल पार्क) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला स्पर्धात्मक भाव व बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राची रोजगार निर्मिती क्षमता विचारात घेऊन या उद्योगास प्रोत्साहन देण्याचा तसेच तयार कापडावर मूल्यवर्धित प्रक्रिया करून गारमेंट पार्कच्या माध्यमातून महिलांनादेखील विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा मानस आहे.(विशेष प्रतिनिधी)नांदगावात आणखी तीन वस्त्रोद्योग ४रेमंड उद्योग समूहाचे महाराष्ट्रात यवतमाळ, जळगाव, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी वस्त्रोद्योग युनिट आहेत. सद्यस्थितीत अतिरिक्त अमरावती (नांदगाव पेठ) औद्योगिक क्षेत्रात शाम इंडोफॅब लि., व्ही.एच.एम. इंडस्ट्रिज लि., सूर्यालक्ष्मी कॉटन मिल आणि सियाराम सिल्क मिल या उद्योगांना एकूण १०२ हेक्टर जमीन वाटप करण्यात आली आहे. यातून २२०० कोटी गुंतवणूक व साधारणत: ५२०० रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.